AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील सरकार महाविकास आघाडीचे नसून महाभकास, भाजपचे नेते आनंदराव राऊत यांचा आरोप

आनंदराव राऊत म्हणाले, सरकारमधील नेते सत्ता येण्यापूर्वीच हेक्टरी 25 हजार देण्याची मागणी करत होते. पण आता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालं असताना केवळ 10 हजार कोटींची मदत जाहीर केली.

राज्यातील सरकार महाविकास आघाडीचे नसून महाभकास, भाजपचे नेते आनंदराव राऊत यांचा आरोप
aanandrao raut
| Edited By: | Updated on: Nov 21, 2021 | 5:14 PM
Share

नागपूर : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार नसून महाभकास सरकार आहे, असा आरोप भाजप किसान मोर्चाचे प्रदेश महामंत्री आनंदराव राऊत यांनी केलाय. नागपुरात पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते.

आनंदराव राऊत म्हणाले, सरकारमधील नेते सत्ता येण्यापूर्वीच हेक्टरी 25 हजार देण्याची मागणी करत होते. पण आता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालं असताना केवळ 10 हजार कोटींची मदत जाहीर केली. राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना एनडीआरएफच्या निकषांच्या तीनपट आर्थिक मदत दोन हेक्टरपर्यंत शेतकऱ्याना देण्यात आली.

या महाविकास आघाडी सरकारनं 7 ते 8 लाख शेतकऱ्याचं वीज कनेक्शन कापन्यांचे महापाप केले आहे. यानंतर सरसकट वीज कापणार असल्यानं शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक मदत कारण्याचं सोडून वीज कापून कमरेवर लात मारण्याचे महापाप हे सरकार करत आहे, असा आरोपही आनंदराव वंजारी यांनी केलाय.

शेतकऱ्याचं कापलेले कनेक्शन जोडले पाहिजे. भविष्यतही वीज कनेक्शन कापणार नाही असे आश्वासन सरकारनं द्यावं, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा शब्द पाळला पाहिजे अशी मागणी करण्यात आली अन्यथा येणाऱ्या अधिवेशनात विधानभवनावर मोर्चा काढू असा इशारा दिला आहे.

आघाडीच्या फसवणुकीची 2 वर्षे पूर्ण

अकोला : आतापर्यंत महाविकास आघाडीच्या फसवणुकीची 2 वर्षे पूर्ण केली आहे, असा घणाघाती आरोप भारतीय जनता पार्टीचे अकोला जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे. अतिवृष्टीग्रस्तांना तसेच वादळग्रस्तांना मदत देऊन शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीबाबतही बळीराजाची फसवणूक केली आहे. पीक विमा कंपन्यांना फायदेशीर अटी बनवून नुकसानभरपाई मिळण्यापासून वंचित ठेवले आहे. नैसर्गिक संकटामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या भ्रष्ट, नाकर्त्या आणि कोडग्या कारभारामुळे उद्ध्वस्त केले आहे, असंही रणधीर सावरकर म्हणाले.

जरंडेश्वरप्रमाणेच खोतकरांचा घोटाळा, सोमय्यांचा आरोप; नांगरे-पाटलांची पत्नी, सासऱ्यांचेही घेतले नाव, चौकशीच्या मागणीसाठी उद्या दिल्लीला जाणार

12 तारखेची हिंसा डिलीट करून 13 तारखेच्या घटनेवर जोर का दिला जात आहे?, यशोमती ठाकूर गप्प का?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.