AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raigad Rain | रायगडमध्ये दोन दिवस मुसळधार पाऊस, रोहा तालुका हाय अलर्टवर, कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत वाढ

अवघ्या दोन दिवसाच्या पावसातच रायगडमधील रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीच्या पाणी पातळी मोठी वाढ झाली.

Raigad Rain | रायगडमध्ये दोन दिवस मुसळधार पाऊस, रोहा तालुका हाय अलर्टवर, कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत वाढ
| Updated on: Jun 19, 2020 | 12:46 AM
Share

रायगड : गेल्या दोन दिवसापासून रायगड जिल्ह्यात सतत पाऊस पडत (Raigad Heavy Rainfall) आहे. रायगडमध्ये कधी मुसळधार तर कधी रिमझिम पाऊस बरसत आहे. पावसाळ्यात रायगड जिल्ह्याला नेहमीच पूरसदृश्य परिस्थितीला तोडं द्यावे लागते. परंतु, मान्सून जिल्ह्यात दाखल झाला आणि अवघ्या दोन दिवसाच्या पावसातच रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत मोठी  वाढ झाली (Raigad Heavy Rainfall).

त्यामुळे धोका पाहता किनाऱ्यालगतच्या गावांसाठी प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे. भिरा टाटा पॉवरमधून सोडलेल्या पाण्याने तयार होणाऱ्या नदीच्या पाण्याची पातळी धोका पातळीजवळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा ईशारा दिला आहे. तसेच, अधिकारी वर्गाला परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

17 जून रोजी रात्री 10 वाजता केलेल्या निरीक्षणानुसार रोहा तालुक्यातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीची धोक्याची पातळी डोलवहाल बधांऱ्यावर 23.95 मीटर ईतकी आहे. सध्याची पातळी पाणी 22.23 मीटर आहे. तर या ठिकाणी ईशारा पातळी 23.00 मीटर आहे (Raigad Heavy Rainfall).

 रायगडमधील इतर नद्यांची पाणी पातळी कितीने वाढली?

– आबां नदीची धोक्याची पातळी 9 मीटर आहे. तर, सध्याची पातळी 7.20 मीटर आहे.

– सावित्री नदीची धोका पातळी 6.20 मीटर आहे. तर, सध्याची पातळी 3.20 मीटर आहे.

– पाताळगंगा नदीची धोका पातळी 21.52 मीटर आहे. तर, सध्याची पातळी 17.95 मीटर आहे.

– उल्हास नदीची धोका पातळी 48.87 मीटर आहे. तर, सध्याची पातळी 42.60 मीटर आहे.

गाढी नदीची धोका पातळी 6.55 मीटर आहे. तर, सध्याची पातळी 0.95 मीटर आहे.

Raigad Heavy Rainfall

संबंधित बातम्या : 

Kolhapur Rain | कोल्हापुरात तुफान पाऊस, पंचगंगेची पातळी 23 फुटांवर, 17 बंधारे पाण्याखाली

औरंगाबादमध्ये पहिल्याच पावसात अजिंठा आणि वेरुळचे धबधबे सुरु, कोल्हापूरमध्येही दमदार पाऊस

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.