AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : अभिषेक शर्मा बाद होताच रोहित शर्माची अशी होती प्रतिक्रिया, फोटो व्हायरल

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात अभिषेक शर्माने निराशा केली. चार चेंडूंचा सामना केला आणि शून्यावर बाद झाला. अभिषेक शर्मा बाद होताच रोहित शर्माची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे.

IND vs PAK : अभिषेक शर्मा बाद होताच रोहित शर्माची अशी होती प्रतिक्रिया, फोटो व्हायरल
IND vs PAK : अभिषेक शर्मा बाद होतात रोहित शर्माची अशी होती प्रतिक्रिया, फोटो व्हायरलImage Credit source: PTI
| Updated on: Feb 15, 2026 | 9:24 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या हायव्होल्टेज सामन्यात भारत पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले आहेत. नाणेफेकीचा कौल गमावल्याने भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. भारताने या सामन्यात 20 षटकांचा सामना केला आणि 7 विकेट गमवून 175 धावा केल्या. तसेच पाकिस्तानसमोर विजयासाठी 176 धावांचं आव्हान ठेवलं आहे. खरं तर भारताच्या 200 पार धावा व्हायला हव्या होत्या. पण तसं काही झालं नाही. भारताने 175 धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात भारताची सुरूवात काही चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात अभिषेक शर्माची विकेट गेली. त्याला खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे भारतावर दडपण वाढलं होतं. खरं तर या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला आहे. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींची निराशा केली. इतकंच टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माही आवाक् झाला. त्याला अभिषेक शर्माकडून अशी अपेक्षा नव्हती.

भारत पाकिस्तान सामना सुरू होण्यापूर्वी रोहित शर्माने टीम इंडियाच्या डगआऊट आणि ड्रेसिंग रूमध्ये एन्ट्री मारली होती. तसेच खेळाडूंचं मनोबल वाढवलं होतं. रोहित शर्मा या स्पर्धेचा ब्रँड एम्बेसडर आहे. त्यामुळे खेळाडूंची भेट घेण्यासाठी गेला होता. यावेळी त्यांनी खेळाडूंची गळाभेट घेतली. तसेच चर्चाही केली. यावेळी खेळाडूंच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. पण सामना सुरू झाल्यानंतर त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. कारण पहिल्याच षटकात भारताने अभिषेक शर्माची विकेट गमावली. अभिषेक शर्माला खातंही खोलता आलं नाही. रोहित शर्मा त्यानंतर निराश झाला. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव फोटोच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

Rohit Sharma (28)

रोहित शर्मा या स्पर्धेला ब्रँड एम्बेसडर म्हणून प्रमोट करत आहे. असं असलं तर टीम इंडिया बाबतच्या भावना या इतर क्रीडाप्रेमींसारख्याच आहेत. हा सामना भारतीयांच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे याची कल्पना माजी कर्णधार रोहित शर्माला आहे. त्यामुळे असं काही घडलं तर निराशा पडणं सहाजिकच आहे. आता भारतीय संघ विजयासाठी दिलेल्या धावा रोखते की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं विधान
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं सुचक वक्तव्य, अखेर मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठ विधान
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेतील अपात्रतेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठं विधान; काय म्हणाले?
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल,
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल, अमृता फडणवीसांनाही म्हणाले...
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे...
Pocket Money Scheme : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे म्हणाले..
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत...
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत डॉ. सूरदास यांनी काय काय सांगितलं?
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा