AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोड आलेले कडधान्य आरोग्यासाठी पोषणचा खजिना, 21 दिवस खाल्ल्याने तुम्हाला मिळतील ‘हे’ फायदे

आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी आपण आपल्या आहारात डाळी, हिरव्या भाज्या आणि इतर अनेक प्रकारचे पदार्थांचे समावेश करत असतो. त्याचप्रमाणे मोड आलेले कडधान्य यांचे सेवन सुद्धा तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करू शकतात. चला तर मग दररोज मोड आलेले कडधान्य खाणे आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरतात हे तज्ञांकडून जाणून घेऊयात.

मोड आलेले कडधान्य आरोग्यासाठी पोषणचा खजिना, 21 दिवस खाल्ल्याने तुम्हाला मिळतील 'हे' फायदे
Pulses
| Edited By: | Updated on: Aug 26, 2025 | 2:23 PM
Share

आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपले आरोग्या चांगले राहावे यासाठी आपल्या रोजच्या आहारात अनेक पोषकतत्व असलेल्या पदार्थांचे सेवन करत असतो. जसे की फळे आणि भाज्या तसेच डाळींचा समावेश असणे आवश्यक असते. पण त्याच बरोबर तुम्ही तुमच्या आहारात किंवा नाश्त्यात मोड आलेले कडधान्यांचा समावेश करू शकतात. तर अनेकांना नाश्त्यामध्ये स्प्राउट्स खाणे आवडते. कारण हे एक प्रथिनांचा एक चांगला स्रोत मानले जाते. तर यामध्ये फायबर देखील चांगल्या प्रमाणात आढळते. जे पोट बराच काळ भरलेले ठेवण्यास मदत करते. मोड आलेले कडधान्य तुमच्या शरीरासाठी वरदानापेक्षा कमी नाही. तुम्ही ते तुमच्या सकाळच्या नाश्त्यात समाविष्ट करू शकता. तुम्ही पाहिले असेल की जे लोक जिमला जातात ते त्यांच्या आहारात प्रथिनांसाठी मोड आलेले मूगाचे समावेश करतात.

स्प्राउट्स केवळ प्रथिनांचा चांगला स्रोत नाही तर त्यात इतर अनेक पोषक घटक देखील असतात जे आपल्या एकूण आरोग्यासाठी फायदेशीर असतात. तुम्ही तुमच्या आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. अशातच तुमच्या आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करणे तुमच्यासाठी कसे फायदेशीर ठरू शकते हे तज्ञांकडून जाणून घेऊया.

तज्ञ काय म्हणतात?

नोएडातील मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील क्लिनिकल न्यूट्रिशन हेड डॉ. करुणा चतुर्वेदी यांनी सांगितले आहे की, निरोगी राहण्यासाठी निरोगी अन्न खाणे खूप महत्वाचे आहे. यामध्ये मोड आलेले कडधान्य हे देखील एक सुपरफूड आहे. तर मोड आलेल्या कडधान्यांमध्ये पोषक तत्वांचे प्रमाण वाढते, ज्यामुळे ते पचण्यास आणि पोषक तत्वे शोषण्यास मदत होते. जर तुम्ही तुमच्या आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश केला तर ते शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते.

मोड आलेल्या कडधान्यांमध्ये प्रथिने, फायबर आणि एन्झाईम्स सारख्या पोषक तत्वांचा भरपूर प्रमाणात समावेश असतो. जे पचनासाठी फायदेशीर असतात आणि आतड्यांच्या आरोग्याला चालना देतात. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण चांगले असते. त्याच वेळी, व्हिटॅमिन के आणि त्यात असलेले कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखे खनिजे हाडे निरोगी ठेवण्यास मदत करतात.

दररोज अंकुर खाण्याचे फायदे

तज्ञांनी सांगितले की मोड आलेल्या कडधान्यांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे मधुमेहाचे रुग्ण देखील यांचे सेवन करू शकतात. कारण ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकते. हिरव्या कडधान्यांमध्ये असलेले क्लोरोफिल शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करू शकते. हिमोग्लोबिनचे प्रमाण सुधारते आणि शरीरात ऑक्सिजन योग्यरित्या प्रवाहित होतो. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये नियमितपणे खाल्ल्याने ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होण्यास मदत होते. वृद्धत्व कमी करून त्वचा निरोगी ठेवण्यास देखील मदत होते.

तुमच्या रोजच्या डाएट मध्ये एक लहान वाटी मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करणे फायदेशीर ठरेल. तुम्ही हे हलके शिजवून किंवा सॅलडसोबत कच्चे देखील खाऊ शकता. त्यात असलेले पोषक घटक शरीराला ऊर्जा देण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी आणि एकूण आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.