AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृत्यूनंतरही हालअपेष्टा थांबेनात ! पुलाच्या दुर्दशेमुळे मृतदेह जेसीबीने आणण्याची वेळ

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील पुर्णा नदीवरील पुलाचे काम न झाल्यामुळे गावकऱ्यांना मृतदेह चक्क जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या मदतीने गावात आणावा लागला. या घटनेचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

मृत्यूनंतरही हालअपेष्टा थांबेनात ! पुलाच्या दुर्दशेमुळे मृतदेह जेसीबीने आणण्याची वेळ
AURANGABAD DEAD BODY
| Edited By: | Updated on: Sep 09, 2021 | 6:07 PM
Share

औरंगाबाद : माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहाची कसलीही हेळसांड न होऊ देता त्यावर विधीवत अंत्यसंस्कार केले जातात. पूजाअर्चा तसेच सगळे सोपस्कार पार पाडले जातात. मात्र, मृतेदह आणण्यासाठी रस्ताच नसला तर काय करावे ? मृतदेहावर अत्यंसंस्कार कसे करावे ? सध्या पुलाचे काम न झाल्यामुळे तसेच नदीला पूर आल्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्या अडचणी विषद करणारी एक घटना समोर आली. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील पुर्णा नदीवरील पुलाचे काम न झाल्यामुळे गावकऱ्यांना मृतदेह चक्क जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या मदतीने गावात आणावा लागला. या घटनेचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. (aurangabad sillod villagers brought dead body in jcb and tractor due to flood and broken pool)

मृतदेह आणण्यासाठी जेसीबी आणि ट्रकचा उपयोग

मिळालेल्या माहितीनुसार सिल्लोड जिल्ह्याातील आमठाण परिसरात एका माणासाचा मृत्यू झाला. मागील दोन दिवसांपासून औरंगाबादेत मुसळधार पाऊस बरसतोय. या पावसामुळे पुर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. तर दुसरीकडे या नदीवरील पुलाचे कामही झालेले नाही. त्याचा फटका येथील लोकांना बसत आहे. या परिसरात एका मणासाचा मृत्यू झाल्यामुळे त्याला गावात अंत्यसंस्कारासाठी आणायचे होते. मात्र पुलाचे बांधकाम न झाल्यामुळे मृतदेहाची वाहतूक करण्यासाठी गावकऱ्यांना थेट ट्रॅक्टर आणि जेसीबीच्या मदत घ्यावी लागली. आधीच नदीवरील पुलाचे बांधकाम झालेले नाही. त्यातही नदीला पूर आल्यामुळे नागरिकांना मृतदेहावर अंत्यसंकस्कार करण्यासाठी हे पाऊल उचलावे लागले.

तरुणाचा मृतदेह थेट खाटेवरून नेण्याची वेळ

अशीच एक घटना सिल्लोड तालुक्यातील वाघदवाडी येथे घडली होती. या गावात रस्ताच नसल्यामुळे अपघातात मृत्यू झालेल्या एका तरुणाचा मृतदेह थेट खाटेवरून नेण्याची वेळ आली होती. या प्रसंगाचे काही फोटो नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

मृतदेह चक्क खाटेवर टाकून न्यावा लागला

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील वाघदवाडी गावात तुषार मेहेर या तरुणाचा 28 ऑगस्ट रोजी अपघातामुळे मृत्यू झाला होता. या गावामध्ये मागील कित्येक वर्षांपासून रस्ताच नाही. तसेच सध्या पावसाळा असल्यामुळे जी पायवाट आहे, तीसुद्धा अतिशय बिकट झाली असून या मार्गावर पाणी साचले होते. या दयनीय परिस्थितीमुळे येथील ग्रामस्थांवर मृत तरुण तुषार मेहेर याचा मृतदेह चक्क खाटेवर टाकून न्यावा लागला होता. सिल्लोड शहरातील वळण रस्त्यावर या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला होता.

इतर बातम्या :

Dr. BAMU विद्यापीठाच्या पीआरओचा प्रताप, विद्यार्थिनीशी अश्लिल चॅटिंगचा आरोप, विनयभंगाचा गुन्हा दाखल

Festival Special: औरंगाबादचं आराध्य दैवत संस्थान गणपतीची उत्सवमूर्ती तयार, मूर्तीकार बगले कुटुंबियांचा मान

Aurangabad Crime: खिशात मोबाइल, काखेत ट्रान्समीटर, कानात मख्खी एअरफोन, औरंगाबादेत पोलिस चालक परीक्षेत हायटेक कॉपी केल्याचे उघड

(aurangabad sillod villagers brought dead body in jcb and tractor due to flood and broken pool)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.