AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : अभिषेक शर्मा बाद होताच रोहित शर्माची अशी होती प्रतिक्रिया, फोटो व्हायरल

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात अभिषेक शर्माने निराशा केली. चार चेंडूंचा सामना केला आणि शून्यावर बाद झाला. अभिषेक शर्मा बाद होताच रोहित शर्माची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे.

IND vs PAK : अभिषेक शर्मा बाद होताच रोहित शर्माची अशी होती प्रतिक्रिया, फोटो व्हायरल
IND vs PAK : अभिषेक शर्मा बाद होतात रोहित शर्माची अशी होती प्रतिक्रिया, फोटो व्हायरलImage Credit source: PTI
| Updated on: Feb 15, 2026 | 9:24 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या हायव्होल्टेज सामन्यात भारत पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले आहेत. नाणेफेकीचा कौल गमावल्याने भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. भारताने या सामन्यात 20 षटकांचा सामना केला आणि 7 विकेट गमवून 175 धावा केल्या. तसेच पाकिस्तानसमोर विजयासाठी 176 धावांचं आव्हान ठेवलं आहे. खरं तर भारताच्या 200 पार धावा व्हायला हव्या होत्या. पण तसं काही झालं नाही. भारताने 175 धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात भारताची सुरूवात काही चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात अभिषेक शर्माची विकेट गेली. त्याला खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे भारतावर दडपण वाढलं होतं. खरं तर या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला आहे. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींची निराशा केली. इतकंच टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माही आवाक् झाला. त्याला अभिषेक शर्माकडून अशी अपेक्षा नव्हती.

भारत पाकिस्तान सामना सुरू होण्यापूर्वी रोहित शर्माने टीम इंडियाच्या डगआऊट आणि ड्रेसिंग रूमध्ये एन्ट्री मारली होती. तसेच खेळाडूंचं मनोबल वाढवलं होतं. रोहित शर्मा या स्पर्धेचा ब्रँड एम्बेसडर आहे. त्यामुळे खेळाडूंची भेट घेण्यासाठी गेला होता. यावेळी त्यांनी खेळाडूंची गळाभेट घेतली. तसेच चर्चाही केली. यावेळी खेळाडूंच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. पण सामना सुरू झाल्यानंतर त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. कारण पहिल्याच षटकात भारताने अभिषेक शर्माची विकेट गमावली. अभिषेक शर्माला खातंही खोलता आलं नाही. रोहित शर्मा त्यानंतर निराश झाला. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव फोटोच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

Rohit Sharma (28)

रोहित शर्मा या स्पर्धेला ब्रँड एम्बेसडर म्हणून प्रमोट करत आहे. असं असलं तर टीम इंडिया बाबतच्या भावना या इतर क्रीडाप्रेमींसारख्याच आहेत. हा सामना भारतीयांच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे याची कल्पना माजी कर्णधार रोहित शर्माला आहे. त्यामुळे असं काही घडलं तर निराशा पडणं सहाजिकच आहे. आता भारतीय संघ विजयासाठी दिलेल्या धावा रोखते की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.