AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रेनच्या वेळेपूर्वी 20 मिनिटे अगोदर पोहोचा, अन्यथा ट्रेन सोडा

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने सुरेक्षेच्या दृष्कोनातून सील रेल्वे स्थानक बनवण्याचा विर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना आता विनमातळाप्रमाणे रेल्वे स्थानकांवरही 20 मिनिटांआधी पोहोचावं लागणार आहे. सील रेल्वे स्थानक म्हणजे असे रेल्वे स्थानक जिथे गाडी पकण्याआधी प्रवाशांची सुरक्षा तपासणी केली जाईल. देशात पहिल्यांदा ही व्यवस्था हाय टेक्नॉलॉजीसोबत अलाहाबाद रेल्वे स्थानकावर लागू करण्यात आली आहे. कुंभ मेळाच्या […]

ट्रेनच्या वेळेपूर्वी 20 मिनिटे अगोदर पोहोचा, अन्यथा ट्रेन सोडा
| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने सुरेक्षेच्या दृष्कोनातून सील रेल्वे स्थानक बनवण्याचा विर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना आता विनमातळाप्रमाणे रेल्वे स्थानकांवरही 20 मिनिटांआधी पोहोचावं लागणार आहे. सील रेल्वे स्थानक म्हणजे असे रेल्वे स्थानक जिथे गाडी पकण्याआधी प्रवाशांची सुरक्षा तपासणी केली जाईल. देशात पहिल्यांदा ही व्यवस्था हाय टेक्नॉलॉजीसोबत अलाहाबाद रेल्वे स्थानकावर लागू करण्यात आली आहे. कुंभ मेळाच्या निमित्ताने लाखोंच्या संख्येने यात्रेकरु येथे पोहोचतात. याच महिन्यापासून कुंभ मेळ्याला सुरुवात होणार आहे.

रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे डायरेक्टर जनरल अरुण कुमार यांनी पीटीआयला याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ‘कुंभ मेळ्यादरम्यान सुरेक्षेच्या दृष्टीकोनातून सध्या या हाय टेक्नॉलॉजी प्रकल्पाला अलाहाबाद रेल्वे स्थानकावर लागू करण्यात आले आहे. तसेच लवकरच कर्नाटकच्या हुबळी स्थानकावरही ही व्यवस्था लागू करण्यात येणार आहे. त्यासोबत 202 स्थानकांवर ही व्यवस्था लागू करण्यासाठी रेल्वेकडे ब्लू प्रिंट तयार आहे. 2016 साली रेल्वेच्या इंटीग्रेटेड सिक्यूरिटी सिस्टीम अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.’

‘ही व्यवस्था रेल्वे स्थानकांना सील करण्याची आहे. यामध्ये रेल्वे स्थानकांचे प्रवेश द्वार सील करण्यात येतील. यापैकी काहींवर भिंती बनवल्या जातील, तर काही द्वारांवर आरपीएफ जवान तैनात असतील. तर काही प्रवेश द्वारांवर बंद होणारी फाटकं लावली जातील. प्रत्येक प्रवेश द्वारावर सुरक्षा तपासणी होईल. पण त्यासाठी प्रवाशांना विमानतळाप्रमाणे 3-4 तासांआधी यायची गरज नाही, तर त्यांना गाडीच्या वेळेच्या फक्त 15-20 मिनिटे अगोदर यायचं आहे. जेणेकरुन तपास प्रक्रिये दरम्यान उशीर होणार नाही. तसेच या तपासणीसाठी प्रत्येक प्रवाशाला या प्रक्रियेतून जाण्याची गरज नाही तर 8-9 प्रवाशांपैकी कुठल्याही एकाच प्रवाशाला या प्रक्रियेतून जावे लागेल’, असे अरुण कुमार यांनी सांगितले.

या व्यवस्थेने सुरक्षेत वाढ होईल पण सुरक्षारक्षकांमध्ये नाही. नव्या टेक्नॉलॉजीमुळे अधिक कर्मचाऱ्यांची गरज भासणार नाही, असेही अरुण कुमार यांनी सांगितले.

Follow Us
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती.....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू....
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.