AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाढलेले वजन कंट्रोलमध्ये आणायचे? मग, दररोज सकाळी प्या ‘हे’ खास पेय

वाढलेल्या वजनामुळे अनेकजण त्रस्त असतात. त्यामध्ये ही सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपण व्यायाम करण्यासाठी कुठे बाहेरही जाऊ शकत नाही.

वाढलेले वजन कंट्रोलमध्ये आणायचे? मग, दररोज सकाळी प्या 'हे' खास पेय
आयुर्वेदिक काढा
| Edited By: | Updated on: May 25, 2021 | 7:01 AM
Share

मुंबई : वाढलेल्या वजनामुळे अनेकजण त्रस्त असतात. त्यामध्ये ही सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपण व्यायाम करण्यासाठी कुठे बाहेरही जाऊ शकत नाही. त्यामध्येही अनेकांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. यामुळे वजन हे वाढतच चालेले आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण आरोग्याची विशेष काळजी घेत आपले वजन कमी करण्यावर भर दिला पाहिजे. कारण वाढलेले वजन हे अनेक आजारांना निमंत्रणच देत असते. (Special drink for weight loss)

वजन कमी करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक खास पेय सांगणार आहोत. हे पेय आपण दररोज पिले तर आपले वजन कमी होण्यास नक्कीच मदत होईल. यासाठी आपल्याला एक लिंबू, हळद, काळी मिरी आणि गरम पाणी लागणार आहे. यासाठी सर्वात प्रथम पाणी गरम करण्यासाठी मंद आचेवर ठेवा आणि त्यामध्ये काळी मिरी, हळद मिक्स करा, पाणी चांगले उकळूद्या आणि शेवटी यामध्ये लिंबू मिक्स करा. हे पाणी पिल्याने आपले वजन कमी होण्यास मदत होईल. दिवसातून एक वेळा तरी हे पाणी घेतले पाहिजे.

लिंबामध्ये ‘व्हिटॅमिन सी’ची उपलब्धता जास्त असल्यामुळे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास त्याचा चांगला उपयोग होतो. लिंबू सेवनामुळे रक्त शुद्धीकरणासाठी मदत होते. त्यामुळे शरीरात निर्माण होणाऱ्या विविध विषांपासून मुक्तता मिळू शकते. लिंबामध्ये औषधी गुणधर्मही आहेत. रोज हळद, लिंबू आणि मध घेतल्याने लठ्ठपणा देखील दूर होण्यास मदत होते. तसेच, त्वचेशी संबंधित समस्यांपासून मुक्तता देखील होते. हळदीमुळे आपल्या शरीरात साखरेची पातळी व्यवस्थित राहते.

आपल्या शरीरात तयार होणार्‍या विषारी पदार्थांमुळे आपल्या यकृताला मोठा धोका असतो. परंतु हळद, लिंबू आणि मध यांचे सेवन केल्यास यकृत या विषारी पदार्थांच्या प्रभावापासून वाचतो. काळी मिरी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. काळी मिरी बर्‍याच रोगांमध्येही हे प्रभावी मानली जाते. काळ्यामिरीत पेपरिन नावाचा घटक असतो. हा घटक औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. यात लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, जस्त, क्रोमियम, व्हिटामिन ए आणि इतर पोषक गुणधर्म आढळतात.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Special drink for weight loss)

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.