Ajit Pawar : मुख्यमंत्रीपदाचं स्वप्नं अधुरंच राहिलं… अजित पवारांची ती इच्छा अपूर्ण !
Ajit Pawar Baramati Plane Crash : काँग्रेस, शिवसेना आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद भूषवण्याचा रेकॉर्ड अजित पवार यांच्या नावे आहे. त्यांचा राजकीय प्रवास फार सोपा निश्चितच नव्हता, त्यात अनेक चढउतार होते.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून 6 पेक्षा अधिक वेळा कार्यरत राहिलेले अजित पवार यांचे आज अपघाती निधन झाले. सभेसाठी मुंबईहून विमानाने गेलेल्या अजित पवार यांचं प्लेन बारामतीजवळ एका शेतात क्रॅश झालं आणि मोठा स्फोट होऊन आगीच्या ज्वाळा उसळल्या. खाली पडल्यावरही विमानात अनेक स्फोट होते. या अपघातामध्ये अजित पवार (वय 66) यांच्यासह त्यांचे अंगरक्षक, विमानाचे दोन पायलट आणि फ्लाइट अटेंडंट अशा 5 जणांच दुर्दैवी मृत्यू झाला. ते आत्तापर्यंत सात वेळी उपमुख्यमंत्री झाल्याचा दाव करण्यात येतो. आपण उपमुख्यमंत्री पदाचा रेकॉर्ड केला, असं ते स्वतःच मिश्किलपणे म्हणायचे. मात्र याच दादांची एक इच्छा होती, ती म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवण्याची. अत्यंत अनुभवी राजकारणी असलेल्या अजित पवार यांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा कधीच लपवली नाही. मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न त्यांनी स्वतःदेखील अनेकदा बोलून दाखली होती. मात्र त्याची ही इच्छा अखेर अधुरीच राहिली.
जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादीतून बाहेर पडून भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि शिवसेना युती सरकारमध्ये सामील होण्यापूर्वी, नोव्हेंबर 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. पण, ते सरकार केवळ दोन दिवस टिकलं. अजित पवार हे एक कष्टाळू माणूस मानले जात होते. अनेक राजकारणी हे कार्यक्रमांना उशिरा पोहोचण्यासाठी प्रसिद्ध असले तरी, अजित दादा हे मात्रवक्तीर होते, वेळेवर पोहोचायचे. काँग्रेस, शिवसेना आणि भाजपच्या नेतृत्वाखालील अनेक सरकारांमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
चढ-उतारांनी भरलेली कारकीर्द
अजित पवार यांची राजकीय कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली आहे. त्यातून ते नेहमीच बाहेर पडलेत. मग तो 70, 000 कोटी रुपयांचा कथित सिंचन घोटाळा असो किंवा त्यांचा मुलगा पार्थच्या पुण्यातील जमीन व्यवहारातील अलिकडचा वाद असो,ते बाहेर पडले. अजित पवारांना प्रेमाने “दादा” (मोठा भाऊ) म्हटले जात असे. ते त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जायचे. आणि त्यांचे मत व्यक्त करताना, विशेषतः ग्रामीण प्रेक्षकांसमोर, मुक्तपणे शब्द वारयाचे. त्यांच्या वक्तव्यामुळे अनेकदा वादातही सापडले. मात्र चुकल्यावर माफी मागायलाही ते कुचराई करत नसतं.
जुलै 2023 मध्ये, अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) संस्थापक शरद पवार यांच्यापासून वेगळे होऊन त्यांच्या काकांविरुद्ध बंड केले आणि पक्षाचे नाव आणि चिन्ह तसेच पक्षाचे बहुतेक आमदार ताब्यात घेतले. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाला फक्त एकच जागा मिळाली होती. सार्वत्रिक निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामुळे टीकेचा सामना करणाऱ्या अजित पवारांनी पाच महिन्यांनंतर भाजपसोबत युती करून विधानसभा निवडणुकीत 41 जागा जिंकून सर्वांना चुकीचे सिद्ध केले.
तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना फक्त 10 जागा मिळाल्या. 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर, अजित पवार यांनी राज्याच्या राजकारणात आपले स्थान आणखी मजबूत केले. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी युती असूनही, त्यांनी विकासासाठी सत्ताधारी आघाडीत सामील झाल्याचा आग्रह धरला आणि त्यांच्या मूळ पुरोगामी विचारसरणीपासून ते विचलित झाले नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील तथाकथित सत्तासंघर्षाभोवती राजकीय अटकळ फिरत असताना, त्यांनी त्यांच्या पक्षावर आणि त्यांच्या मंत्रिमंडळांवर लक्ष केंद्रित केले.
