AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवारांच्या विमान अपघाताचे गूढ उकलणार, प्राथमिक अहवाल कधी येणार? मोठी अपडेट काय?

अजित पवार विमान अपघात प्रकरणाच्या चौकशीला वेग आला आहे. त्यांच्या विमानाचा अपघात की घातपात ही माहिती आता लवकरच समोर येणार आहे.

अजित पवारांच्या विमान अपघाताचे गूढ उकलणार, प्राथमिक अहवाल कधी येणार? मोठी अपडेट काय?
ajit pawar
| Updated on: Feb 20, 2026 | 9:15 AM
Share

महाराष्ट्राचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या विमान अपघातात निधन झाले. बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ ‘लिअरजेट ४५’ (Learjet 45) या विमानाला झालेल्या भीषण अपघातात अजित पवारांसह अन्य चार सहकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या विमान अपघाताच्या चौकशीला आता वेग आला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (MoCA) या प्रकरणाचा प्राथमिक तपास अहवाल येत्या २८ फेब्रुवारी २०२६ पूर्वी प्रसिद्ध केला जाईल, अशी महत्त्वाची घोषणा केली आहे.

आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (ICAO) नियमांनुसार, कोणत्याही विमान अपघातानंतर ३० दिवसांच्या आत प्राथमिक माहिती सादर करणे बंधनकारक असते. त्यानुसार एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ही संस्था या दुर्घटनेच्या मुळाशी जाण्यासाठी दिवसरात्र काम करत आहे. या अहवालातून विमानाची तांत्रिक स्थिती, हवामानाचा अंदाज आणि वैमानिकाचे शेवटच्या क्षणांतील निर्णय यावर अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या अहवालाकडे केवळ राजकीय वर्तुळाचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

अपघाताच्या दिवशी नक्की काय घडले?

२८ जानेवारी रोजी सकाळी ८:१८ वाजता विमानाचा बारामती एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) शी संपर्क झाला. सकाळी ८:४३ वाजता विमान उतरवण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र, लँडिंगच्या दुसऱ्या प्रयत्नात विमान धावपट्टीच्या सुरुवातीलाच कोसळले आणि त्याला भीषण आग लागली. या अपघातानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

अजित पवारांचा पुतण्या आमदार रोहित पवार यांनी या अपघातात घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच वैमानिकाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ३००० फूट दृश्यमानता असतानाही विमान का कोसळले, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तर अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनीही सोशल मीडियावरून सत्य समोर आलेच पाहिजे अशी भावना व्यक्त केली आहे. त्यामुळे ब्लॅक बॉक्समधील माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.

अधिकृत अहवालातून स्पष्टीकरण मिळणार

दरम्यान या भीषण अपघाताने केवळ पवार कुटुंबच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. आता सर्वांच्या नजरा २८ फेब्रुवारीला प्रसिद्ध होणाऱ्या AAIB च्या प्राथमिक अहवालाकडे लागल्या आहेत. यातून ब्लॅक बॉक्समधून मिळणारी विमानाची तांत्रिक माहिती आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबतचा शेवटचा संवाद, या प्रकरणातील संशयाचे धुके दूर करण्यास मदत करेल. हा अपघात निव्वळ एक तांत्रिक त्रुटी होती की त्यामागे आणखी काही गंभीर कारण दडलेले आहे, याचे उत्तर या अधिकृत अहवालातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Follow Us
पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
Supriya Sule on Mahesh Landge :पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजार...
Devendra Fadnavis : CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजारांहून अधिक तरुणांची उपस्थिती
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! गणेशोत्सवासाठी कोकण...
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोफत बससेवा
राष्ट्रवादीचा अखेरचा पत्ता उलगडणार? कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक
राष्ट्रावादी अखेरचा पत्ता उलगडणार? एकाच आठवड्यात सलग बैठका, विलिनिकरणाबाबत....
आयकर विभागाची मोठी कारवाई! 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल
आयकर विभागाची मोठी कारवाई! तब्बल 2143 कोटी... 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंच्या भीतीने जुनी परंपरा मोडली! पुण्यातील सुप्रिसिद्ध...
तुकाराम मुंढेंच्या भीतीने जुनी परंपरा मोडली! बऱ्याच काळापासूनची पुण्यातील प्रसिद्ध खाऊगल्ली बंद?
'सातारा जिल्हा बँकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार' गोरेंचं विधान
सातारा जिल्हा बँकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार- जयकुमार गोरे
उत्पादन घट आणि वाहतूक खर्च वाढल्याने सुकामेवा महागला...
उत्पादन घट आणि वाहतूक खर्च वाढल्याने सुकामेवा महागला; बदाम, पिस्त्याच्या दरात ३०० रुपयांपर्यंत वाढ
भोरमध्ये पुणे ट्रान्समिशन थ्री प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
भोरमध्ये पुणे ट्रान्समिशन थ्री प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात 130 गावांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात 130 गावांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा