AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दारूचा एक पेग झाला की एक ग्लास पाणी, मद्यपानाचा हा नियम माहिती आहे का? एकदा वाचाच!

Alcohol Drinking Rule : आम्ही तुम्हाला दारू पिण्याचा एक महत्त्वाचा नियम सांगणार आहोत. वाइन तज्ज्ञ सोनल हॉलंड यांच्या मते, 'प्रत्येक पेगनंतर एक ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे.' या मागील कारण जाणून घेऊयात.

दारूचा एक पेग झाला की एक ग्लास पाणी, मद्यपानाचा हा नियम माहिती आहे का? एकदा वाचाच!
alcohol drinking ruleImage Credit source: Google
| Updated on: Dec 10, 2025 | 3:32 PM
Share

मद्यपान करणे हे शरीरासाठी हानिकारक आहे. मात्र तरीही भारतासह जगभरात दारू पिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेक लोक दररोज मद्यपान करतात, तर काही लोक महिन्यातून एकदा दारू पितात. मद्यप्रेमींसाठी हा नेहमी वादाचा विषय राहिला आहे की, दारूमध्ये किती पाणी टाकले पाहिजे? काही लोक दारूमध्ये कोल्ड्रिंक किंवा सोडाही टाकतात. मात्र आज आम्ही तुम्हाला दारू पिण्याचा एक महत्त्वाचा नियम सांगणार आहोत. वाइन तज्ज्ञ सोनल हॉलंड यांच्या मते, ‘प्रत्येक पेगनंतर एक ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे.’ यामागे नेमकं काय कारण आहे ते सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

दारूच्या पेगनंतर एक ग्लास पाणी का प्यावे?

दारूच्या एका पेगनंतर एक ग्लास पाणी पिण्याबद्दल बोलताना वाइन तज्ज्ञ सोनल हॉलंड यांनी म्हटले की, ‘अल्कोहोल हे असे पेय आहे जे शरीरात प्रवेश करताच रक्तात विरघळण्यास सुरूवात होते. त्यामुळे लोकांना नशा येते. त्याचबरोबर अल्कोहोल शरीरात गेल्यानंतर ते शरीराला डिहाइड्रेट करण्यास सुरुवात करते. यामुळे तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, आपले शरीर ADH किंवा अँटी-ड्युरेटिक हार्मोन तयार करते जे मूत्रपिंडांना पाणी टिकवून ठेवण्यास आणि कमी मूत्र निर्माण करण्यास सांगते. मात्र जेव्हा आपण दारूचे सेवन करतो तेव्हा अल्कोहोल या हार्मोनला ब्लॉक करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे मूत्रपिंड उलटे काम करते. ते शरीरातून जास्त पाणी बाहेर टाकते. त्यामुळे दारू पिल्यानंतर वारंवार लघवी करावी लागते. यामुळे शरीरातील पाणी कमी होते. सोनल हॉलंड यांच्या मते प्रत्येक पेगनंतर एक ग्लास पाणी पिल्यास शरीरात पाण्याची कमतरता जाणव नाही. यामुळे शरीर डिहायड्रेट होत नाही.

दारू पिताना पाणी न पिल्यास काय होते?

मद्यपान करताना पाणी न पिल्यास त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी स्पष्टपणे दिसून येतो. ज्याला आपण हँगओव्हर म्हणतो. यामुळे दुसऱ्या दिवशी तुम्हाला डोकेदुखी, तहान लागणे आणि अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे दारू पिताना पाणी पिणे महत्त्वाचे आहे. तसेच सोनल हॉलंड यांनी असेही म्हटले आहे की, अल्कोहोल पिण्यापूर्वी काहीतरी खाणे महत्वाचे आहे. ते शक्य नसेल तर दारू पिताना काही हलके फुलके पदार्थ खावेत. यामुळे पोटावर अल्कोहोलचा थेट परिणाम होत नाही. यामुळे शरीर कमी प्रमाणात अल्कोहोल शोषते. ज्यामुळे अल्कोहोलचे परिणाम कमी जाणवतात.

Follow Us
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम