AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवारांनी भर मंचावर मागितली सर्वांची माफी, पाहा नेमकं काय म्हणाले?

"कुणी केलं, काय केलं, त्याचा तपास लावला पाहिजे. त्या संदर्भात मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतो, मी महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची माफी मागतो", असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.

अजित पवारांनी भर मंचावर मागितली सर्वांची माफी, पाहा नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री अजित पवार
| Updated on: Aug 28, 2024 | 5:43 PM
Share

सिंधुदुर्गच्या मालवण येथे समुद्र किनाऱ्यावर राजकोट किल्ला आहे. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर 2023 मध्ये शिवरायांच्या 35 फुट उंच पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. पण हा पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये कोसळला आहे. या पुतळ्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. पण तरीदेखील अवघ्या आठ महिन्यांमध्ये हा पुतळा कोसळला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आणि देशासाठी मोठं योगदान आहे. शिवरायांचा इतिहास आजही प्रत्येकाला दिशा देतो. शिवराय देशाचे आराध्य दैवत आहेत. पण या दैवताचा पुर्णाकृती पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळल्याने शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. या घटनेवरुन राज्य मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांकडून वेगवेगळे वक्तव्ये केली जात आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजपचं केंद्रातील नेतृत्वदेखील नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यानंतर आता या घटनेवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर मंचावर माफी मागितली आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी मी माफी मागतो”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. “शिवराय आपले दैवत आहेत. शिवरायांचा पुतळा पडणं हे आपल्या सर्वांना धक्का देणारं आहे”, असं अजित पवार म्हणाले आहेत. “कुणी केलं, काय केलं, त्याचा तपास लावला पाहिजे. त्या संदर्भात मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतो, मी याबद्दल महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो”, असं अजित पवार म्हणाले.

“युगपरुष छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचे दैवत आहेत. त्या दैवतांचा पुतळा वर्षाच्या आत नादुरुस्त होणं किंवा पडणं हे सर्वांना धक्का देणारं आहे”, असं अजित पवार म्हणाले आहेत. “या प्रकरणात जे कुणी दोषी असतील, मग ते कुणीही असूद्यात, वरिष्ठ अधिकारी असूद्या, खालचे अधिारी असूद्या. कंत्राटदार असूद्या. त्या कंत्राटदाराला तर काळ्या यादीत टाकलं पाहिजे”, अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.

अजित पवार पाहा काय म्हणाले?

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.