AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिलेशनशीपमध्ये या 4 गोष्टी हव्यातच… चौथी गोष्ट सर्वात महत्त्वाची; नाही तर…

लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये संवाद आणि विश्वास अतिशय महत्त्वाचे आहेत. नियमित संवाद साधणे, गैरसमज टाळणे आणि सरप्राईज भेटींचे नियोजन करणे हे संबंध मजबूत करण्यास मदत करते.

रिलेशनशीपमध्ये या 4 गोष्टी हव्यातच... चौथी गोष्ट सर्वात महत्त्वाची; नाही तर...
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 10, 2025 | 9:55 PM
Share

लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये अचानक गरज असताना आपला जोडीदार सोबत नसतो. तो अचानक आपल्यापासून दूर जातो. त्यामुळे एकाकीपण वाढते. त्यामुळे आपसात संवाद आणि समज कायम ठेवणं महत्वाचं आहे. ही समज कशी ठेवायची? हे अनेकांना माहीत नसतं. संबंध सुमधूर ठेण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. काही गोष्टी टाळल्या तर संबंध अधिक मजबूत होतात. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा विश्वास. तुमचा विश्वास एकमेकांवर असणं हे नातं दृढ करण्यास उपकारक ठरतं.

संवाद ठेवा

लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये संवाद साधणं एकमेव सोपा मार्ग असतो. संवाद साधण्याची संधी न मिळाल्यास, दिवसभर इतर कोणत्याही मार्गाने संवाद साधा. पण आपल्या प्रिय व्यक्तीशी संध्याकाळी किमान एकदा बोलण्याचा सर्वोत्तम पर्याय ठेवा. आता तर सर्व लोक डिजिटली एकमेकांशी जोडले जाऊ शकतात. पर्याय बरेच आहेत. त्यामुळे व्हर्च्युअल संवाद खूप महत्वाचा आहे.

चूक समजून घ्या

एकमेकांपासून दूर असल्यास चूक समजून न घेण्याची शक्यता खूप वाढते. छोट्या छोट्या मुद्द्यांवर समज आणि गैरसमज होत असतात. फोन उचलू शकले नाही, मेसेजला उत्तर देऊ शकले नाही, अशा कारणांमुळे गैरसमज वाढण्याची दाट शक्यता असते. असे होऊ नये यासाठी खबरदारी घ्या. एकमेकांच्या चुका समजून घ्या आणि त्या चूका टाळा. एकमेकांबद्दलची काळजी असणं स्वाभाविक आहे. पण ही काळजी अधिक वाढेल आणि ती वादाचं कारण बनणार नाही याची काळजी घ्या.

भेट घ्या

प्रिय व्यक्तीला भेटण्यासाठी प्लान करता येतो. पण कधी तरी एक Surprise Visit करा. आपल्या जोडीदाराला आश्चर्य वाटेल आणि तिचा आनंद द्विगुणीत होईल अशी योजना तयार करा. यामुळे जोडीदारही आनंदित होतील आणि संबंधही अधिक मजबूत होतील.

इतरांची गोष्ट महत्त्वाची नाही

जोडीदार प्रत्यक्ष समोर नसेल आणि तिसरी व्यक्ती काही तरी सांगत असेल तर त्याकडे लक्ष देऊ नका. खात्री करून घ्या, मगच विश्वास ठेवा. हवं तर प्रिय व्यक्तीला थेट त्याबाबत विचारून गैरसमज दूर करा. पण इतरांच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. त्यामुळे तुमचे संबंध खराब होऊ शकतात. एक चूक महागात पडू शकते.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.