पावसाळ्यात ना धान्याला किडे लागतील, ना पीठ खराब होईल, फक्त लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी
पावसाळा ऋतू म्हणजे वातावरण अगदी आल्हाददायक वाटते, परंतु या काळात स्वयंपाकघरातील आर्द्रता वाढल्यामुळे गोष्टी लवकर खराब होऊ लागतात. अशातच तुम्ही काही छोटे घरगुती उपाय करून या समस्या सहजपणे टाळू शकता. चला तर मग आजच्या या लेखात आपण पावसाळ्यात तांदुळ, पीठ,डाळी, मसाले खराब होऊ नये यासाठी कोणत उपाय प्रभावी आहेत ते जाणून घेऊयात...

एकीकडे पावसाळा थंडावा आणि आराम घेऊन येतो, तर दुसरीकडे वातावरणातील आर्द्रतेमुळे स्वयंपाकघरात अनेक समस्या निर्माण करतो. कारण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्यापैकी अनेकजण हे स्वयंपाक घरात लागणारे सामान जास्त भरून ठेवतात. यामध्ये सर्वाधिकपणे तांदूळ, पीठ, बेसन आणि मसाले यांचा समावेश असतो. पण पावसाळ्यात दमट वातावरणामुळे काही दिवसांतच धान्य, पिठात किड लागते आणि अळ्या तयार होतात. काही वेळी ओलसर ठिकाणी या वस्तू ठेवल्याने बुरशी लागते. त्यामुळे महिलांना या गोष्टी महिनाभर कसे टिकवून ठेवायचे याची खूप चिंता असते.
पण यात चांगली गोष्ट म्हणजे आजींचे काही जुने उपाय आजही तितकेच प्रभावी आहेत जितके ते पूर्वी होते. आज या लेखात आम्ही तुम्हाला असे सोपे आणि घरगुती उपाय सांगणार आहोत जे तुमच्य स्वयंपाक घरातील खाद्य पदार्थांचे कीटकांपासून संरक्षण करतीलच, शिवाय ताजेपणा आणि चव देखील टिकवून ठेवतील. चला तर मग या घरगूती उपायांबद्दल जाणून घेऊयात…
डाळी आणि पीठ अशा प्रकारे ठेवा
पावसाळ्यात डाळी आणि पीठ यांना अनेकदा अळ्या किंवा किड लागते. अशा परिस्थितीत यापासून बचाव करण्यासाठी यामध्ये तमालपत्रांचा वापर करा. कारण हे सुगंध नैसर्गिक कीटकनाशक म्हणून काम करते. तर हे तमालपत्र तुम्ही डाळी, पीठ किंवा सुक्या मसाल्यांच्या डब्यांमध्ये ठेवा. यामुळे अळ्या आणि किडं त्यांच्यावर हल्ला करणार नाहीत आणि गोष्टी ताज्या राहतील.
२. पीठ, मैदा किंवा बेसन अशा प्रकारे ठेवा
पावसाळ्यात आर्द्रतेमुळे पीठ आणि बेसन लवकर खराब होऊ शकते. यासाठी यांना हलके भाजून घ्या आणि नंतर हवाबंद डब्यात ठेवा. हे उपाय ओलावा दूर ठेवते आणि या पीठांचे शेल्फ लाइफ देखील वाढवते.
बिस्किटांना अशा प्रकारे ठेवा
पावसाळ्यात बिस्किटे लवकर सील होतात आणि चवीला चांगली लागत नाहीत. अशा परिस्थितीत बिस्किटांच्या डब्यांमध्ये थोडी साखर टाका. साखर ही एक नैसर्गिक डेसिकेंट (ओलावा शोषून घेणारा पदार्थ) आहे, जी बिस्किटे कोरडे आणि कुरकुरीत ठेवते.
तांदुळांना किडींचा प्रादुर्भाव होण्यापासून असे रोखा
पावसाळ्यात तांदळांना किडं लवकर लागते, ज्यामुळे सर्व तांदुळ खराब होतो. यासाठी तांदळाच्या डब्यात काही सुक्या कडुलिंबाची पाने ठेवा, ज्यामुळे तांदळांना कीटकांपासून संरक्षण मिळेल. कडुलिंबाचा सुगंध तांदळ्याच्या भुंग्यांना दूर ठेवतो आणि आर्द्रतेपासून देखील संरक्षण होते.
कॉफी खराब होणार नाही
पावसाळ्यात दमट वातावरणामुळेकॉफी पावडर लवकर ओली होते. यासाठी कॉफी पावडर खराब होऊ नये यासाठी काही तांदूळ कापडात गुंडाळा आणि कॉफीच्या डब्यात ठेवा. तांदूळ अतिरिक्त ओलावा शोषून घेतो, ज्यामुळे कॉफी कोरडी आणि सुगंधीत राहते.
मीठ ओले होऊ देऊ नका
पावसाळ्यात आर्द्रतेमुळे मीठ देखील ओलसर होते. तर यासाठी मीठाच्या डब्यात तांदळाचा एक छोटाशी पुड बांधुन ठेवा. ते अतिरिक्त ओलावा शोषून घेते, ज्यामुळे मीठ घट्ट होत नाही आणि कोरडे राहते.
साखरेतील मुंग्यांपासून बचाव
उन्हाळ्यापासून पावसाळ्यापर्यंत साखरेवर मुंग्यांचा हल्ला होण्याची समस्या दिसून येते. अशा परिस्थितीत साखरेच्या डब्यात 4-5 लवंगा ठेवा. लवंगाचा तीव्र सुगंध मुंग्यांना दूर ठेवतो आणि साखरेमध्ये कोणताही संसर्ग होत नाही.
फ्रिजमध्ये भाज्या ताज्या राहतील
पावसाळ्यात ओल्याव्यामुळे भाज्या खूप लवकर खराब होतात. जरी त्या फ्रिजमध्ये ठेवल्या तरी. जर तुम्हाला भाज्या ताज्या ठेवायच्या असतील तर फ्रिजमधील वर्तमानपत्र किंवा पेपर टॉवेल ठेऊन त्यावर भाज्या ठेवा यामुळे अतिरिक्त ओलावा शोषला जातो आणि भाज्या खराब होण्यापासून रोखल्या जातात.
बुरशीजन्य संसर्गापासून लोणचे दूर कसे ठेवायचे
लोणचे नेहमी हवाबंद काचेच्या बरणीत ठेवा आणि त्यावर मोहरीच्या तेलाचा थर लावा. हे तेल संरक्षक म्हणून काम करते आणि लोणचे बराच काळ ताजे ठेवते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
