AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ZP Elections| औरंगाबाद जिल्हा परिषदेची मुदत दीड महिन्यात संपणार, मुदतावाढ मिळणार की प्रशासक येणार?

औरंगाबाद जिल्हा परिषदेत 8 गट आणि 16 गण वाढतील. जिल्हा परिषदेतील सदस्यांची संख्या 62 वरून आता 70 होईल. त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्यांची संख्याही 124 वरून 140 वर पोहोचण्याची शक्यता आहे.

ZP Elections| औरंगाबाद जिल्हा परिषदेची मुदत दीड महिन्यात संपणार, मुदतावाढ मिळणार की प्रशासक येणार?
औरंगाबाद जिल्हा परिषद
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Feb 04, 2022 | 3:00 AM
Share

औरंगाबादः औरंगाबाद जिल्हा परिषदेतील (Aurangabad ZP) पदाधिकारी, सदस्यांचा कार्यकाळ येत्या दीड महिन्यात संपणार आहे. त्यामुळे मदतवाढ मिळेल की प्रशासकांची नेमणूक होईल, यासंबंधीच्या चर्चा रंगल्या आहेत. शासनाने महापालिका, नगरपालिकांप्रमाणेच जिल्हा परिषदेतील (ZP Elections) सदस्यवाढीचा निर्णय घेत, यासंबंधीचा प्रस्ताव मंजुरीकडे राज्यपालांकडे पाठवला आहे. त्यावरही अद्याप निर्णय झालेला नीह. त्यामुळे औरंगाबाद जिल्हा परिषदेची मुदत संपल्यानंतर विद्यमान सभागृहाला मुदतवाढ मिळेल का महापालिकेप्रमाणे (Municipal corporations) इथंही प्रशासकांची नेमणूक होईल, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मात्र मुदत संपल्यानंतर औरंगाबादच्या जिल्हा परिषदेवर सुमारे एक ते दोन महिने प्रशासक नेमले जातील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशनचे अध्यक्ष कैलास गोरे पाटील एका वृत्तपत्राशी बोलताना ही माहिती दिली.

मुदतवाढ मिळण्याची शक्यता धुसर

मागील टर्ममध्ये नागपूर जिल्हा परिषदेला 3 वर्षे मुदतवाढ मिळाली होती. याच धर्तीवर राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेली आहे. यावर येत्या 8 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. मात्र 73 व्या घटनादुरुस्तीनुसार, मुदत संपल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांना मुदतवाढ देता येत नाही. मुदत संपली की त्यावर प्रशासक नेमणे बंधनकारक आहे. त्यामुळे ज्या जिल्हा परिषदांची मुदत संपेल तेथे प्रशासकांची नेमणूक होईल, हे जवळपास निश्चित झाले आहे.

प्रशासकांच्या राजवटीतच निवडणुका!

दरम्यान, जिल्हा परिषदांवर प्रशासक राज सुरु झाले तरीही ते केवळ एक ते दोन महिनेच प्रशासन करतील. दरम्यानच्या काळात निवडणुका पार पडतील, अशी माहिती जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशनचे अध्यक्ष कैलास गोरे यांनी दिली. राज्यातील जिल्हा परिषदांची सदस्य संख्या वाढवण्यास 29 नोव्हेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती. हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आला होता. या प्रस्तावावर राज्यपालांची नुकतीच स्वाक्षरी झाल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्हा परिषदेत 8 गट आणि 16 गण वाढतील. जिल्हा परिषदेतील सदस्यांची संख्या 62 वरून आता 70 होईल. त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्यांची संख्याही 124 वरून 140 वर पोहोचण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या-

Crop Insurance : पीकविम्यासाठी राज्याची स्वतंत्र योजना, कृषिमंत्र्यांनीही दिले संकेत, कशामुळे निर्माण झाली परस्थिती?

Parambir Singh: आरोपी बचावासाठी इतरांची नावं घेत असतो, राऊतांनी परमबीर सिंगांचे आरोप फेटाळले

Follow Us
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपकेंचं पुन्हा आंदोलन?
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंबाबत..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले...
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा खुलासा
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा कुणबी प्रमाणपत्राबाबत मोठा खुलासा
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... भावेश कावरेचं मोठं विधान
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... ब्रोकर भावेश कावरे ठाकरेंच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाला?
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर, व्हिडीओच आला समोर
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्...
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्... पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी...
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर...
लातूरमधील घटना: रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
लातूरमधील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांकडून निष्काळजीपणाचा आरोप
रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत काय घडलं?
Maratha Arakshan | रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?