AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अयोध्येत जाऊन आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आली ऊर्जा, म्हणाले, आता सुटलो…

अयोध्या दौरा उरकून राज्यात परत आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. आमचे सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे असे स्पष्ट करतानाच कुणी काही बोलले तरी आमच्यावर परिणाम होणार नाही.

अयोध्येत जाऊन आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आली ऊर्जा, म्हणाले, आता सुटलो...
CM EKNATH SHINDEImage Credit source: TV9 NETWORK
| Updated on: Apr 10, 2023 | 8:25 PM
Share

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याची विरोधकांनी जोरदार खिल्ली उडविली होती. मुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावर गेले आणि इकडे राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. त्यावरूनही विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली. अयोध्या दौरा उरकून राज्यात परत आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. आमचे सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे असे स्पष्ट करतानाच कुणी काही बोलले तरी आमच्यावर परिणाम होणार नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील मोसम व करंजाडी खोऱ्यातील अनेक गावांमध्ये शनिवारी अवकाळी पाऊस पडला. यामुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी कांदा, गहू, हरभरा, आंबा, भाजीपाला पिकांचे तसेच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री दादाजी भुसे, बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, जिल्हाधिकारी गंगाथरन् डी यांच्यासह या गावांना भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला. थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात मुख्यमंत्री शिंदे यांनी बाधित झालेल्या पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.

मंत्रीमंडळात मदतीबाबत लवकरच निर्णय

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांच्या सहाय्याने आपापल्या शेत शिवारातील नुकसानाचे पंचनामे करून जबाबदारीने नोंद करून घ्यावी. नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन तात्काळ शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शासन शेतकऱ्यांच्या पाठी असून मंत्रीमंडळात मदतीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येइल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर चांगलीच टीका केली. गारपीट परवा झाली आणि आमचा अयोध्या दौरा परवाच होता. गारपीट होण्याआधी मी इथे यायला हवे होते ? असे विरोधकांना म्हणायचे आहे का ? असा सवाल त्यांनी केला.

विरोधकांना काय बोलावे ते कळत नाही

विरोधकच नव्हे तर कुणाला काय बोलायचे ते बोलू द्या. त्यांच्या बोलण्याचा आमच्यावर काही परिणाम होणार नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या मागे उभे राहणार आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प इतका जबरदस्त केला आणि सर्व समावेशक केला की त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

सरकारला काय बोलके ते त्यांना सुचत नसल्यामुळेच आरोप करत आहेत. त्यांच्या आरोपांना आम्ही आमच्या कामाने उत्तर देऊ. त्यासाठीच आज शेतकऱ्यांसाठी इथे आलो. काल प्रभू रामचंद्र यांच्याकडून प्रेरणा घेतली, ऊर्जा घेतली आणि आता कामाला सुटलो असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.