AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

… तर उर्वरित तीन टप्प्यांमध्ये मतदान पहाटे 5 पासून सुरु होणार?

नवी दिल्ली : रमजान महिना लक्षात घेता लोकसभा निवडणुकीसाठी उर्वरित तीन टप्प्यांमध्ये मतदानाची वेळ सकाळी 7 ऐवजी पहाटे 5 पासून ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने याबाबतीत आवश्यक आदेश जारी करावा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई, जस्टिस दीपक गुप्ता आणि जस्टिस संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर याबाबत एका याचिकेवर सुनावणी झाली, […]

... तर उर्वरित तीन टप्प्यांमध्ये मतदान पहाटे 5 पासून सुरु होणार?
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:55 PM
Share

नवी दिल्ली : रमजान महिना लक्षात घेता लोकसभा निवडणुकीसाठी उर्वरित तीन टप्प्यांमध्ये मतदानाची वेळ सकाळी 7 ऐवजी पहाटे 5 पासून ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने याबाबतीत आवश्यक आदेश जारी करावा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई, जस्टिस दीपक गुप्ता आणि जस्टिस संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर याबाबत एका याचिकेवर सुनावणी झाली, ज्यात ही मागणी करण्यात आली होती.

मोहम्मद निजामुद्दीन पाशा आणि असद हयात यांच्याकडून याबाबतची याचिका दाखल करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीचे अजून तीन टप्पे बाकी आहेत. त्यामुळे दोन ते अडीच तास अगोदरच मतदान सुरु करावं, अशी मागणी याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली. उर्वरित तीन टप्प्यांमध्ये 6 मे, 12 मे आणि 19 मे रोजी अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि सातव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे.

रमजान महिना 6 मेपासून सुरु होण्याची शक्यता आहे, याच दिवशी पाचव्या टप्प्याचं मतदान आहे. रमजानमध्ये मुस्लीम रोजा ठेवतात, असं याचिकाकर्त्यांनी म्हटलंय. याबाबत आयोगाला सोमवारी एक मागणीही केली होती, पण त्याचं उत्तर मिळालं नाही, असंही याचिकाकर्त्यांनी म्हटलंय.

निवडणूक होणाऱ्या राज्यांमध्ये मध्य प्रदेश, बिहार, हरियाणा, दिल्ली, चंदीगड, झारखंड, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश यांचा समावेश आहे. या राज्यात तापमान वाढण्याचीही शक्यता वर्तवली आहे. या परिस्थितीमुळे मुस्लिमांचं घराबाहेर निघणं कठीण होईल आणि मतदानासाठी रांगेत उभं रहावं लागेल. सोबतच सकाळी नमाज आणि सहरी केल्यानंतर रोजा ठेवणारे जास्तीत जास्त लोक आराम करणं पसंत करतात, असंही याचिकेत म्हटलंय.

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.