AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादच्या वाट्याला प्रथमच 500 कोटींचा निधी, पालकमंत्री सुभाष देसाईंचा पाठपुरावा यशस्वी!

औरंगाबाद जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच योजनांसाठी एवढा मोठा निधी देण्यात आला आहे. यापूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यासाठी 365 वरून 385 कोटींच्या निधीला मंजुरी दिली होती.

औरंगाबादच्या वाट्याला प्रथमच 500 कोटींचा निधी, पालकमंत्री सुभाष देसाईंचा पाठपुरावा यशस्वी!
उद्योगमंत्री सुभाष देसाई
| Updated on: Feb 18, 2022 | 9:51 AM
Share

औरंगाबाद| राज्यात पहिल्यांदाच औरंगाबादच्या वाट्याला 500 कोटी रुपये एवढा निधी मिळाला आहे. राज्य शासनाने औरंगाबाद जिल्ह्यासाठई 2022-23 या वर्षाकरिता 500 कोटींचा वार्षिक योजना निधी मंजूर केला आहे. पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी ही माहिती दिली. मागील महिन्यात औरंगाबाद इथं झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी अतिरिक्त निधीची मागणी केली होती. दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे अनेक विकास कामे रखडल्याचे अनेकांनी नमूद केले होते. तसेच जिल्ह्यातील वाढलेली शहरी लोकसंख्या तसेच मराठवाड्यातील व इतर जिल्ह्यातील रुग्णांना शहरात सहज उपलब्ध होणाऱ्या दर्जेदार शासकीय वैद्यकीय सेवांकडे सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) व उपमुख्यमंत्री (Ajit Paawar) यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर आता जिल्ह्याचा वार्षिक योजना निधी 500 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

औरंगाबादच्या इतिहासात पहिल्यांदाच जास्त निधी!

औरंगाबाद जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच योजनांसाठी एवढा मोठा निधी देण्यात आला आहे. यापूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यासाठी 365 वरून 385 कोटींच्या निधीला मंजुरी दिली होती. दरवर्षीच्या निधीत 15 ते 20 कोटी रुपये वाढवून मिळतात. मात्र पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करत जिल्ह्यासाठी 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शिवसेनेचे सहा आमदार असूनही फारसा निधी मिळथ नसव्याची तक्रार शिवसेनेच्या आमदारांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली होती. त्यानंतर पालकमंत्री देसाई यांनी हा निधी मंजूर करून देऊ, असा शब्द दिला होता आणि आता तो खरा ठरला आहे.

औरंगाबादला निधी कमी पडू देणार नाही- पालकमंत्री

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यासाठी आता 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून जिल्ह्यातील कोणत्याच विकास कामांसाठी आणि पायाभूत सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. शहरातील घाटी रुग्णालय हा मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांसाठी आरोग्य सेवेकरिता मुख्य आधार आहे. त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणेवर जास्त निधी खर्च करणे अपेक्षित आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

इतर बातम्या-

अब्दुल सत्तार यांनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप, सिल्लोड न्यायालयाने दिले चौकशाचे आदेश

Yawatmal Market: ठोक मार्केटमध्ये थेट ग्राहकांची घुसखोरी, किरकोळ भाजी विक्रेत्यांनी घेतला ‘हा’ निर्णय अन् सर्वकाही ठप्प

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.