AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jeera Water : दररोज सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर, वाचा!

जिरे हे स्वयंपाकात वापरल्या जाणार्‍या सर्वात महत्त्वाच्या मसाल्यांपैकी एक आहे. मात्र, जिरे केवळ अन्नाची चव आणि सुगंध वाढवत नाही तर त्याचे अनेक आरोग्य फायदे देखील आहेत. वजन कमी करणे, रक्तदाब नियंत्रण, पचनाच्या समस्या, मधुमेह नियंत्रण आणि अशक्तपणा यासाठी जिरे हे आरोग्य फायद्यांपैकी एक आहे.

Jeera Water : दररोज सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर, वाचा!
जिऱ्याचे पाणी
| Edited By: | Updated on: Nov 21, 2021 | 9:32 AM
Share

मुंबई : जिरे हे स्वयंपाकात वापरल्या जाणार्‍या सर्वात महत्त्वाच्या मसाल्यांपैकी एक आहे. मात्र, जिरे केवळ अन्नाची चव आणि सुगंध वाढवत नाही तर त्याचे अनेक आरोग्य फायदे देखील आहेत. वजन कमी करणे, रक्तदाब नियंत्रण, पचनाच्या समस्या, मधुमेह नियंत्रण आणि अशक्तपणा यासाठी जिरे हे आरोग्य फायद्यांपैकी एक आहे. जिऱ्यामध्ये तांबे, लोह, अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, जस्त आणि पोटॅशियमचा असतात.

-दररोज फक्त एक ग्लास जिरे पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जिरे पाणी चांगले पचन करण्यास मदत करते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते. जेव्हा पचनक्रिया व्यवस्थित असते तेव्हा शरीरातून विषारी पदार्थ सहज बाहेर पडतात. त्यामुळे वजन आणि चरबी दोन्ही लवकर कमी होतात. त्यामुळे जिऱ्याचे पाणी नियमितपणे प्यायल्यास वजन नियंत्रित ठेवता येते.

-जिरे पोटॅशियम, लोह आणि फायबरचा चांगला स्रोत आहे. जिऱ्याच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. विविध रोगांशी लढण्याव्यतिरिक्त ते वारंवार आजारी पडण्याची शक्यता कमी करण्यास देखील मदत करते.

-रिकाम्या पोटी जिऱ्याच्या पाण्याचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. जिरे शरीरातील इन्सुलिन उत्पादनास उत्तेजित करते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो.

-जिऱ्याच्या पाण्यात पोटॅशियम जास्त असते. पोटॅशियम हे एक महत्त्वाचे खनिज आहे, जे शरीराच्या योग्य कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. शिवाय, मीठाच्या हानिकारक प्रभावांना संतुलित करून रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.

जिऱ्याचे पाणी तयार करण्याची पध्दत-

जिऱ्याचे पाणी तयार करण्यासाठी एक ग्लास पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये दोन चमचे जिरे मिक्स करा आणि रात्रभर ठेवा. सकाळी हे पाणी उकळून घ्या. त्यानंतर हे जिरे पाणी गरम असताना प्या. या जिरे पाण्यामध्ये आपण मध देखील मिक्स करू शकता.

संबंधित बातम्या : 

Skin Care | चेहऱ्यावरील नको असणाऱ्या केसांमुळे त्रस्त आहात? पार्लर विसरा आणि ‘हे’ उपाय ट्राय करा!

तुम्हीसुद्धा सकाळी नाश्त्यामध्ये ‘पोहे’ खाता का? मग जाणून घ्या आरोग्यावर काय होतो परिणाम!

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.