AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar : केंद्रीय मंत्र्याला पदावरून दूर करा… अजितदादा अपघात प्रकरणात सर्वात मोठी मागणी; रोहित पवार यांचा मोठा बॉम्ब काय ?

अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनावर रोहित पवारांनी गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. हा अपघात नसून 'घातपात' असल्याचा त्यांचा आरोप आहे. विमानातील अतिरिक्त इंधन, ब्लॅकबॉक्सचे नुकसान आणि व्हीएसआर कंपनीच्या मालकाचे गूढ पलायन यावर त्यांनी बोट ठेवले. सत्तेतील काही लोक कंपनीला वाचवत असल्याचा दावा करत, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे.

Rohit Pawar : केंद्रीय मंत्र्याला पदावरून दूर करा... अजितदादा अपघात प्रकरणात सर्वात मोठी मागणी; रोहित पवार यांचा मोठा बॉम्ब काय ?
Rohit Pawar
| Updated on: Feb 18, 2026 | 2:58 PM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) याच्या अपघाती निधनाला जवळपास 20-22 दिवस उलटून गेले आहेत. 28 जानेवारीला ते मुंबईहून बारामतीला विमानाने जात होते, बारामती एअरपोर्टजवळ आल्यावर त्याचं विमान लँडिंग करताना क्रॅश झालं आणि मोठ्ठा स्फोट झाला. यामध्ये अजित पवारांसह आणखी चौघांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल अनेक शंका कुशंका लोकांच्या मनात असून हा अपघात नव्हे तर घातपात आहे असा आरोप अनेक लोक करत आहेत. अजित पवार यांचे पुतणे, राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (Rohit Pawar ) यांनीही हा संशय बोलून दाखवला असून त्यांनी गेल्या आठवड्यात मुबईत व दिल्लीत तसेच आज पुन्हा मुंबईत पत्रकार परिषद घेत नेक मुद्दे सविस्तर मांडले. विमानातील अतिरिकेत इंधन, ब्लॅकबॉक्स डॅमेज होणे, अशा अनेक गोष्टींवर बोट ठेवतनाच रोहित पवार यांनी या अपघाताच्या चौकशीला होणार विलंब, त्यातील त्रुटीही दाखवून दिल्या.

तसेच अपघातग्रस्त विमान ज्या व्हीएस आर कंपनीचं आहे, त्याब्द्दल कंपनीच्या मालकाबद्दलही त्यांन काही दावे केले. तसेच सत्तेतल्या काी लोकांकडून कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा थेट आरोपही त्यांनी लावला. सत्तेतील लोक व्हिएसआरच्या मालकाशी निगडीत आहेत त्यांच्या विधानामुळे मोठी खळबळ माजली. व्हिएसआर कंपनीवर कारवाई का होत नाही असा सवलाही त्यांनी उपस्थित केला.

काय म्हणाले रोहित पवार ?

सत्तेचा वापर करून चौकशी करा ना, द्या ना प्राथमिक रिपोर्ट. आम्ही सत्तेत नसताना पुरावे देतोय. चौकशी का करत नाही याचं कारण रिपोर्ट तयार केला जातोय. व्हिएसआर कंपनीला वाचवलं जात आहे असा आरोप त्यांनी केला. व्हिएसआर कंपनीवर कारवाई का होत नाही ? असा सवालही त्यांनी विचारला.

