AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

… तर उर्वरित तीन टप्प्यांमध्ये मतदान पहाटे 5 पासून सुरु होणार?

नवी दिल्ली : रमजान महिना लक्षात घेता लोकसभा निवडणुकीसाठी उर्वरित तीन टप्प्यांमध्ये मतदानाची वेळ सकाळी 7 ऐवजी पहाटे 5 पासून ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने याबाबतीत आवश्यक आदेश जारी करावा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई, जस्टिस दीपक गुप्ता आणि जस्टिस संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर याबाबत एका याचिकेवर सुनावणी झाली, […]

... तर उर्वरित तीन टप्प्यांमध्ये मतदान पहाटे 5 पासून सुरु होणार?
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:55 PM
Share

नवी दिल्ली : रमजान महिना लक्षात घेता लोकसभा निवडणुकीसाठी उर्वरित तीन टप्प्यांमध्ये मतदानाची वेळ सकाळी 7 ऐवजी पहाटे 5 पासून ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने याबाबतीत आवश्यक आदेश जारी करावा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई, जस्टिस दीपक गुप्ता आणि जस्टिस संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर याबाबत एका याचिकेवर सुनावणी झाली, ज्यात ही मागणी करण्यात आली होती.

मोहम्मद निजामुद्दीन पाशा आणि असद हयात यांच्याकडून याबाबतची याचिका दाखल करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीचे अजून तीन टप्पे बाकी आहेत. त्यामुळे दोन ते अडीच तास अगोदरच मतदान सुरु करावं, अशी मागणी याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली. उर्वरित तीन टप्प्यांमध्ये 6 मे, 12 मे आणि 19 मे रोजी अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि सातव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे.

रमजान महिना 6 मेपासून सुरु होण्याची शक्यता आहे, याच दिवशी पाचव्या टप्प्याचं मतदान आहे. रमजानमध्ये मुस्लीम रोजा ठेवतात, असं याचिकाकर्त्यांनी म्हटलंय. याबाबत आयोगाला सोमवारी एक मागणीही केली होती, पण त्याचं उत्तर मिळालं नाही, असंही याचिकाकर्त्यांनी म्हटलंय.

निवडणूक होणाऱ्या राज्यांमध्ये मध्य प्रदेश, बिहार, हरियाणा, दिल्ली, चंदीगड, झारखंड, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश यांचा समावेश आहे. या राज्यात तापमान वाढण्याचीही शक्यता वर्तवली आहे. या परिस्थितीमुळे मुस्लिमांचं घराबाहेर निघणं कठीण होईल आणि मतदानासाठी रांगेत उभं रहावं लागेल. सोबतच सकाळी नमाज आणि सहरी केल्यानंतर रोजा ठेवणारे जास्तीत जास्त लोक आराम करणं पसंत करतात, असंही याचिकेत म्हटलंय.

Follow Us
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.