बीड: राज्यात पावसाने हजेरी लावली असली तरी अनेक ठिकाणी अजूनही पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. बीडमधील परळीत देखील असाच प्रश्न आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या ताब्यातील नगरपरिषदेकडून शहरातील नागरिकांना पाणी वाटप करताना भेदभाव होत असल्याचा आरोप होत आहे. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर महिला बालविकास मंत्री आणि बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी प्रशासनाला भेदभाव खपवून घेणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच स्वतः संबंधित प्रभागात येऊन पाणी वाटप केले.