या कंपनीचे मालक व्हिके सिंग आहेत, त्यांचा मुलगा रोहित सिंग याचं दीड- दोन वर्षांपूर्वी राजस्थानमध्ये लग्न झालं. तिथे कोण कोण गेलं होतं ? सत्तेतील काही लोकं, महाराष्ट्रातील माजी मंत्री, आंध्रप्रदेशच्या टीडीपी या पक्षाचे प्रमुख नेते हे तिकडे गेले होते. व्हिएसआरच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला जाता, आज जेव्हा व्हीएसआरवर (अपघातप्रकरणी) कारवाई करायची असते तेव्हा टीडीपीचे नेते म्हणतात की, चूक नाही. घात किंवा अपघात झाल्यापासून आतापर्यंत राज्याचे मंत्री व्हिएसआरने प्रवास करत आहेत. इतर राज्यांचे मंत्रीही प्रवास करत आहेत. सत्तेतील लोक व्हिएसआरच्या मालकाशी निगडीत आहेत. हैद्राबादचा बडा नेताही व्हिएसआरच्या मालकाशी निगडीत आहेत असा दावा रोहित पवार यांनी केला.

कंपनीच्या मालकाला भारताबाहेर जायला कोणी मदत केली ?

अजित दादांच्या जाण्याने आम्ही दु:खात आहोत, अख्खा महाराष्ट्र दु:खात आहे. पण व्हीएसआर कंपनीचा मालक भारतात नाही. त्याला कुणी भारताबाहेर जायला मदत केली ? असा सवाल रोहिति पवार यांनी विचारला. कंपनीच्या मालकाला अटक करून चौकशी करायला हवी होती. पण ते भारताबाहेर आहेत. अमेरिकेत मायामीला गेले आहेत. व्हिएसआर कंपनीला मुद्दाम वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्तेतील लोक मुद्दाम मालकाला वाचवत आहेत,असा आरोप रोहित यांनी केला. अजित दादा गेले त्याचं काही नाही, पण पैसा वाचला पाहिजे. मैत्री टिकली पाहिजे म्हणून या कंपनीला मदत केली जात आहे असंही ते म्हणाले.

केंद्रीय मंत्र्याला पदावरून दूर करा

या कंपनीवर आज ना उद्या बंदी घातली पाहिजे. याप्रकरणाची चौकशी होईपर्यंत टीडीपीच्या (त्या) मंत्र्याला वेगळी जबाबदारी द्यावी, या पदावरून त्यांना दूर करा, त्यांना या पदावरून काढण्यात यावं. यात त्यांचं लिंकिंग असल्याने तपास नीट होत नाही. मंत्र्याचा या घातपातात हात आहे, असं म्हणत नाही. पण व्हिएसआरला तुम्ही वाचवत आहात, असं चित्र या ठिकाणी निर्माण झालं आहे. या मंत्र्यांच्या पार्टीचे लोक सिंगच्या लग्नाला गेले होते. व्हीएसआरची काही चूक नसल्याचे हे मंत्री म्हणत आहेत. त्यामुळे चौकशी होईपर्यंत त्या मंत्र्याला बाजूला करावं अशी मागणीही रोहित पवार यांनी करत टीडीपीच्या मंत्र्यावर निशाणा साधला.

रोहित पवारांनी काय केली विनंती ?

या अपघातात अजित पवारांसह आणखी चौघ मृत्यू पावले. त्यांच्यापैकी काहींच्या कुटुंबियाची रोहित पवारांनी भेट घेतली. त्याबद्दलही ते बोलले, विमानाची को – पायलट शांभवी पाठक या अपघातात गेली. तिच्या कुटुंबाला मी भेटलो. त्यांची एक मागणी आहे. सत्तेतील लोकच पूर्ण करू शकतील. सत्तेतील लोकांनी त्यांना भेटलं पाहिजे. केंद्र सरकारकडून ही मागणी पूर्ण होऊ शकते. त्यामुळे ती विनंती करतो असं रोहित पवार म्हणाले.

अजित पवारांचे अंगरक्षक विदिप जाधव यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतली. जाधव यांच्या पत्नी ठाणे महापालिकेत कामाला आहेत. त्या परमंट नाही, त्यामुळे एकनाथ शिंदे यांना भेटणार आहोत. पण त्यांना परमनंट करता आलं तर बरं होईल अशी मी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत भाऊ शिंदे यांना विनंती करतो , असंही रोहित पवार यांनी नमूद केलं.

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण