AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणेशाच्या विसर्जनासाठी महानगरपालिकेची तयारी अंतिम टप्प्यात, विसर्जन विहिरींच्या स्वच्छतेची मोहीम जोरात

शहरातील 9 परंपरागत विहिरींतील गाळ काढणे व दोन कृत्रिम तलाव तयार करणे अशा एकूण अकरा ठिकाणची कामं सुरु आहे. सध्या जालाननगर येथील विहिरीचे काम पूर्ण झाले असून उर्वरीत कामही अंतिम टप्प्यात आहे. विहिरींच्या ठिकाणी रंगरंगोटीची कामंही सुरु आहेत.

गणेशाच्या विसर्जनासाठी महानगरपालिकेची तयारी अंतिम टप्प्यात, विसर्जन विहिरींच्या स्वच्छतेची मोहीम जोरात
अनंत चतुर्थी यावेळेस रविवारी आहे, त्याचा मुहूर्त, विधी, व्रत जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Sep 13, 2021 | 7:11 PM
Share

औरंगाबाद: गणेशोत्सवानंतर बाप्पांच्या मूर्ती विसर्जनाकरिता महापालिकेने (Aurangabad Municipal corporation ) यंदा आधीपासूनच विसर्जन विहिरींच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. त्यापैकी काही विहिरींच्या स्वच्छतेचे काम अंतिम टप्प्यात असून काही ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे. तरीही नागरिकांनी जवळच्याच कोणत्याही पाण्याच्या स्रोतात गणेशमूर्तींचे विसर्जन (Ganesh murti visarjan) करण्याऐवजी औरंगाबाद महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या विसर्जन विहिरींवरच मूर्तींचे विसर्जन करून सहकार्य करण्याच आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

9 परंपरागत विहिरी, दोन कृत्रिम तलाव

शहरातील विहिरी, तलाव यांमध्ये गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन होऊन, त्यामुळे पाणी प्रदुषण तसेच मूर्तींची विटंबना होऊ नये, या उद्देशाने महापालिकेतर्फे बाप्पांच्या मूर्ती विसर्जनासाठी विशेष सोय उपलब्ध करून दिली जाते. याअंतर्गत यावर्षी शहरातील 9 परंपरागत विहिरींतील गाळ काढणे व दोन कृत्रिम तलाव तयार करणे अशा एकूण अकरा ठिकाणची कामं सुरु आहे. यासाठी महापालिकेने 42 लाख रुपयांचा खर्च केल्याची माहिती सूत्रांकडून मिळली. सध्या जालाननगर येथील विहिरीचे काम पूर्ण झाले असून उर्वरीत कामही अंतिम टप्प्यात आहे. विहिरींच्या ठिकाणी रंगरंगोटीची कामंही सुरु आहेत.

मूर्ती विसर्जन कुठे करता येणार?

महापालिकेने गणेशाच्या मूर्ती विसर्जनासाठी नागरिकांकरिता विशेष सोय केली आहे. याअंतर्गत भावसिंगपुरा, औरंगपुरा, हडको एन13, संघर्षनगर, संतोषीमाता नगर, मुकुंदवाडी गाव, शिवाजीनगर, सातारा गाव, जालाननगर, ज्योती नगर (कृत्रिम तलाव), हर्सूल तलाव स्मृतिवन (कृत्रिम तलाव) आदी ठिकाणांचा समावेश आहे.

ऑनलाइन महालक्ष्मी स्पर्धा

शहरातील औरंगाबाद जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीतर्फे यंदा महालक्ष्मीच्या देखाव्यांसाठी ऑनलाइन स्पर्धा आयोजित केली आहे. याअंतर्गत 13 आणि 14 सप्टेंबर रोजी नागरिकांना आपल्या महालक्ष्मींच्या देखाव्यांचे फोटो, सजावटीचे छायाचित्र महासंघाने दिलेल्या फोन नंबरवर पाठवायचे आहेत. 9028355555 आणि 9921319121 या संपर्कक्रमांकावर नागरिक फोटो पाठवू शकतात. तरीही देखाव्यांच्या या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, उत्सव समितीचे अध्यक्ष अभिषेक देखमुख, कार्याध्यक्ष किशोर तुशळीबागवाले यांनी केले आहे.

इतर बातम्या- 

Aurangabad Waterfall | औरंगाबादच्या अजिंठा लेणीतील वाघूर धबधबा प्रवाहित, पाहा मनमोहक दृश्य

देशातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या अध्यक्षांची बैठक प्रथमच औरंगाबादेत होणार, काय आहे बैठकीचा अजेंडा?

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.