AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कितीही पैसा कमवा, ‘या’ पाच चुका तुम्हाला करतील उद्ध्वस्त; हातात कधीच टिकणार नाही पैसा,पाहा वास्तू शास्त्र काय सांगतं?

आपल्या कुटुंबाला एक सुखी समाधानी आयुष्य मिळावं, रिटायरमेंटनंतर गाठीशी चार पैसे असावेत. रिटायरमेंटनंतर आयुष्य आनंदात जावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते.

कितीही पैसा कमवा, 'या' पाच चुका तुम्हाला करतील उद्ध्वस्त; हातात कधीच टिकणार नाही पैसा,पाहा वास्तू शास्त्र काय सांगतं?
| Updated on: Nov 05, 2024 | 5:39 PM
Share

आपल्या कुटुंबाला एक सुखी समाधानी आयुष्य मिळावं, रिटायरमेंटनंतर गाठीशी चार पैसे असावेत. रिटायरमेंटनंतर आयुष्य आनंदात जावं. आर्थिक अडचणी निर्माण होऊ नयेत. यासाठी सामान्य माणूस त्याच्या उमेदीच्या काळात भरपूर कष्ट करतो, पैसा मिळवतो. मात्र अनेकवेळा असं होतं की एखादा व्यक्ती पैसे तर कमावतो. मात्र जो जेवढा पैसा कमावतो तेवढाच पैसा खर्च होतो. त्यांच्या हाती शिल्लक पैसा राहत नाही. याला अनेक कारणं असतात. मात्र तुमच्याकडे आलेला पैसा तुमच्या हातात कसा टिकेलं, खर्च कमी कसा होईल? यासाठी वास्तू शास्त्रामध्ये काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. त्याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत.

घराच्या या दिशेला चुकूनही ठेवू नका कचराकुंडी

वास्तू शास्त्रानुसार घरातील साफ-साफाईचा परिणाम हा थेट तुमच्या आर्थिक परिस्थितीवर पडतो. त्यामुळे घराच्या उत्तप पूर्व अर्थात ईशान्य दिशेला कचराकुंडी किंवा कचार टाकू नये, असं मानलं जातं. जर घराच्या या दिशेला कचरा टाकला जात असेल तर धनाची प्राप्ती होत नाही.

नळामधून टपकणारं पाणी 

वास्तू शास्त्रानुसार तुमच्या घरात जर नळाच्या तोटीमधून सातत्यानं पाणी गळत असेल तर ते अशुभ मानलं जातं. नळामधून सतत गळणारं पाणी हे पैशांच्या खर्चात वाढ होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे नळातून पाणी गळत असेल तर योग्य ते उपाय योजना कराव्यात.

स्वयंपाक घर चुकीच्या दिशेला नसावं

वास्तू शास्त्रानुसार तुमचं स्वयंपाक घर हे अग्नेय दिशेला म्हणजे पूर्ण आणि दक्षिण दिशेच्या मध्ये असावं. पश्चिम दिशेला कधीही स्वयंपाक घर किंवा किचन नसावं, यामुळे खर्चात वाढ होते.

तिजोरीची दिशा

घरात तुम्ही तुमची तिजोरी कोणत्या दिशेला ठेवली याचा थेट परिणाम हा तुमच्या आर्थिक परिस्थितीवर आणि खर्चावर पडतो, असं वास्तू शास्त्र सांगतं. तुम्ही घरात तिजोरी ठेवताना ती नेहमी अशी ठेवा की तिचं तोडं हे उत्तर दिशेकडे असावं. असं मानलं जता की जर तिजोरीचं तोंड उत्तर दिशेकडे असेल तर त्या कुटुंबावर लक्ष्मी माता प्रसन्न राहाते.

घरात चुकूनही तुटलेला पलंग ठेवू नका

वास्तू शास्त्रानुसार घरात कोणतीही तुटलेली वस्तू असू नये, जर तुमच्या घरात तुटलेला पलंग असेल तर त्याचा परिणाम धनावर होतो. खर्चात मोठी वाढ होते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.