AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amravati Crime | धारणीत कौटुंबिक वाद विकोपाला, पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटविले, अमरावती जिल्ह्यात चाललंय काय?

अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात धक्कादायक घटना घडली. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला पेटविले. ती जळाली असल्यानं तिच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Amravati Crime | धारणीत कौटुंबिक वाद विकोपाला, पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटविले, अमरावती जिल्ह्यात चाललंय काय?
नसीमाला पतीने पेटविल्यानंतर तिच्या प्रकृतीची चिंता करताना नातेवाईक.
| Edited By: | Updated on: Feb 13, 2022 | 10:02 AM
Share

अमरावती : जिल्ह्यातील धारणी मुख्यालयापासून 32 किलोमीटर अंतरावर बैरागड आहे. बैरागड येथील निवासी नासीर शेख गफूर (वय 42) याचा पत्नीसोबत वाद झाला. कौटुंबिक हिंसेतून (domestic violence) त्याने आपल्या पत्नी नसीमा बानो (वय 36) हिच्या अंगावर रॉकेल टाकले. पत्नीला जाळून मारण्याचा प्रयत्न (attempted arson) केला. असा गंभीर आरोप नसीमा बानोचे वडील शेख हफिज व आईने केला आहे. घटनेची माहिती धारणीत पसरतात संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पीडित नसीमा बानोच्या कुटुंबातील आई आणि वडिलांनी ही माहिती दिली. त्यानुसार, माहितीनुसार नसीमाचे पती नासीर शेख गफुर हे नेहमीच पत्नीबद्दल कुरकूर करत होते. वेगवेगळ्या कारणांना तिच्यासोबत भांडण करत. तिला मारहाण (assault) करत असतं. इतकेच नव्हे तर या भांडणांमध्ये नसीमाला नेहमीच सोडचिठ्ठी देण्याची धमकी देत होता. शिवाय जीवे मारण्याची धमकी सुद्धा देत होता.

नसीमा 83 टक्के जळाली

शनिवारी सकाळची घटना. नासीरची धमकी प्रत्यक्षात आली. रॉकेसलच्या भडक्यात नसीमा जवळपास 83 टक्के जळाली. आता तिची परीस्थिती नाजूक आहे. धारणी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. पीडित नसीमा बानोच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार नसीमाला पती नासीरसह तिच्या कुटुंबियांनी यासाठी मदत केली. तिचा देर सद्दाम, हुजेब, जाबीर, आफ्रोज यांनी मिळून रॉकेल टाकून टाळले. जळालेल्या अवस्थेमध्ये नसीमाला सर्वप्रथम बैरागड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता नेण्यात आले. पण, प्रकृती गंभीर असल्याने तिला तिथून धारणी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

बैरागडच्या आरोग्य केंद्रात डॉक्टरांचे दुर्लक्ष

नसीमाच्या कुटुंबाने बैरागड प्राथमिक आरोग्य केंद्रावर सुद्धा गंभीर आरोप लावलेत. त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी योग्य उपचार केला नाही. उलट पाठीमागच्या दारातून नसीमाला धारणीत पाठविले. इतकेच नव्हे तर नसीमाच्या भावाचे कॉलर पकडले. दवाखान्याच्या बाहेर हाकलले. असा सुद्धा आरोप नसीमाच्या भावाने लावला आहे. धारणी पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली. तपास पोलीस करीत आहेत.

Nagpur | तुमचा पाल्य वसतिगृहात शिकतो, काय आहेत नियम?; काय म्हणतात, समाज कल्याण आयुक्त जाणून घ्या

Nagpur Police | मालकाच्या नावाचा बनावट मेल; पैसे तिसऱ्याला पाठवायला सांगितले, फेक अकाउंट निघाल्याने अडचण

Nagpur Accident | टायर फुटल्याने कार डिव्हायडरवर धडकली; नागपुरातील कोंढाळीजवळ अपघात, तीन जण जागीच ठार

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.