AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मापात पाप करणाऱ्यांच्या लबाडीला चाप…वैधमापनशास्त्र विभागाकडून कारवाई करत दणका

गेल्या सहा महिन्यात तर 6 कोटी 65 लाख 85 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई समोर आली आहे.

मापात पाप करणाऱ्यांच्या लबाडीला चाप...वैधमापनशास्त्र विभागाकडून कारवाई करत दणका
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 18, 2022 | 4:48 PM
Share

नाशिक : वैधमापनशास्त्र विभागाकडून खरंतर दुकानदार, पकर्स यांच्यावर कारवाई केली जाते, त्यासाठीची काही विशेष अशी कारणं नाहीत, पण दैनदीन व्यवहारात आपण हाताळत असलेल्या वस्तूंच्या संदर्भातच ही कारवाई केली जाते. ज्यामध्ये दुकानदारांनी त्यांच्याकडील वजनकाट्यांची पडताळणी न करणे, वजनकाट्यात दोष असणे, पॅकिंग वस्तूंचे वजन प्रत्यक्षात कमी भरणे यावरून कारवाईचा बडगा उगारला जातो. दैनिदिन जीवनात वस्तु खरेदी करत असतांना संबंधित विक्रेता आपली फसवणूक करण्याची दाट शक्यता असते, सहज कमी वजनाच्या वस्तु तो आपल्याला योग्य दिल्याचे देखील भासवू शकतो. म्हणजेच काय तर मापात पाप करून तो आपली फसवणूक करू शकतो. याच पार्श्वभूमीवर कधीकाळी कारवाईचे वजन घटलेल्या वैधमापनशास्त्र विभागाच्या वतिने कारवाईचे वजन वाढल्याचे दिसून येत आहे. यामध्ये काही लबाडांना चाप बसला आहे.

नाशिक विभागात एप्रिल 21 ते मार्च 22 या काळात नाशिक विभागात ३२७ ठिकाणी कारवाया करण्यात आल्या आहेत.

एप्रिल ते ऑक्टोबर 2022 या सहा महिन्यांमध्ये कारवाईचा बडगा उगरण्यात अधिकची वाढ करण्यात आली असून एकूण 440 कारवाया करण्यात आल्या आहे.

गेल्या सहा महिन्यात तर 6 कोटी 65 लाख 85 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई समोर आली आहे.

नाशिक विभागात गेल्या वर्षी वजनकाटे पडताळणी शुल्क म्हणून 12 कोटी 30 लाख 69 हजार रुपये वसूली करण्यात आली असून ही मोठी कारवाई मानली जात आहे.

पॅकिंग वस्तूवर उत्पादकाचे नाव, माहिती नसणे आणि वजन कमी असणे या विरोधात कारवाई केली जाते असते.

दोषी विक्रेत्याला नोटीस पाठवली जाते. विक्रेत्याने चूक मान्य करून दंड भरण्याची तयारी दर्शवल्यास दंड वसूल करण्याची प्रक्रिया राबविली जात असते.

दरम्यान, याबाबत तुम्हाला काही तक्रार करायची असल्यास हेल्पलाइन क्रमांक 1800222262, ई-मेल – dclmms_complaints@yahoo.com यावर तक्रार करू शकतात.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.