AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता पिंपल्सच्या समस्या होणार दूर; गुलाब पाण्यात ‘या’ गोष्टी मिसळून तर पहा

benefits of rosewater on skin: सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी गुलाब पाणी अत्यंत फायदेशीर ठरते. गुलाब पाणी तुमच्या त्वचेला नैसर्गिक रित्या मॉइश्चरायझ करते. त्यासोबतच त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करते. चला तर जाणून घेऊया निरोगी त्वचेसाठी गुलाब पाण्याचा वापर कसा करावा?

आता पिंपल्सच्या समस्या होणार दूर; गुलाब पाण्यात 'या' गोष्टी मिसळून तर पहा
rose water Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Mar 02, 2025 | 3:49 PM
Share

आपल्या सर्वांना सुंदर दिसायचं असतं. परंतु आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्या पिण्याच्या सवयींमुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. बदलत्या ऋतूमध्ये योग्य काळजी नाही घेतली तर तुमची त्वचा खराब होऊ शकते. तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात परंतु त्याचा काही उपयोग होत नाही. मार्केटमधील क्रिम्सचा वापर केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर डागांच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे तुमची सुंदरताच कमी होत नाही तर तुमच्या आत्मविष्वासावरही त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे चेहऱ्यावरील समस्यांवर योग्य वेळी उपचार करणे गरजेचे असते.

त्वचा चमकदार आणि डाग मुक्त ठेवण्यासाठी तुम्ही काही सोप्या पद्धतीनं स्किन केअर केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्वचा चमकदार दिसावी म्हणून तुम्ही घरच्या घरी काही वस्तू वापरू शकता. गुलाब पाणी तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर असतं. गुलाब पाण्याचा दररोज तुमच्या चेहऱ्यावर वापर केल्यामुळे तुमची त्वचा हायड्रेटेड राहाते आणि नैसर्गिकरित्या मॉईश्चरायझ होण्यास मदत होते. गुलाब पाण्यामध्ये अनेक गुणधर्म असतात ज्यामुळे तुमच्या त्वचेसंबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. परंतु गुलाब पाण्यामध्ये काही विशेष गोष्टी मिसळल्यामुळे तुमच्या त्वचेला अणखी फायदा होऊ शकतो.

कडुलिंबाची पेस्ट आणि गुलाबपाणी

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी गुलाबपाणी देखील प्रभावी आहे. जर तुम्ही रोज चेहऱ्यावर गुलाबपाणी लावले तर तुमच्या त्वचेची चमक वाढेल. अनेकदा लोक गुलाबपाण्याचा वापर क्लींजर आणि टोनर म्हणून करतात. पण चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही त्यात काही गोष्टी मिसळून ते लावू शकता. त्वचेच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी कडुलिंबाचा वापर केला जातो. त्यात अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत, जे त्वचा स्वच्छ आणि निरोगी ठेवतात. ताज्या कडुलिंबाची पाने बारीक करून पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये एक किंवा दोन चमचे गुलाबजल घाला. आता हे मिश्रण प्रभावित भागात लावा आणि 15-20 मिनिटे तसेच राहू द्या.नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. या फेस पॅकच्या वापरामुले हळू हळू तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होते.

हळद आणि गुलाबजल

हळदीचा वापर त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्यात अँटीऑक्सिडंट्स, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत – जे त्वचेला आतून निरोगी ठेवण्यास मदत करतात. हळद त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी प्रभावी आहे आणि ती गुलाबपाण्यात मिसळून वापरली जाऊ शकते. एक चमचा हळद पावडर घ्या आणि त्यात एक चमचा गुलाबजल मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा, विशेषतः जिथे डाग आहेत तिथे. त्यानंतर 15-20 मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा. यामुळे तुमच्या पिंपल्सच्या समस्या दूर होतील आणि त्वचा चमकदार होईल.

मुलतानी माती आणि गुलाबजल

मुलतानी माती त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर मानली जाते. हे त्वचेला खोलवर स्वच्छ करण्यास, जास्तीचे तेल शोषून घेण्यास आणि डाग हलके करण्यास मदत करते. जर तुम्ही मुलतानी माती गुलाबपाण्यात मिसळून लावली तर त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत होते. एक चमचा मुलतानी माती घ्या आणि त्यात गुलाबजल मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटे सुकू द्या. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि टॉवेलने हलके पुसून टाका.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.