AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हायड्रेटेड राहण्यासाठी उन्हाळ्याच्या हंगामात ‘या’ 5 पदार्थांचे सेवन करणे टाळाच !

उन्हाळ्याच्या हंगामात हायड्रेटेड राहणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे.

हायड्रेटेड राहण्यासाठी उन्हाळ्याच्या हंगामात 'या' 5 पदार्थांचे सेवन करणे टाळाच !
हेल्दी आहार
| Edited By: | Updated on: May 31, 2021 | 7:04 AM
Share

मुंबई : उन्हाळ्याच्या हंगामात हायड्रेटेड राहणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी तुम्ही पाणी जास्त पित असाल. याशिवाय हायड्रेटेड राहण्यासाठी कलिंगड आणि काकडी देखील फायदेशीर आहे. ते आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात. उन्हाळ्यात त्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र, उन्हाळ्यात कोणत्या पदार्थांचे सेवन करणे टाळले पाहिजे. हे बघूयात (Avoid these 5 foods during the summer season)

जास्त मीठाचे सेवन

मीठाला सोडियम क्लोराईड देखील म्हणतात. याचा उपयोग अन्नाची चव वाढविण्यासाठी केला जातो. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. यात सूज येणे, उच्च रक्तदाब आणि हृदय रोग इत्यादींचा समावेश आहे. जास्त सोडियमचे सेवन केल्यास मूत्रपिंड निकामी होऊ शकते. यामुळे डिहायड्रेशन देखील होते. मीठाचे सेवन कमी करणे चांगले आहे.

चहा आणि कॉफी

जर तुम्हाला स्वत: ला थंड आणि हायड्रेट ठेवायचे असेल तर चहा किंवा कॉफी टाळा. ते आपल्या शरीराचे तापमान वाढवतात. यामुळे आपली पाचन प्रणाली विचलित होऊ शकते. यामुळे डिहायड्रेशन देखील होते. त्याऐवजी तुम्ही लिंबू पाणी, कैरीचे पन्ने, ताक इत्यादींचे सेवन करू शकता.

तळलेले आणि जंक फूड

तळलेले पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नाहीत. आपले आवडते समोसे, बर्गर, फ्रेंच फ्राइज, जंक फूड इत्यादी आपणास डिहायड्रेशन करू शकतात. उन्हाळ्याच्या महिन्यात जंक फूड पचन करणे देखील कठीण असते. तर उन्हाळ्यात तळलेले आणि जंक फड्सचा समावेश आहारात करणे टाळा.

लोणचे

लोणच्यामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. लोणच्याचा अति प्रमाणात वापर टाळावा. यामुळे सूज येणे आणि डिहायड्रेशनसह समस्या उद्भवू शकतात. उच्च सोडियमयुक्त आहारामुळे संक्रमण आणि अल्सरची समस्या उद्भवू शकते. म्हणून जास्त लोणचे सेवन करणे टाळा.

मसाले

उन्हाळ्याच्या काळात नेहमीच मसालेदार खाणे टाळावे. हे आपल्या आरोग्यासाठी त्रासदायक आहे. मसालेदार पदार्थांमध्ये मुख्यतः कॅप्सॅसिन असते. यामुळे जास्त घाम येतो. तसेच यामुळे त्वचेशी संबंधित समस्या, डिहायड्रेशन आणि इतर अनेक रोग होतात. म्हणून, उन्हाळ्याच्या काळात मसालेदार अन्न टाळावे.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

(Avoid these 5 foods during the summer season)

Follow Us
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.