AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात बऱ्याच दिवस पालेभाज्या राहतील फ्रेश, फॉलो करा या खास टिप्स

थंडीच्या दिवसांमध्ये हिरव्या पालेभाज्या बाजारात भरपूर प्रमाणात मिळतात. तर अनेकजण या दिवसांमध्ये पालेभाज्या रेफ्रिजरेटरमध्ये साठवून ठेवतात पण या भाज्या दोन दिवसातच खराब होतात. तर आजच्या लेखात आपण पालेभाज्या ताज्या ठेवण्यासाठी या काही टिप्स आणि ट्रिक्स जाणून घेऊयात.

हिवाळ्यात बऱ्याच दिवस पालेभाज्या राहतील फ्रेश, फॉलो करा या खास टिप्स
Leafy VegetablesImage Credit source: Getty Images
| Edited By: | Updated on: Nov 14, 2025 | 2:47 AM
Share

हिवाळा ऋतू सुरू झाल्याने सर्वत्र थंड वारे वाहत आहेत आणि बाजारांमध्ये पालक, मेथी, मोहरी, चवळीची भाजी आणि कोथिंबीर अशा हिरव्या पालेभाज्या अगदी फ्रेश ताज्या आणि हिरव्यागार विकायला येतात. कारण हिवाळ्यात पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. कारण या पालेभाज्यांचे सेवन केल्याने शरीराला आतून उबदारपणा आणि विविध फायदे प्रदान होतात. तसेच हिवाळ्यात प्रत्येक भारतीय घरांमध्ये पालेभाज्या सामान्यतः आहारात समावेश करतात. ज्यामुळे पोषक तत्वांनी समृद्ध या पालेभाज्या प्रत्येक महिला मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. तर हिवाळ्यात खरेदी केलेल्या या पालेभाज्या जास्त दिवस ताज्या ठेवता येत नाहीत.

तर आपल्यापैकी अनेकजण एकाचवेळी जास्त पालेभाज्या आणून रेफ्रिजरेटरमध्ये किंवा बाहेर स्टोअर करून ठेवतात पण दोन दिवसातच त्या संपवाव्या लागतात. जर वेळीच या पालेभाज्या संपवल्या नाही तर त्या खराब होऊ लागतात आणि आपण त्या फेकून देतो. यामुळे एवढ्या महागमोलाच्या पालेभाज्या फेकून दिल्या तर त्या वायाच जातात. यासाठी हिवाळ्यात आणलेल्या पालेभाज्या फ्रेश आणि दिर्घकाळासाठी फ्रिजमध्ये स्टोअर करायचा असतील तर या काही खास टिप्सचा अवलंब करा. चला तर मग आजच्या लेखात आपण या खास टिप्सबद्दल जाणून घेऊयात.

पालेभाज्या लगेच धुऊन रेफ्रिजरेटरमध्ये ठेऊ नका

आपल्यापैकी अनेकजण भाज्या खरेदी केल्यानंतर लगेच धुवून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्याची चूक करतात. यामुळे पानांमध्ये ओलावा राहतो, ज्यामुळे त्या लवकर खराब होतात. म्हणून प्रथम पालेभाज्या वर्तमानपत्रावर किंवा सुती कापडावर पसरवा आणि त्यांना 10-15 मिनिटे हवेत सुकू द्या. त्यानंतरच त्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.

पेपर टॉवेल किंवा सुती कापडात बांधून ठेवा

भाज्या सुकवल्यानंतर त्या कोरड्या सुती कापडात किंवा पेपर टॉवेलमध्ये गुंडाळा. यामुळे जास्त ओलावा निघून जातो आणि भाज्या सुकल्या जात नाही. विशेषतः धणे, पुदिना आणि मेथी ताजे ठेवण्यासाठी हा उपाय प्रभावी आहे.

हवाबंद डब्यात साठवा

भाज्या थेट प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये साठवल्याने हवा फिरण्यापासून रोखली जाते आणि त्यात बुरशी निर्माण होऊ शकते. म्हणून पालेभाज्या नेहमी हवाबंद डब्यात किंवा छिद्रे असलेल्या डब्यात ठेवाव्यात. जेणेकरून भाज्या 1-2 दिवस ताज्या राहतील.

पालक आणि मोहरीची भाजी नेहमी वेगवेगळी ठेवावी

प्रत्येक पालेभाज्याची पोत आणि आर्द्रता वेगवेगळी असते. म्हणून, पालक, मोहरी यासारख्या भाज्या एकत्र साठवू नयेत. जर त्या पॉलिथिनच्या पिशव्या किंवा कंटेनरमध्ये वेगळ्या साठवल्या तर त्या जास्त काळ ताज्या राहतील.

रेफ्रिजरेटरचा क्रिस्पर बॉक्स वापरा

रेफ्रिजरेटरच्या तळाशी असलेला क्रिस्पर बॉक्स भाज्यांसाठी सर्वोत्तम जागा आहे. कारण क्रिस्पर बॉक्समध्ये तापमान आणि आर्द्रता संतुलित राखली जातात. ज्यामुळे पालेभाज्या फ्रेश राहतात. या बॉक्समध्ये ठेवलेल्या भाज्या 2 ते 4 दिवस ताज्या राहतात.

कोथिंबीर आणि पुदिन्यासाठी पाण्यात ठेवल्याने राहतील फ्रेश

कोथिंबीर किंवा पुदिना ताजे ठेवण्याचा आणखी एक प्रभावी मार्ग म्हणजे त्यांना पाण्यात ठेवणे. तर कोथिंबीर आणि पुदिन्याची देठ न कापता, त्यांना पाण्याने भरलेल्या ग्लासमध्ये ठेवा आणि प्लास्टिकच्या आवरणाने झाकून ठेवा. यामुळे पाने सुकली जात नाही आणि ती 34 दिवसांपर्यंत ताजी राहतात.

Follow Us
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ...
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ....
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक...
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक....
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण.
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना....
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना.....
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले...
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स.....
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत.
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक.
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?.
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश.