AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवीन घरात रोज वाद होतायेत का? ‘हे’ वास्तू उपाय करा

Vastu Tips for New Home: तुमच्या नवीन घरात वाद होत आहेत का? नवीन घरात प्रवेश करता तेव्हा त्या घराबद्दल मनात अनेक अपेक्षा असतात. पण, येणारा काळ आपल्यासाठी नवीन संधी घेऊन येईल, असे आपल्याला वाटते तरी कधीकधी गोष्टी आपल्याला वाटतात तशा घडत नाहीत. मग, टेन्शन घेत न बसता आम्ही खाली सांगितलेले उपाय जाणून घ्या.

नवीन घरात रोज वाद होतायेत का? ‘हे’ वास्तू उपाय करा
| Edited By: | Updated on: Jan 03, 2025 | 3:08 PM
Share

Vastu Tips for New Home : नवीन घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. तुम्ही नवीन घरात प्रवेश करता तेव्हा त्या घराबद्दल मनात अनेक भविष्याचे प्लॅनिंग केलेले असतात. पण, अचानक घरात वाद होऊ लागतात, नकारात्मक वाटायला लागते. पण, काळजी करू नका. यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत, हे उपाय करून तुम्ही घरातील वास्तूदोष दूर करू शकता. चला तर मग जाणून घेऊया नवीन घराचा वास्तूदोष दूर करण्याचे उपाय.

वास्तुशास्त्रानुसार नवीन घर किंवा फ्लॅटमध्ये सर्व काही व्यवस्थित चालत नसेल तर हे उपाय तुम्हाला मदत करू शकतात. वास्तूच्या या उपायांनी गोष्टी पुन्हा रुळावर येऊ शकतात, तुमच्या विचाराप्रमाणे घरात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही आणि सुख-शांती मिळेल. चला जाणून घेऊया वास्तुचे उपाय.

गुळाचे दान करावे

वास्तुशास्त्रानुसार नवीन घरात किंवा फ्लॅटमध्ये प्रवेश करताच कुटुंबातील कोणी आजारी असेल तर गुळाचे दान करावे आणि जेवल्यानंतर सर्व सदस्यांनी गूळ खावा. असे केल्याने वास्तूदोष दूर होतो. दुसरीकडे नवीन घरात किंवा फ्लॅटमध्ये हवा सुरळीत येत नसेल तर खोल्यांमध्ये गुदमरल्यासारखे वाटत असेल तर तो वास्तुदोष आहे, त्यासाठी दूध, साखर, तांदूळ, कापूर इत्यादी पांढऱ्या वस्तूंचे दान करावे.

घरात पिवळ्या रंगाचे पडदे लावा

नवीन घर किंवा फ्लॅटमध्ये प्रवेश करताच हळूहळू सर्व काही बिघडत चालले आहे, जर गोष्टी अडकत असतील तर संपूर्ण घरात पिवळ्या रंगाचे पडदे वापरा. तसेच संपूर्ण घरात हळदीचे द्रावण शिंपडावे, जेणेकरून नवग्रहांमधील सर्वात शुभ ग्रह गुरूच्या आशीर्वादाने कुटुंबाची भरभराट होऊ लागेल. त्याचबरोबर कुंडलीतील गुरूची स्थितीही मजबूत असते, ज्यामुळे नशिबाला नेहमीच साथ मिळते.

मसूर रात्री घराभोवती पसरवावी

सूर्याची किरणे सकाळी घरात येणे आवश्यक मानले जाते, परंतु जर आपल्या नवीन घरात किंवा फ्लॅटमध्ये अंधार असेल तर तो वास्तुदोषाच्या श्रेणीत येतो आणि दुर्दैव, रोग, दु:ख इत्यादी निर्माण करतो. यासाठी लाल डाळ म्हणजे मसूर रात्री घराभोवती पसरवावी आणि सकाळी उठून बाहेर फेकून द्यावी. असे केल्याने घरातील वास्तूदोष दूर होऊन घरात सुख-शांती राहील.

खीर प्रसादाचे वाटप करा

घरात वारंवार ओलसरपणा येतो, बराच प्रतिबंध करूनही ओलसरपणा दूर होत नाही. तसेच तेथे राहणाऱ्या व्यक्तींना श्वसनाचे आजार किंवा दमा वगैरे दीर्घ काळ असल्यास सोमवारी देवाला खीर अर्पण करावी. सर्वांना खीर प्रसादाचे वाटप करा. असे केल्याने वास्तुदोषामुळे होणारा हा आजार दूर होईल आणि इमारतीचा वास्तूदोषही दूर होईल.

नारळासह तांब्याचे नाणे पाण्यात विसर्जित करा

नवीन घरात किंवा फ्लॅटमध्ये प्रवेश करताच नातेवाइकांशी विनाकारण वाद होत असल्यास तांब्याचे पैसे दान करा आणि नारळासह तांब्याचे नाणे पाण्यात विसर्जित करा. तसेच धार्मिक ग्रंथांचे दान करा, असे केल्याने वास्तुदोष दूर होईल आणि सर्वजण खूप प्रसन्न ही दिसतील. दुसरीकडे घरातील मुले गोष्टी ऐकत नसल्यास किंवा अभ्यासात मन लागत नसेल तर तांब्यावर बनवलेले सूर्ययंत्र मुख्य दरवाजावर ठेवावे किंवा पूजास्थळी स्थापित करून त्याची पूजा करावी.

पिंपळाच्या झाडाजवळ तेलाचा दिवा लावावा

नवीन घरात किंवा फ्लॅटमध्ये प्रवेश करताच आर्थिक अडचणी, नोकरीत अचानक घट किंवा कोणताही बदल न झाल्यास मोहरीच्या तेलाचे दान करून शनिवारी सायंकाळी पिंपळाच्या झाडाजवळ तेलाचा दिवा लावावा. असे केल्याने वास्तुदोषांमुळे निर्माण होणाऱ्या या समस्या कमी होऊ लागतील आणि आर्थिक स्थितीही सुधारेल.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला