AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवारांच्या विमान अपघाताचे गूढ वाढले; बड्या नेत्याचा खळबळजनक दावा, म्हणाले केंद्र सरकार…

अजित पवार विमान अपघातावरून नाना पटोले यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पायलटचा बदल, मालकाचे परदेशात पलायन आणि घातपाताचा संशय यावर पटोले यांनी सविस्तर भाष्य केले असून पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे.

अजित पवारांच्या विमान अपघाताचे गूढ वाढले; बड्या नेत्याचा खळबळजनक दावा, म्हणाले केंद्र सरकार...
ajit pawar
| Updated on: Feb 18, 2026 | 1:57 PM
Share

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या अपघाताबाबत आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरले आहे. हा केवळ अपघात नसून एक मोठा घातपात असू शकतो, असा खळबळजनक संशय नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची मागणी केली आहे.

नाना पटोले यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी या घटनेतील तांत्रिक बाबींवर बोट ठेवले आहे. विमानाचा अपघात झाला की घातपात, हे स्पष्ट करण्यासाठी ब्लॅक बॉक्सची सखोल चौकशी होणे अनिवार्य आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा की, ऐनवेळी विमानाचा पायलट का बदलला गेला? कोणाच्या सांगण्यावरून हा बदल झाला आणि नवीन पायलटची पार्श्वभूमी काय होती? याची पारदर्शक चौकशी झाल्याशिवाय सत्य बाहेर येणार नाही, असे नाना पटोले म्हणाले.

केंद्र सरकारची ही परंपराच झाली

संबंधित विमान कंपनीचा मालक रोहित सिंग हा अपघातानंतर लगेच परदेशात पळाला आहे. जर काहीच लपवण्यासारखे नसेल, तर तो देश सोडून का गेला? त्याला तातडीने भारतात खेचून आणून त्याची कडक चौकशी झाली पाहिजे. केंद्र सरकारची ही परंपराच झाली आहे की, मोठ्या गुन्ह्यातील आरोपींना परदेशात पळू द्यायचे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला अभय द्यायचे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावर बोलतानाही नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. केंद्रातील तपास यंत्रणांवर आता कोणाचाही विश्वास उरलेला नाही. गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या विमान अपघाताचा तपास अजूनही जनतेसमोर आलेला नाही. गोव्यातील क्लबमधील स्फोटाचा मालकही परदेशात पळाला, पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, असा दावाही नाना पटोले यांनी केला आहे.

राजकीय स्वार्थासाठी त्यांना विलग ठेवलं जातंय

यावेळी नाना पटोले यांनी पवार कुटुंबातील अंतर्गत वादावर भाष्य करताना एक महत्त्वपूर्ण विधान केले. पवार कुटुंब एकत्र आले पाहिजे, ही आमची आणि काँग्रेसची कायमची भूमिका आहे. परंतु, दिल्लीत बसलेले सत्ताधारी नेते या कुटुंबाला एकत्र येऊ देत नाहीत. त्यांच्यात जाणीवपूर्वक फूट पाडली जात आहे. कुटुंबात वाद नसावा हीच संस्कृती आहे, पण राजकीय स्वार्थासाठी त्यांना विलग ठेवले जात आहे, असे नाना पटोले म्हणाले.

हे सरकार विशिष्ट समाजाप्रती द्वेष दाखवतंय

हे सरकार पूर्णपणे द्वेषपूर्ण भावनेतून चालवले जात आहे. घटनात्मक पदावर बसताना कोणाबाबतही ममत्व किंवा द्वेष ठेवणार नाही अशी शपथ घेतली जाते. मात्र, मुस्लिम आरक्षणासारख्या मुद्द्यांवरून हे सरकार विशिष्ट समाजाप्रती द्वेष दाखवत आहे, हे दुर्दैवी आहे, असेही नाना पटोले यांनी सांगितलं.

Follow Us
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान.
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!.
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप.
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?.
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या.....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.