AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद जिल्ह्यात रोहिणी नक्षत्राचा पाऊस बरसला, कच्च्या घरांचं, शेती-फळ पिकांचं नुकसान

औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी अनेक भागात रोहिणी नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील कच्च्या घरांचं, शेती पिकांचं तसेच फळपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं.

औरंगाबाद जिल्ह्यात रोहिणी नक्षत्राचा पाऊस बरसला, कच्च्या घरांचं, शेती-फळ पिकांचं नुकसान
पाऊस
| Updated on: May 28, 2021 | 9:11 AM
Share

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी अनेक भागात रोहिणी नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील कच्च्या घरांचं, शेती पिकांचं तसेच फळपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. पावसाने नागरिकांच्या घरांमध्ये पाणी देखील शिरलं. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. (Aurangabad District Rain Update Rohini Nakshtra)

जिल्ह्यातील पैठण, खुलताबाद, पाचोड परिसराला सर्वाधिक पावसाचा फटका बसला. पळसवाडी, चित्तेपिंपळगाल, गल्लेबोरगाव, वैजापूर, मनोर येथेही जोरदार पाऊस बरसला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. यंदा जून महिन्याच्या अगोदर जरी पाऊस पडला असेल तरीही शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये. जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाचा अंदाज घेऊनच शेतकऱ्यांनी पेरणीचं नियोजन करावं, असा आवाहन कृषी अधिकारी हर्षदा जगताप यांनी केलंय.

पैठण आणि पाचोड परिसराला सर्वाधिक पावसाचा फटका

जिल्ह्यातील पैठण आणि पाचोड परिसराला सर्वाधिक पावसाचा फटका बसला. या पावसात अनेक कच्च्या घरांचं नुकसान झालं. पावसाने नागरिकांच्या घरात पाणी देखील शिरलं. तर काहींच्या घरावरील पत्रे उडाले. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

शेतकऱ्यांची तारांबळ, नुकसान आणि मनस्ताप….

शेतकऱ्यांचं या पावसात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अनेक शेतकऱ्यांची पिकांचं या पावसात नुकसान झालं. तर या पावसाने फळ पिकांनाही मोठा फटका बसला. अनेक फळ पिकांच्या बागेमध्ये पाणी साचून राहिलं. त्यामुळे शेतकऱ्यांना फळपिकांच्या नुकसानीला सामोरे जावे लागले.

चित्ते पिंपळगावात, वेरुळ, मलकापूर, चिंचोलीत धो धो

चितेपिंपळगाव परिसरात पावसाने गुरुवारी पाचच्या सुमारास चांगलीच हजेरी लावली. जवळपास अर्धा तास पाऊस धोधो बरसला. रोहिणी नक्षत्रातील पहिलाच पाऊस जोरदार झाल्याने या परिसरात मात्र समाधानाचे वातावरण पाहायला मिळालं. वेरूळ परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सायंकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे या परिसरात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने परिसरातील मलकापूर, चिंचोली, माटेगाव, आदी गावांत सुरु असलेल्या खरीप हंगामाची कामं तसेच मशागतीचे कामे खोळंबली.

(Aurangabad District Rain Update Rohini Nakshtra)

हे ही वाचा :

ऊसतोड कामगाराच्या डॉक्टर मुलाची झुंज अपुरी, डॉ. राहुल पवारचा औरंगाबादेत मृत्यू

औरंगाबादेत ‘त्या’ रुग्णालयाकडे परवानगी नसताना कोरोनाग्रस्तांवर उपचार, रुग्ण न्याय हक्क परिषदेचा आरोप

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.