AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहमदनगरमध्ये शरद पोंक्षे यांच्या गाडीची काच फोडली

काही अज्ञात व्यक्तींनी अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe car glass smashed) यांच्या गाडीची काच फोडली.

अहमदनगरमध्ये शरद पोंक्षे यांच्या गाडीची काच फोडली
| Updated on: Mar 09, 2020 | 7:46 PM
Share

अहमदनगर : काही अज्ञात व्यक्तींनी अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe car glass smashed) यांच्या गाडीची काच फोडली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी आणि शरद पोंक्षे हे आज अहमदनगरला गेले होते. यावेळी ही घटना घडली (Sharad Ponkshe car glass smashed). या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. गाडीची काच फोडली त्यावेळी शरद पोंक्षे एका हॉटेलमध्ये होते.

आगामी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अहमदनगरमध्ये होणार असल्याची माहिती देण्यासाठी शरद पोंक्षे अहमदनगरला गेले होते. नाट्य संमेलनाबाबत माहिती देण्यासाठी अहमदनगर शहरातील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद सुरु होती. हॉटेलबाहेर प्रसाद कांबळी यांच्या गाडीत शरद पोंक्षे यांची बॅग होती. याच गाडीच्या ड्रायव्हरच्या बाजूची काच काही अज्ञात व्यक्तींनी फोडली.

गेल्या आठवड्यात पुण्यातील एका कार्यक्रमात शरद पोंक्षे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यामुळे शरद पोंक्षे यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. त्यांच्या याच वक्तव्याच्या रोषातून गाडीची काच फोडण्यात आल्याची चर्चा अहमदनगर शहरात सुरु आहे. मात्र, गाडीचा काच फोडणाऱ्यांचा पोंक्षे यांच्यावरील रोष होता की त्यांची बॅग चोरीचा उद्देश होता? हे समजू शकलेलं नाही.

शरद पोंक्षे यांनी काय वक्तव्य केलं होतं?

“स्वातंत्र्यवीर सावरकर याचं अस्पृश्यता निवारण्यात मोठं योगदान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ आहे. आंबेडकर आणि महात्मा फुले हे त्या त्या जातीत जन्माला आल्याने त्यांना अपमानाचे चटके बसले. त्यामुळे विद्रोह करत प्रवाहाविरोधात लढले. मात्र अपमानाचा कोणताही चटका बसला नसतानाही सावरकर ब्राह्मण विरोधात उभे राहतात. समाजातील जातीच्या भिंती फोडण्यासाठी आयुष्य व्यतीत करतात. त्यामुळे दोन्ही राष्ट्रपुरुषांपेक्षा सावरकर कांकणभर श्रेष्ठ” असा दावा पोंक्षे यांनी केला होता.

संबंधित बातमी : अस्पृश्यता निवारणात आंबेडकर आणि फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ : शरद पोंक्षे

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.