AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Heatstroke | उष्माघातापासून स्वतःला वाचवण्यासाठी या खास टिप्स फॉलो करा!

उन्हाळ्यात शरीराचे तापमान सामान्यपेक्षा जास्त असते. आयुर्वेदानुसार, या काळात अशा पदार्थांचे सेवन करणे चांगले मानले जाते, ज्याचा थंड प्रभाव पडतो. काकडी, कलिंगड, सत्तू आणि इतर थंड पदार्थांचे सेवन करून तुम्ही स्वतःला थंड ठेवू शकता. मात्र, या गोष्टी फक्त एकदा खाऊन चालत नाहीतर तर आपल्या दररोजच्या आहारामध्ये याचा समावेश करणे महत्वाचे आणि गरजेचे आहे.

Heatstroke | उष्माघातापासून स्वतःला वाचवण्यासाठी या खास टिप्स फॉलो करा!
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 25, 2022 | 10:27 AM
Share

मुंबई : उन्हाळ्यात (Summer) इच्छा नसताना देखील कामानिमित्त आपल्या सर्वांनाच घराच्या बाहेर पडावे लागते. या ऋतूत होणारा उष्माघात हा आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी (Skin) अत्यंत हानिकारक असतो. काही लोक उष्माघाताचे बळी ठरतात. प्रश्न पडतो की उष्माघातापासून कसे दूर राहवे. आरोग्य तज्ज्ञाच्या मते उष्माघातापासून दूर राहण्यासाठी सर्वांत महत्वाचे आहे आपला आहार. या हंगामामध्ये आपल्या आहाराची (Food) अधिक काळजी घेणे खूप जास्त महत्वाचे आहे. मजबूत प्रतिकारशक्तीमुळे आपण अनेक समस्या टाळू शकतो. त्यापैकी एक म्हणजे उष्माघात आहे. उष्ण हवेचा शरीरावर वाईट परिणाम होतो. शरीराचे तापमान वाढू लागते. अशा स्थितीत मळमळ, उलट्या, चक्कर येणे आणि इतर शारीरिक समस्या निर्माण होतात.

काकडी, कलिंगड, आणि सत्तू

उन्हाळ्यात शरीराचे तापमान सामान्यपेक्षा जास्त असते. आयुर्वेदानुसार, या काळात अशा पदार्थांचे सेवन करणे चांगले मानले जाते, ज्याचा थंड प्रभाव पडतो. काकडी, कलिंगड, सत्तू आणि इतर थंड पदार्थांचे सेवन करून तुम्ही स्वतःला थंड ठेवू शकता. मात्र, या गोष्टी फक्त एकदा खाऊन चालत नाहीतर तर आपल्या दररोजच्या आहारामध्ये याचा समावेश करणे महत्वाचे आणि गरजेचे आहे.

बेल सरबत

उष्माघातापासून बचाव करण्यासाठी बेलच्या सरबताचे सेवन अत्यंत फायदेशीर ठरते. तज्ज्ञांच्या मते उन्हाळ्यात ते औषधाचे काम करते. ग्रामीण भागात उन्हाळ्यात हे जास्त प्रमाणात पिले जाते. यामुळे या हंगामामध्ये ग्रामीण भागातील लोक जास्त आजारी पडत नाहीत. त्यात व्हिटॅमिन सी आणि फायबर सारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. फायबरमुळे तुमचे पोट निरोगी राहते.

गिलोयचे पेय

उन्हाळ्याच्या हंगामामध्ये गिलोयचे सेवन देखील फायदेशीर ठरते. तज्ज्ञांच्या मते, हे आयुर्वेदिक औषध आहे, जे शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. शरीरातील तीन दोष, वात, पित्त आणि कफ हे गिलोयने नष्ट होऊ शकतात. वात हा वायुशी संबंधित आहे आणि बहुतेक लोकांना उन्हाळ्यात या दोषाचा सामना करावा लागतो.

संबंधित बातम्या : 

Hair | केस गळतीची समस्या झटपट दूर करण्यासाठी आहारात या गोष्टींचा समावेश करा!

Skin Care Tips : त्वचा चमकदार आणि मुलायम ठेवण्यासाठी या खास टिप्स फाॅलो करा!

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.