AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar Death : अजित पवारांच्या निधनानंतर आयुक्तांचा मोठा निर्णय, दोन दिवस पुणे बंद

Ajit Pawar Passes Away : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. अजित दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पुणे शहर आज आणि उद्या असे दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Ajit Pawar Death : अजित पवारांच्या निधनानंतर आयुक्तांचा मोठा निर्णय, दोन दिवस पुणे बंद
Ajit Pawar death pune bandImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jan 28, 2026 | 4:13 PM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. सकाळी 9 च्या सुमारात बारामती विमानतळाजवळ विमान कोसळले आणि विमानाला आग लागली. या अपघातात अजित पवार यांच्यासह पायलट आणि इतर सहकाऱ्यांचा मृत्यू झाला. अजित दादांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 3 दिवस शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यानंतर आता अजित दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पुणे शहर आज आणि उद्या असे दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दोन दिवस पुणे बंद

अजित पवार यांच्या निधनानंतर पुणे महानगरपालिका प्रशासनाने अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आशिया खंडातील महत्त्वाची बाजारपेठ असलेले पुणे मार्केट यार्ड देखील दोन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती व्यापारी असोसिएशनने दिली आहे. बारामतीतील व्यापाऱ्यांनीही कडकडीत बंद पाळला आहे. त्याचबरोबर राज्यातील इतर ठिकाणीही बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्यात अजित पवार यांना बॅनरच्या माध्यमातून श्रद्धांजली

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यावर शोककळी पसरली आहे. पुण्यात अजित पवारांच्या कार्यकर्तांकडून महाराष्ट्राचा धुरंदर नेता हरपला अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. संपूर्ण शहरात सध्या दुःखद वातावरण पसरले आहे.

मुंबईतही आज शासकीय सुट्टी जाहीर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 3 दिवस शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे आज मुंबईत शाळा आणि कार्यालयांना शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बीएमसीने परिपत्र काढत म्हटले की, ‘अजित आशाताई अनंतराव पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या दुःखद निधनामुळे सर्व शासकीय कार्यालयांना बुधवार दि.28 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयातील अत्यावश्यक सेवा वगळून कामगार/कर्मचाऱ्यांना 28 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सु‌ट्टी राहील.’

Follow Us
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड