AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्यात कोणत्या पिठाची पोळी खाणे आरोग्यास ठरेल फायदेशीर, जाणून घ्या आहारतज्ञांकडून

पावसाळ्याच्या हंगामात हवामानातील आर्द्रता आणि ओलावा यामुळे पोळ्या लवकर खराब होतात आणि पोटाचे आजार वाढू लागतात. अशा परिस्थितीत आहारतज्ज्ञांनी पावसाळ्यात पोळ्या खाण्यासाठी कोणत्या पीठाचा वापर करावा हे सांगितले आहे. चला तर मग आजच्या या लेखात त्याबद्दल जाणून घेऊयात...

पावसाळ्यात कोणत्या पिठाची पोळी खाणे आरोग्यास ठरेल फायदेशीर, जाणून घ्या आहारतज्ञांकडून
Poli
| Edited By: | Updated on: Jul 18, 2025 | 3:43 PM
Share

पावसाळा सुरू होताच शरीराची पचनसंस्था थोडी कमकुवत होते. या ऋतूतील आर्द्रता आणि दमटपणामुळे पदार्थ लवकर खराब होते आणि पोटाचे आजार वाढू लागतात. त्यामुळे खाण्यापिण्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. अशातच आपल्या रोजच्या आहारात असलेली पोळीचे मात्र पावसाळ्याच्या दिवसांमध्ये विचारपूर्वक खावी. आहारतज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात हलक्या आणि सहज पचणाऱ्या पिठापासून बनवलेल्या रोट्या खाणे चांगले.

आहार तज्ञांचे म्हणणे आहे की बाजरी, मका किंवा नाचणी यांसारख्या जड धान्यांपासून बनवलेल्या भाकरी किंवा पोळीचे सेवन पावसाळ्यात टाळाव्यात कारण त्या पचण्यास जास्त वेळ घेतात आणि त्यामुळे पोटात गॅस किंवा जडपणासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्याऐवजी, या हंगामात गहू, ज्वारी आणि बेसन यांचा आहारात समावेश करणे अधिक फायदेशीर आहे . गव्हाचे पीठ हलके असते, ज्वारीमध्ये फायबर आणि खनिजे असतात आणि बेसन प्रथिने समृद्ध असते जे पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते.

आहारतज्ज्ञांचा सल्ला 

काही लोकं गव्हाच्या पिठामध्ये थोडे ओट्स पावडर, जवस पावडर किंवा सातू घालूनही पोळ्या बनवतात, ज्यामुळे रोट्या केवळ चविष्टच नाहीत तर अधिक आरोग्यदायी देखील बनतात. या मिश्रणांपासून बनवलेल्या रोट्या शरीराला आवश्यक पोषण प्रदान करतात आणि पावसाळ्यात पचन बिघडण्यापासून देखील रोखतात. आहारतज्ज्ञ असा सल्ला देतात की या ऋतूत पोळ्या ताज्या बनवा आणि त्यांचे सेवन करा. तसेच पोळी खाताना त्यात देशी तुप लावून सेवन केल्यास पचन सुधारते आणि पोळीची किंवा भाकरीची चव देखील वाढते.

गहू, ज्वारी आणि बेसनापासून हे प्रकार बनवा

या तीन पिठांचा वापर फक्त पोळ्या किंवा भाकरी बनवण्यापुरता मर्यादित नाही. तर या पौष्टिक पिठापासून तुम्ही अनेक प्रकार बनवू शकता. त्यातच तेच तेच खाऊन तुम्हाला कंटाळा देखील येणार नाही. तर या पिठापासून काय काय बनवता येईल ते पाहूयात…

1. गव्हाच्या पिठाचा हलवा

गव्हाचे पीठ तुपात चांगले भाजून घ्या त्यानंतर त्यात गूळ आणि ड्रायफ्रुट्स टाका. आता यात गरजेनुसार पाणी टाकूनही शिजवा. ही पारंपारिक डिश शरीराला ऊर्जा देते आणि पावसाळ्यात सर्दी आणि खोकल्यापासून देखील तुमचे रक्षण करू शकते.

2. ज्वारी चिल्ला

ज्वारीच्या पीठात दही, मीठ, मसाले आणि चिरलेल्या भाज्यां मिक्स करून त्यात पाणी टाकून मऊ पातळ पीठ तयार करा. आता हे मिश्रण पॅनवर टाका आणि शिजवा. ही डीश फायबर आणि लोहाने समृद्ध आहे.

3. बेसन पिठाचा ढोकळा

बेसनचा ढोकळा सर्वांणाच खायला आवडते. तसेच हा ढोकळा बनवणे खूप सोपे आहे. तर बेसन पीठात दही, लिंबू किंवा बेक होण्यासाठी इनो टाकून मध्यम अशी पेस्ट करा. आता एका वाडघ्यात हे मिश्रण ओता आणि वाफवून घ्या. नाश्त्यासाठी किंवा हलक्या रात्रीच्या जेवणासाठी हे उत्तम आहे.

4. गव्हाच्या पिठाची लिट्टी

बिहारमधील पारंपारिक पदार्थ लिट्टी हा गव्हाच्या पिठापासून बनवला जातो, यात गव्हाच्या पिठाचा गोळा तयार करून त्यात सत्तू (बारीक केलेले चण्याची पावडर) मसाले आणि लिंबू भरले जाते आणि भाजून घेतले जातात. हा तयार झालेला चोखा वांगी, बटाट्याची चटणी सोबत खाल्ले जाते.

5. बेसन चिल्ला

बेसन चिल्ला हा झटपट होणारा पदार्थ आहे, पावसाळ्यात हा चिल्ला गरम गरम खायला प्रत्येकाला आवडते, तर हा बेसन चिल्ला बनवण्यासाठी बेसन पिठात पाणी, मीठ आणि हळद मिसळा, त्यात कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून पातळ पेस्ट तयार करा. आता हे मिश्रण तव्यावर टाकून भाजून घ्या. हा एक जलद, प्रथिनेयुक्त नाश्ता आहे.

6. गहू किंवा चणा सत्तू पेय

उन्हाळ्यात किंवा दमट हवामानात, सत्तूपासून बनवलेले नमकीन किंवा गोड सरबत खूप फायदेशीर असते. ते पोटाला थंडावा देते आणि बराच वेळ भूक लागत नाही.

7. ज्वारी उपमा किंवा खिचडी

ज्वारीची बारीक भरड पुड तयार करून ठेवा आणि नंतर यापासून भाज्या आणि डाळींच्या साहाय्याने उपमा किंवा खिचडी बनवता येते. उपमा किंवा खिचडी ही डिश पचनक्षम आहे आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक