AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वच्छता सर्वेक्षण 2020 : एक लाखाखालील स्वच्छ शहरात महाराष्ट्रातील 20 शहरं, कराड पहिल्या तर सासवड दुसऱ्या क्रमांकावर

एक लाखांहून कमी लोकसंख्या असलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीत देशातील 25 शहरांचा समावेश (Top 3 Cleanest Cities in Maharashtra) आहे.

स्वच्छता सर्वेक्षण 2020 : एक लाखाखालील स्वच्छ शहरात महाराष्ट्रातील 20 शहरं, कराड पहिल्या तर सासवड दुसऱ्या क्रमांकावर
| Updated on: Aug 20, 2020 | 7:08 PM
Share

पुणे : केंद्र सरकारने ‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’ या स्वच्छ शहरांच्या वार्षिक सर्व्हेचा निकाल जाहीर केला. यात 1 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या टॉप 3 स्वच्छ शहरं ही महाराष्ट्रातील आहेत. या यादीत पहिला क्रमांकावर साताऱ्यातील कराड, दुसऱ्या क्रमांकावर पुण्यातील सासवड, तर तिसऱ्या क्रमांकावर लोणावळा शहराचा समावेश आहे. त्याशिवाय या यादीत पन्हाळा, जेजुरी, शिर्डी यासारख्या इतर शहरांचा समावेश आहे. (Top 3 Cleanest Cities in Maharashtra)

स्वच्छ सर्वेक्षण 2020 याची विविध विभागवार नोंदणी केली जाते. यात एक लाखांहून कमी लोकसंख्या असलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीत देशातील 25 शहरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील 20 शहर ही महाराष्ट्रातील आहेत. तर छत्तीसगडमधील 3, पंजाब आणि मध्यप्रदेशातील अनुक्रमे एका शहरांचा समावेश आहे.

दरम्यान गेल्या 3 वर्षांपासून सासवड नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2020 मध्ये सहभाग घेत आहे. 2018 मध्ये सासवडने राष्ट्रीय स्तरावर अठरावा क्रमांक पटकावून नाविण्यपूर्ण उपक्रमासाठी 5 कोटीचे विशेष पारितोषिक मिळवले होते. तर 2019 मध्ये स्वच्छतेतील सर्वसाधारण प्रकारामध्ये सासवडने 12 क्रमांक पटकावला आहे. (Top 3 Cleanest Cities in Maharashtra)

स्वच्छ शहरांची क्रमवारी

1. इंदूर (मध्य प्रदेश) 2. सुरत (गुजरात) 3. नवी मुंबई (महाराष्ट्र) 4. अंबिकापूर (छत्तिसगढ) 5. म्हैसूर (कर्नाटक) 6. विजयवाडा (आंध्रप्रदेश) 7. अहमदाबाद (गुजरात) 8. नवी दिल्ली (दिल्ली) 9. चंद्रपूर (महाराष्ट्र) 10. खारगोने (मध्य प्रदेश)

मध्य प्रदेशातील इंदूर शहराने पुन्हा एकदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून पहिले स्थान कायम राखले. इंदूर शहराने सलग चौथ्यांदा सर्वात स्वच्छ शहर ठरण्याचा मान पटकावला आहे. दुसर्‍या क्रमांकावर गुजरातमधील सुरत, तर तिसर्‍या क्रमांकावर महाराष्ट्रातील नवी मुंबई शहर आहे. राज्यातून चंद्रपूर 9 व्या, धुळे 17 व्या तर नाशिक 23 व्या क्रमांकावर आहेत. (Top 3 Cleanest Cities in Maharashtra)

संबंधित बातम्या : 

Swachh Mahotsav | इंदूर सलग चौथ्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातून ‘हे’ शहर अव्वल

सरकारी नोकरीसाठी आता एकच फॉर्म, मोदी सरकारचा निर्णय

Follow Us
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.