AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादा एका मार्काने कमी पडले, ठाकरेंना मिळाला भोपळा, शिंदे ठरले अव्वल

सातारा माण तालुक्यात बिजवडी, जाधववाडीत पंचवार्षिक तर पांगरी, दोरगेवाडी, आणि दिडवाघवाडी येथे झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गटाने बाजी मारली, तर जाधववाडी ग्रामपंचायत शरद पवार राष्ट्रवादीने शाबुत ठेवली. तर, पाटणच्या 26 पैकी 20 ग्रामपंचायतीमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांची सत्ता आली आहे.

अजितदादा एका मार्काने कमी पडले, ठाकरेंना मिळाला भोपळा, शिंदे ठरले अव्वल
UDDHAV THACKAREY, CM EKNATH SINDE, AJIT PAWAR Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Nov 06, 2023 | 9:56 PM
Share

सातारा | 6 नोव्हेंबर 2023 : राज्यातील ग्रामपंचायतीचा धुरळा आज विरळ झाला. मिनी महापालिका म्हणून ग्रामपंचायत निवडणुकांकडे पाहिले जाते. त्यामुळे या निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच पक्षांचे मात्तबर नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. राज्यात सत्ताबदल झाला. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची तर अजित दादा यांनी शरद पवार यांची साथ सोडली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तर आधीचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्तेत सामील होत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या घडामोडी नंतरची ही पहिलीच मोठी निवडणूक. त्यामुळे ही निवडणुक प्रतिष्ठेची बनली होती. या निवडणूक अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

ठाकरे गट सोडून गेलेल्या आमदारांची 50 खोके, सगळं ओके असे म्हणत हेटाळणी करण्यात आली. मात्र, या निवडणुकीत ठाकरे यांच्या गटापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने अधिक ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत. शिंदे गटाने एकूण 273 ग्राम पंचायतीवर विजय मिळविला आहे तर ठाकरे गटाकडे 140 ग्रामपंचायती आल्या आहेत.

राज्यात एकूण 2359 ग्रामपंचायत पैकी भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) गट आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या महायुतीला 1372 ग्रामपंचायतीवर विजय मिळाला आहे. तर, कॉंग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांचं ताब्यात 638 ग्रामपंचायती आल्या आहेत. तर अपक्षांनी आणि अन्य छोटे पक्ष यांनी 349 ग्रामपंचायतीवर विजय संपादन केला आहे.

अजित दादा यांच्या घड्याळाचा काटा एका जागेने कमी पडला

राज्यात झालेल्या या निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक विशेष लक्षवेधी ठरली आहे. सातारा जिल्ह्यात एकूण 146 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार होत्या. त्यातील 68 ग्रामपंचायती याआधीच बिनविरोध झालाय. त्यामुळे 78 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाल्या. सातारा जिल्ह्यात झालेल्या या निवडणुकीत सर्वाधिक 41 जागांवर भाजपचे कमल फुलले. त्या खालोखाल शिंदे गटाने 37 ग्रामपंचातीवर भगवा फडकवला. मात्र, अजित दादा यांच्या घड्याळाचा काटा एका जागेने कमी पडला. अजित दादा गटाकडे 36 ग्रामपंचाती आल्या.

ठाकरे गटाला येथील निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही

सातारा जिल्ह्यात महायुतीने निर्विवाद आपले वर्चस्व राखले. तर, शरद पवार गटाने महाविकास आघाडीची लाज राखली. 24 ग्रामपंचायती जिंकून शरद पवार गट चौथ्या स्थानावर गेला. तर, कॉंग्रेसकडे अवघ्या चार ग्रामपंचायतीवर हाताचा पंजा उमटवला. परंतु, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे पुढील निवडणुकी नंतर आमदार नसतील असे आव्हान देणारे उद्धव ठाकरे यांचा करिष्मा मात्र सातारा जिल्ह्यात चालला नाही. उद्धव ठाकरे गटाला येथील निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.