Navneet Rana: राणा दाम्पत्य म्हणजे सर्वसामान्यांच्या भाषेत बंटी-बबली होय- मनीषा कायदेंची टीका

| Updated on: May 08, 2022 | 5:22 PM

ठाकरे सरकारला आव्हान देणारे किती आले अन किती गेले. त्यांनी हा बालिश पण सोडून द्यावा. नारी शक्तीवर ते बोलत आहेत. नारी शक्तीवर ते बोलत आहेत. हेत. अशी टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी केली आहे.

Follow us on

मुंबई – खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana)व आमदार रवी राणा आमच्या सर्वसामान्यांच्या दृष्टीनं बंटी-बबली आहे. आतमध्ये तीन दिवस हॉस्पीटलमध्ये रडत होत्या. चहा मिळाला नाही, पाणी मिळाले नाही पण तेही सगळं कळलं लोकांना त्यांचा खोटारडे पणा बाहेर पडला. मात्र आता रुग्णालयातवून बाहेर येताच दोन तास माध्यमाच्या समोर उभे राहून बोलल्या. ज्यांना आतमध्ये उभे राहता येत नव्हेत त्या नवनीत राणा बाहेर पत्रकारांच्या समोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM  Uadhav Thakarey) यांना आव्हान देत आहेत. मात्र असे ठाकरे सरकारला आव्हान देणारे किती आले अन किती गेले. त्यांनी हा बालिश पण सोडून द्यावा. नारी शक्तीवर ते बोलत आहेत. तर त्यांनी महागाई वाढली आहे त्यावर बोलावे. असे बोलून त्या न्यायालयाने (Court)घालून दिलेल्या समजेचा गैरवापर करत आहेत. अशी टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी केली आहे.