AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवारांनी भर मंचावर मागितली सर्वांची माफी, पाहा नेमकं काय म्हणाले?

"कुणी केलं, काय केलं, त्याचा तपास लावला पाहिजे. त्या संदर्भात मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतो, मी महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची माफी मागतो", असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.

अजित पवारांनी भर मंचावर मागितली सर्वांची माफी, पाहा नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री अजित पवार
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Aug 28, 2024 | 5:43 PM
Share

सिंधुदुर्गच्या मालवण येथे समुद्र किनाऱ्यावर राजकोट किल्ला आहे. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर 2023 मध्ये शिवरायांच्या 35 फुट उंच पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. पण हा पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये कोसळला आहे. या पुतळ्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. पण तरीदेखील अवघ्या आठ महिन्यांमध्ये हा पुतळा कोसळला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आणि देशासाठी मोठं योगदान आहे. शिवरायांचा इतिहास आजही प्रत्येकाला दिशा देतो. शिवराय देशाचे आराध्य दैवत आहेत. पण या दैवताचा पुर्णाकृती पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळल्याने शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. या घटनेवरुन राज्य मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांकडून वेगवेगळे वक्तव्ये केली जात आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजपचं केंद्रातील नेतृत्वदेखील नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यानंतर आता या घटनेवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर मंचावर माफी मागितली आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी मी माफी मागतो”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. “शिवराय आपले दैवत आहेत. शिवरायांचा पुतळा पडणं हे आपल्या सर्वांना धक्का देणारं आहे”, असं अजित पवार म्हणाले आहेत. “कुणी केलं, काय केलं, त्याचा तपास लावला पाहिजे. त्या संदर्भात मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतो, मी याबद्दल महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो”, असं अजित पवार म्हणाले.

“युगपरुष छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचे दैवत आहेत. त्या दैवतांचा पुतळा वर्षाच्या आत नादुरुस्त होणं किंवा पडणं हे सर्वांना धक्का देणारं आहे”, असं अजित पवार म्हणाले आहेत. “या प्रकरणात जे कुणी दोषी असतील, मग ते कुणीही असूद्यात, वरिष्ठ अधिकारी असूद्या, खालचे अधिारी असूद्या. कंत्राटदार असूद्या. त्या कंत्राटदाराला तर काळ्या यादीत टाकलं पाहिजे”, अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.

अजित पवार पाहा काय म्हणाले?

Follow Us
'विरोधी पक्षात असाल तर थेट कारवाई...' वर्धापन दिनाच्या भाषणादरम्यान
'विरोधी पक्षात असाल तर थेट कारवाई...' वर्धापन दिनाच्या भाषणादरम्यान NCP नेत्याचं मोठं विधान
Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
मुंबईत मराठींना नो एंट्री?; Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट!
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; संजय राऊतांनी अमित शाहांचं नाव घेत केला मोठा गौप्यस्फोट! म्हणाले....
लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार?
Sanjay Raut | लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार? संजय राऊतांचा थेट हल्ला; लंडन दौऱ्यावरून खळबळ!
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब,
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब, नंतर अचानक... काय घडलं?
12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?
Nashik | लासलगावमध्ये नाफेडचा मोठा दणका!; 12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?
ऑपरेशन ब्लूस्टारवर गिरीश महाजनांना वक्तव्य भोवलं?
Girish Mahajan | ऑपरेशन ब्लूस्टारवर गिरीश महाजनांना वक्तव्य भोवलं? भाजपच्या दिल्ली दरबारातून नाराजीची चर्चा!
नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर
Gokul Gite | नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर ठाम
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!