AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद शहराला जोडणारा अंजना नदीवरील पूल खचला, पुरामुळे नागरिकांचे हाल

औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची परिस्थिती जास्तच भीषण आहे. जिल्ह्यातील अंजना नदीवरील पूल खचला आहे. खचलेल्या पुलावरून मुसळधार पाणी वाहत आहे.

औरंगाबाद शहराला जोडणारा अंजना नदीवरील पूल खचला, पुरामुळे नागरिकांचे हाल
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Oct 03, 2021 | 6:24 PM
Share

औरंगाबाद : अतिवृष्टीने मराठवाड्यात थैमान घातले आहे. येथील नद्या दुथडी भरुन वाहत असून त्यांना पूर आला आहे. पुरामुळे अनेक रस्ते खचले आहेत. तसेच पूलदेखील वाहून गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात तर ही परिस्थिती जास्तच भीषण आहे. जिल्ह्यातील उपळी गावातील अंजना नदीवरील पूल खचला आहे. खचलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.

जीव धोक्यात घालून करावा लोगतोय प्रवास  

मिळालेल्या माहितीनुसार उपळी गावाच्या परिसरात असलेला अंजना नदीवरील पूल खचला आहे. पूल खचल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. पुलावरुन पाणी जात असले तरी नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करताना दिसत आहेत. पूल खचल्यामुळे उपळी भराडी गावाचा संपर्कही तुटला

गेल्या 8 दिवसांपासून उपळी गावाचा संपर्क तुटलेला असून प्रशासनाने नागरिकांची कोणतीही दखल घेतलेली नाही. महत्त्वाची कामे असल्यामुळे येथील ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून तालुक्यापर्यंत पोहोचावं लागत आहे.

पिसादेवी गावाचा संपर्क तुटला

दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यातील पिसादेवी गावाला जोडणारा पूलही वाहून गेला आहे. पूल वाहून गेल्यामुळे पिसादेवी या गावाचा संपर्क तुटला आहे. अजूनही नदीमधील पाणीपातळी कमी झालेली नसून गावकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. येथे पुराच्या पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागतोय.

चक्रिवादळाचा परिणाम आणखी चार दिवस

दरम्यान, मागील दोन महिन्यांपासून मराठवाड्याला जेरीस आणलेला पाऊस आता कधी एकदा परतीच्या वाटेनं जातोय, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या 6 ऑक्टोबरपासून मान्सून परतीच्या वाटेवर निघेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र मराठवाड्यात पुढील चार दिवस चक्रिवादळाचा परिणाम कायम राहील, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.

इतर बातम्या :

घटक्यात कडक ऊन, घटक्यात पावसाचा धिंगाणा… काय चाललंय काय? ऑक्टोबर हीट सुरु की पावसाळाच लांबला? वाचा सविस्तर…

Photo Story: काहीच राहिलं नाही… पाणीच पाणी आहे…; देवेंद्र फडणवीसांची अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी

पाईपच्या एका बाजूने पडला तरुण, दुसऱ्या बाजूने बाहेर, पिसादेवीत थोडक्यात दुर्घटना टळली

(Anjana river bridge swept away with river water aurangabad villagers facing problems)

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.