AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात बऱ्याच दिवस पालेभाज्या राहतील फ्रेश, फॉलो करा या खास टिप्स

थंडीच्या दिवसांमध्ये हिरव्या पालेभाज्या बाजारात भरपूर प्रमाणात मिळतात. तर अनेकजण या दिवसांमध्ये पालेभाज्या रेफ्रिजरेटरमध्ये साठवून ठेवतात पण या भाज्या दोन दिवसातच खराब होतात. तर आजच्या लेखात आपण पालेभाज्या ताज्या ठेवण्यासाठी या काही टिप्स आणि ट्रिक्स जाणून घेऊयात.

हिवाळ्यात बऱ्याच दिवस पालेभाज्या राहतील फ्रेश, फॉलो करा या खास टिप्स
Leafy VegetablesImage Credit source: Getty Images
| Edited By: Sanjay patil | Updated on: Nov 14, 2025 | 2:47 AM
Share

हिवाळा ऋतू सुरू झाल्याने सर्वत्र थंड वारे वाहत आहेत आणि बाजारांमध्ये पालक, मेथी, मोहरी, चवळीची भाजी आणि कोथिंबीर अशा हिरव्या पालेभाज्या अगदी फ्रेश ताज्या आणि हिरव्यागार विकायला येतात. कारण हिवाळ्यात पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. कारण या पालेभाज्यांचे सेवन केल्याने शरीराला आतून उबदारपणा आणि विविध फायदे प्रदान होतात. तसेच हिवाळ्यात प्रत्येक भारतीय घरांमध्ये पालेभाज्या सामान्यतः आहारात समावेश करतात. ज्यामुळे पोषक तत्वांनी समृद्ध या पालेभाज्या प्रत्येक महिला मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. तर हिवाळ्यात खरेदी केलेल्या या पालेभाज्या जास्त दिवस ताज्या ठेवता येत नाहीत.

तर आपल्यापैकी अनेकजण एकाचवेळी जास्त पालेभाज्या आणून रेफ्रिजरेटरमध्ये किंवा बाहेर स्टोअर करून ठेवतात पण दोन दिवसातच त्या संपवाव्या लागतात. जर वेळीच या पालेभाज्या संपवल्या नाही तर त्या खराब होऊ लागतात आणि आपण त्या फेकून देतो. यामुळे एवढ्या महागमोलाच्या पालेभाज्या फेकून दिल्या तर त्या वायाच जातात. यासाठी हिवाळ्यात आणलेल्या पालेभाज्या फ्रेश आणि दिर्घकाळासाठी फ्रिजमध्ये स्टोअर करायचा असतील तर या काही खास टिप्सचा अवलंब करा. चला तर मग आजच्या लेखात आपण या खास टिप्सबद्दल जाणून घेऊयात.

पालेभाज्या लगेच धुऊन रेफ्रिजरेटरमध्ये ठेऊ नका

आपल्यापैकी अनेकजण भाज्या खरेदी केल्यानंतर लगेच धुवून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्याची चूक करतात. यामुळे पानांमध्ये ओलावा राहतो, ज्यामुळे त्या लवकर खराब होतात. म्हणून प्रथम पालेभाज्या वर्तमानपत्रावर किंवा सुती कापडावर पसरवा आणि त्यांना 10-15 मिनिटे हवेत सुकू द्या. त्यानंतरच त्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.

पेपर टॉवेल किंवा सुती कापडात बांधून ठेवा

भाज्या सुकवल्यानंतर त्या कोरड्या सुती कापडात किंवा पेपर टॉवेलमध्ये गुंडाळा. यामुळे जास्त ओलावा निघून जातो आणि भाज्या सुकल्या जात नाही. विशेषतः धणे, पुदिना आणि मेथी ताजे ठेवण्यासाठी हा उपाय प्रभावी आहे.

हवाबंद डब्यात साठवा

भाज्या थेट प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये साठवल्याने हवा फिरण्यापासून रोखली जाते आणि त्यात बुरशी निर्माण होऊ शकते. म्हणून पालेभाज्या नेहमी हवाबंद डब्यात किंवा छिद्रे असलेल्या डब्यात ठेवाव्यात. जेणेकरून भाज्या 1-2 दिवस ताज्या राहतील.

पालक आणि मोहरीची भाजी नेहमी वेगवेगळी ठेवावी

प्रत्येक पालेभाज्याची पोत आणि आर्द्रता वेगवेगळी असते. म्हणून, पालक, मोहरी यासारख्या भाज्या एकत्र साठवू नयेत. जर त्या पॉलिथिनच्या पिशव्या किंवा कंटेनरमध्ये वेगळ्या साठवल्या तर त्या जास्त काळ ताज्या राहतील.

रेफ्रिजरेटरचा क्रिस्पर बॉक्स वापरा

रेफ्रिजरेटरच्या तळाशी असलेला क्रिस्पर बॉक्स भाज्यांसाठी सर्वोत्तम जागा आहे. कारण क्रिस्पर बॉक्समध्ये तापमान आणि आर्द्रता संतुलित राखली जातात. ज्यामुळे पालेभाज्या फ्रेश राहतात. या बॉक्समध्ये ठेवलेल्या भाज्या 2 ते 4 दिवस ताज्या राहतात.

कोथिंबीर आणि पुदिन्यासाठी पाण्यात ठेवल्याने राहतील फ्रेश

कोथिंबीर किंवा पुदिना ताजे ठेवण्याचा आणखी एक प्रभावी मार्ग म्हणजे त्यांना पाण्यात ठेवणे. तर कोथिंबीर आणि पुदिन्याची देठ न कापता, त्यांना पाण्याने भरलेल्या ग्लासमध्ये ठेवा आणि प्लास्टिकच्या आवरणाने झाकून ठेवा. यामुळे पाने सुकली जात नाही आणि ती 34 दिवसांपर्यंत ताजी राहतात.

Follow Us
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...