AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृत्यूनंतरही हालअपेष्टा थांबेनात ! पुलाच्या दुर्दशेमुळे मृतदेह जेसीबीने आणण्याची वेळ

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील पुर्णा नदीवरील पुलाचे काम न झाल्यामुळे गावकऱ्यांना मृतदेह चक्क जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या मदतीने गावात आणावा लागला. या घटनेचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

मृत्यूनंतरही हालअपेष्टा थांबेनात ! पुलाच्या दुर्दशेमुळे मृतदेह जेसीबीने आणण्याची वेळ
AURANGABAD DEAD BODY
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: | Updated on: Sep 09, 2021 | 6:07 PM
Share

औरंगाबाद : माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहाची कसलीही हेळसांड न होऊ देता त्यावर विधीवत अंत्यसंस्कार केले जातात. पूजाअर्चा तसेच सगळे सोपस्कार पार पाडले जातात. मात्र, मृतेदह आणण्यासाठी रस्ताच नसला तर काय करावे ? मृतदेहावर अत्यंसंस्कार कसे करावे ? सध्या पुलाचे काम न झाल्यामुळे तसेच नदीला पूर आल्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्या अडचणी विषद करणारी एक घटना समोर आली. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील पुर्णा नदीवरील पुलाचे काम न झाल्यामुळे गावकऱ्यांना मृतदेह चक्क जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या मदतीने गावात आणावा लागला. या घटनेचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. (aurangabad sillod villagers brought dead body in jcb and tractor due to flood and broken pool)

मृतदेह आणण्यासाठी जेसीबी आणि ट्रकचा उपयोग

मिळालेल्या माहितीनुसार सिल्लोड जिल्ह्याातील आमठाण परिसरात एका माणासाचा मृत्यू झाला. मागील दोन दिवसांपासून औरंगाबादेत मुसळधार पाऊस बरसतोय. या पावसामुळे पुर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. तर दुसरीकडे या नदीवरील पुलाचे कामही झालेले नाही. त्याचा फटका येथील लोकांना बसत आहे. या परिसरात एका मणासाचा मृत्यू झाल्यामुळे त्याला गावात अंत्यसंस्कारासाठी आणायचे होते. मात्र पुलाचे बांधकाम न झाल्यामुळे मृतदेहाची वाहतूक करण्यासाठी गावकऱ्यांना थेट ट्रॅक्टर आणि जेसीबीच्या मदत घ्यावी लागली. आधीच नदीवरील पुलाचे बांधकाम झालेले नाही. त्यातही नदीला पूर आल्यामुळे नागरिकांना मृतदेहावर अंत्यसंकस्कार करण्यासाठी हे पाऊल उचलावे लागले.

तरुणाचा मृतदेह थेट खाटेवरून नेण्याची वेळ

अशीच एक घटना सिल्लोड तालुक्यातील वाघदवाडी येथे घडली होती. या गावात रस्ताच नसल्यामुळे अपघातात मृत्यू झालेल्या एका तरुणाचा मृतदेह थेट खाटेवरून नेण्याची वेळ आली होती. या प्रसंगाचे काही फोटो नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

मृतदेह चक्क खाटेवर टाकून न्यावा लागला

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील वाघदवाडी गावात तुषार मेहेर या तरुणाचा 28 ऑगस्ट रोजी अपघातामुळे मृत्यू झाला होता. या गावामध्ये मागील कित्येक वर्षांपासून रस्ताच नाही. तसेच सध्या पावसाळा असल्यामुळे जी पायवाट आहे, तीसुद्धा अतिशय बिकट झाली असून या मार्गावर पाणी साचले होते. या दयनीय परिस्थितीमुळे येथील ग्रामस्थांवर मृत तरुण तुषार मेहेर याचा मृतदेह चक्क खाटेवर टाकून न्यावा लागला होता. सिल्लोड शहरातील वळण रस्त्यावर या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला होता.

इतर बातम्या :

Dr. BAMU विद्यापीठाच्या पीआरओचा प्रताप, विद्यार्थिनीशी अश्लिल चॅटिंगचा आरोप, विनयभंगाचा गुन्हा दाखल

Festival Special: औरंगाबादचं आराध्य दैवत संस्थान गणपतीची उत्सवमूर्ती तयार, मूर्तीकार बगले कुटुंबियांचा मान

Aurangabad Crime: खिशात मोबाइल, काखेत ट्रान्समीटर, कानात मख्खी एअरफोन, औरंगाबादेत पोलिस चालक परीक्षेत हायटेक कॉपी केल्याचे उघड

(aurangabad sillod villagers brought dead body in jcb and tractor due to flood and broken pool)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...