AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादच्या वाट्याला प्रथमच 500 कोटींचा निधी, पालकमंत्री सुभाष देसाईंचा पाठपुरावा यशस्वी!

औरंगाबाद जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच योजनांसाठी एवढा मोठा निधी देण्यात आला आहे. यापूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यासाठी 365 वरून 385 कोटींच्या निधीला मंजुरी दिली होती.

औरंगाबादच्या वाट्याला प्रथमच 500 कोटींचा निधी, पालकमंत्री सुभाष देसाईंचा पाठपुरावा यशस्वी!
उद्योगमंत्री सुभाष देसाई
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Feb 18, 2022 | 9:51 AM
Share

औरंगाबाद| राज्यात पहिल्यांदाच औरंगाबादच्या वाट्याला 500 कोटी रुपये एवढा निधी मिळाला आहे. राज्य शासनाने औरंगाबाद जिल्ह्यासाठई 2022-23 या वर्षाकरिता 500 कोटींचा वार्षिक योजना निधी मंजूर केला आहे. पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी ही माहिती दिली. मागील महिन्यात औरंगाबाद इथं झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी अतिरिक्त निधीची मागणी केली होती. दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे अनेक विकास कामे रखडल्याचे अनेकांनी नमूद केले होते. तसेच जिल्ह्यातील वाढलेली शहरी लोकसंख्या तसेच मराठवाड्यातील व इतर जिल्ह्यातील रुग्णांना शहरात सहज उपलब्ध होणाऱ्या दर्जेदार शासकीय वैद्यकीय सेवांकडे सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) व उपमुख्यमंत्री (Ajit Paawar) यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर आता जिल्ह्याचा वार्षिक योजना निधी 500 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

औरंगाबादच्या इतिहासात पहिल्यांदाच जास्त निधी!

औरंगाबाद जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच योजनांसाठी एवढा मोठा निधी देण्यात आला आहे. यापूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यासाठी 365 वरून 385 कोटींच्या निधीला मंजुरी दिली होती. दरवर्षीच्या निधीत 15 ते 20 कोटी रुपये वाढवून मिळतात. मात्र पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करत जिल्ह्यासाठी 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शिवसेनेचे सहा आमदार असूनही फारसा निधी मिळथ नसव्याची तक्रार शिवसेनेच्या आमदारांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली होती. त्यानंतर पालकमंत्री देसाई यांनी हा निधी मंजूर करून देऊ, असा शब्द दिला होता आणि आता तो खरा ठरला आहे.

औरंगाबादला निधी कमी पडू देणार नाही- पालकमंत्री

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यासाठी आता 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून जिल्ह्यातील कोणत्याच विकास कामांसाठी आणि पायाभूत सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. शहरातील घाटी रुग्णालय हा मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांसाठी आरोग्य सेवेकरिता मुख्य आधार आहे. त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणेवर जास्त निधी खर्च करणे अपेक्षित आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

इतर बातम्या-

अब्दुल सत्तार यांनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप, सिल्लोड न्यायालयाने दिले चौकशाचे आदेश

Yawatmal Market: ठोक मार्केटमध्ये थेट ग्राहकांची घुसखोरी, किरकोळ भाजी विक्रेत्यांनी घेतला ‘हा’ निर्णय अन् सर्वकाही ठप्प

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली