AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali 2020 | दिवाळीत ‘ड्रायफ्रुट्स’ खरेदी करताय? ‘या’ गोष्टी नक्की लक्षात घ्या!

बऱ्याचदा लोक फराळ किंवा मिठाईऐवजी ड्रायफ्रुट्स (Dry Fruit) अर्थात सुकामेवा भेट म्हणून देणे पसंत करतात.

Diwali 2020 | दिवाळीत ‘ड्रायफ्रुट्स’ खरेदी करताय? ‘या’ गोष्टी नक्की लक्षात घ्या!
| Updated on: Nov 11, 2020 | 1:46 PM
Share

मुंबई : दिवाळी (Diwali 2020) जवळ आली की घरोघरी फराळ आणि मिठाई बनवायला सुरुवात होते. बऱ्याचदा लोक फराळ किंवा मिठाईऐवजी ड्रायफ्रुट्स (Dry Fruit) अर्थात सुकामेवा भेट म्हणून देणे पसंत करतात. सध्या बाजारात वेगवेगळ्या आकारात आणि सुंदर पॅकेजिंगमध्ये ड्रायफ्रुट्स विक्रीला आले आहे. सणासुदीच्या काळात मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना भेट स्वरुपात हे ड्रायफ्रुट बॉक्स देण्याचा ट्रेंड सध्या सुरू आहे (The things we need to keep in mind while shopping dry fruits in Diwali).

दुसरे म्हणजे दिवाळी दरम्यान बऱ्याचदा मिठाईत भेसळीच्या बातम्या समोर येत असतात. भेसळयुक्त मिठाई आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. अशावेळी मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना भेट म्हणून देण्यासाठी मिठाईला पर्याय म्हणून ड्रायफ्रुट्स महत्त्वाचे ठरतात. महाग असले तरी ड्रायफ्रुट्स शरीरासाठी आणि आरोग्याच्या दृष्टीने खूप पौष्टिक आहेत.

दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याने सुक्यामेव्यातही भेसळीचे प्रमाण वाढलेले दिसून येते. अशा वेळी ड्रायफ्रुट्स खरेदी करताना आपली किंवा आपल्या प्रियजनांची फसवणूक होऊ नये यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत (The things we need to keep in mind while shopping dry fruits in Diwali).

रंग तपासा

चांगले ड्रायफ्रुट्स खरेदी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्याचा रंग तपासणे. जर ड्रायफ्रुट्सचा रंग त्याच्या नैसर्गिक रंगापेक्षा जास्त गडद असेल तर, याचा अर्थ असा की ते ड्रायफ्रुट खराब झाले आहेत. त्यामुळे गडद रंग असणारे ड्रायफ्रुट्स खरेदी करू नये.

चावून बघा

जर ड्रायफ्रुट्स काही वेळ पाण्यात ठेवून नंतर सुकवले तर, ते चावण्यास कडक होतात. याचाच अर्थ असा की ते ड्रायफ्रुट्स खूप जुने असून, नव्याने विकण्याकरता फ्रेश असल्याचे भासवले जात आहे. अशी ड्रायफ्रुट्स आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात (The things we need to keep in mind while shopping dry fruits in Diwali).

दुर्गंधी

ड्रायफ्रुट्स खरेदी करताना त्याचा वास घेऊन नक्की पाहा. जर त्यांना उग्र वास येत असेल तर टे ड्रायफ्रुट्स जुने आहेत. तसेच त्यांची योग्य ठिकाणे ठेवले नसावे. ड्रायफ्रुट्स जर व्यवस्थित योग्य ठिकाणी ठेवले नाहीत, तर त्यात ओलावा निर्माण होतो आणि त्यातून वास येऊ लागतो. अशावेळी या ड्रायफ्रुट्समध्ये अळी अथवा बुरशीजन्य घटक तयार होऊ शकतात. त्यामुळे असा सुकामेवा आरोग्यासाठी घातक ठरू शकतो.

तारीख

बहुतेक लोक स्थानिक दुकानदारांकडून सुटे ड्रायफ्रुट्स खरेदी करतात. त्यावर तारीख निर्देशित नसते. अशावेळी ते ड्रायफ्रुट्स खाण्यास योग्य की अयोग्य हे ठरवणे कठीण होते. त्यामुळे एफएसएसएआय मार्गदर्शक तत्त्वे निर्देशित असणारे ड्रायफ्रुट्स खरेदी करावेत. अशा पॅकेटवर मॅन्युफॅक्चरिंग तारीख लिहिलेली असते, जेणेकरून काही चुकीचे वाटल्यास ग्राहक मंचाकडे जाऊन तक्रार करता येते.

पॅकेटवरील माहिती

ड्रायफ्रूटचे पॅकेट विकत घेतेवेळी त्यामागील माहिती नक्की वाचा. जर त्यामध्ये त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या प्रिजर्वेटिव्हचे नाव लिहिले गेले असेल तर, ते ड्रायफ्रुट्स खरेदी करु नका.

(The things we need to keep in mind while shopping dry fruits in Diwali)

Follow Us
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.