औरंगाबादच्या वाट्याला प्रथमच 500 कोटींचा निधी, पालकमंत्री सुभाष देसाईंचा पाठपुरावा यशस्वी!

औरंगाबाद जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच योजनांसाठी एवढा मोठा निधी देण्यात आला आहे. यापूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यासाठी 365 वरून 385 कोटींच्या निधीला मंजुरी दिली होती.

औरंगाबादच्या वाट्याला प्रथमच 500 कोटींचा निधी, पालकमंत्री सुभाष देसाईंचा पाठपुरावा यशस्वी!
उद्योगमंत्री सुभाष देसाई
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 9:51 AM

औरंगाबाद| राज्यात पहिल्यांदाच औरंगाबादच्या वाट्याला 500 कोटी रुपये एवढा निधी मिळाला आहे. राज्य शासनाने औरंगाबाद जिल्ह्यासाठई 2022-23 या वर्षाकरिता 500 कोटींचा वार्षिक योजना निधी मंजूर केला आहे. पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी ही माहिती दिली. मागील महिन्यात औरंगाबाद इथं झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी अतिरिक्त निधीची मागणी केली होती. दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे अनेक विकास कामे रखडल्याचे अनेकांनी नमूद केले होते. तसेच जिल्ह्यातील वाढलेली शहरी लोकसंख्या तसेच मराठवाड्यातील व इतर जिल्ह्यातील रुग्णांना शहरात सहज उपलब्ध होणाऱ्या दर्जेदार शासकीय वैद्यकीय सेवांकडे सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) व उपमुख्यमंत्री (Ajit Paawar) यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर आता जिल्ह्याचा वार्षिक योजना निधी 500 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

औरंगाबादच्या इतिहासात पहिल्यांदाच जास्त निधी!

औरंगाबाद जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच योजनांसाठी एवढा मोठा निधी देण्यात आला आहे. यापूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यासाठी 365 वरून 385 कोटींच्या निधीला मंजुरी दिली होती. दरवर्षीच्या निधीत 15 ते 20 कोटी रुपये वाढवून मिळतात. मात्र पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करत जिल्ह्यासाठी 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शिवसेनेचे सहा आमदार असूनही फारसा निधी मिळथ नसव्याची तक्रार शिवसेनेच्या आमदारांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली होती. त्यानंतर पालकमंत्री देसाई यांनी हा निधी मंजूर करून देऊ, असा शब्द दिला होता आणि आता तो खरा ठरला आहे.

औरंगाबादला निधी कमी पडू देणार नाही- पालकमंत्री

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यासाठी आता 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून जिल्ह्यातील कोणत्याच विकास कामांसाठी आणि पायाभूत सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. शहरातील घाटी रुग्णालय हा मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांसाठी आरोग्य सेवेकरिता मुख्य आधार आहे. त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणेवर जास्त निधी खर्च करणे अपेक्षित आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

इतर बातम्या-

अब्दुल सत्तार यांनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप, सिल्लोड न्यायालयाने दिले चौकशाचे आदेश

Yawatmal Market: ठोक मार्केटमध्ये थेट ग्राहकांची घुसखोरी, किरकोळ भाजी विक्रेत्यांनी घेतला ‘हा’ निर्णय अन् सर्वकाही ठप्प

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.