AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोळ्यांना सर्वाधिक नुकसान पोहोचवतात हे पदार्थ, दृष्टीही जाऊ शकते; खाण्यापूर्वी 10 वेळा विचार करा

आपण रोज खात असलेल्या पदार्थांचा आपल्या आरोग्यावर विशेष परिणाम होतो. खासकरुन आपल्या डोळ्यांवर, दृष्टीवर. कोणते असे पदार्थ आहेत जे खाणे टाळावेत हे जाणून घेऊया..

डोळ्यांना सर्वाधिक नुकसान पोहोचवतात हे पदार्थ, दृष्टीही जाऊ शकते; खाण्यापूर्वी 10 वेळा विचार करा
Junk FoodImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 20, 2025 | 2:18 PM
Share

आजच्या काळात आपण आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेऊ शकत नाही. अनेकदा आपण कामात इतके व्यस्त होतो की, आपण आपल्या डोळ्यांची काळजी घेणेही विसरतो. डोळे हे आपल्या शरीराचा नाजूक भाग आहेत. त्यामुळेच आपण या सुंदर जगाला पाहू शकतो. परंतू धावपळीच्या जीवनात आपण तासन्तास मोबाइल आणि लॅपटॉपच्या स्क्रीनवर वेळ घालवतो. याचा आपल्या डोळ्यांवर नकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

त्याचबरोबर चुकीच्या खाण्यापिण्याचाही आपल्या डोळ्यांवर मोठा परिणाम होतो. बरेचदा लोक डोळ्यांची काळजी दुर्लक्षित करतात, विशेषतः जेव्हा खाण्यापिण्याचा प्रश्न येतो. आपण जे काही खातो, त्याचा थेट परिणाम आपल्या शरीराच्या अवयवांवर होतो, यात डोळ्यांचाही समावेश आहे. अनेकदा आपण असे पदार्थ रोज खातो जे हळूहळू डोळ्यांची दृष्टी कमकुवत करतात. विशेषतः जंक फूड, जास्त साखरयुक्त किंवा तळलेले पदार्थ केवळ शरीरालाच नव्हे तर डोळ्यांच्या आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकतात.

वाचा: 4 मुलांची आई, घनदाट जंगलातील गुहेत एकटीच राहायची, मग डॉक्टरशिवाय मुलांना कसा दिला जन्म?; तिनेच सांगितलं रहस्य

कोणते पदार्थ आपल्या डोळ्यांवर वाईट परिणाम करतात, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

मैद्यापासून बनलेले ब्रेड आणि पास्ता

मैदा केवळ आपल्या आरोग्यासाठीच नव्हे तर डोळ्यांच्या आरोग्यासाठीही हानिकारक आहे. आपण रोज ब्रेड खातो आणि पास्ताही बनवतो. यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, जे सहज पचतात. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते, ज्याचा डोळ्यांना नुकसान पोहोचते. याऐवजी तुम्ही ब्राउन ब्रेड किंवा रव्या पासून बनवलेला पास्ता खाऊ शकता.

जंक फूड

डोळ्यांसाठी सर्वात हानिकारक पदार्थांमध्ये जंक फूडचा समावेश होतो. यातील तेल केवळ आरोग्यास हानी पोहोचवत नाही, तर डोळ्यांसाठीही धोकादायक आहे. जंक फूडमुळे कोलेस्टेरॉल वाढते, ज्यामुळे रक्तवाहिन्या अवरुद्ध होतात. यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो, तसेच डोळ्यांची दृष्टीही जाऊ शकते.

साखरयुक्त पेये

जर तुम्ही साखरयुक्त पेयांचे सेवन करत असाल, तर यामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो. यामुळे वजन वाढण्याबरोबरच मधुमेहाचा धोकाही वाढतो. शिवाय, डोळ्यांशी संबंधित रेटिनोपॅथी नावाचा आजार होण्याची शक्यताही वाढते.

रेड मीट

बरेचजण रेड मीट खातात. हे चविष्ट वाटत असले तरी ते तुमच्या शरीरासाठी अजिबात चांगले नाही. यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो आणि मधुमेहामुळे डोळ्यांची दृष्टीही प्रभावित होते.

या पदार्थांचे सेवन टाळून आणि डोळ्यांची योग्य काळजी घेऊन तुम्ही तुमच्या दृष्टीचे रक्षण करू शकता. डोळ्यांच्या आरोग्यासाठी संतुलित आहार आणि नियमित तपासणी महत्त्वाची आहे.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.