Aurangabad | शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनावरुन वाद; एमआयएम, मराठा क्रांती मोर्चाची वेगळी मागणी

पुतळ्याचे उद्घाटन शिवाजी महाराज यांच्या वंशजांच्या हातानेच केले जावे, असा पवित्रा मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे. एमआयएमनेदेखील हीच भूमिका घेतली आहे.

Aurangabad | शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनावरुन वाद; एमआयएम, मराठा क्रांती मोर्चाची वेगळी मागणी
AURANGABAD SHIVAJI MAHARAJ STATUE
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 8:23 AM

औरंगाबाद : संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj Statue) यांच्या अश्वारुढ पुतळ्याची औरंगाबादेत स्थापना करण्यात येत आहेत. हा पुतळा शहरातील क्रांती चौक येथे स्थापन करण्यात आला असून येत्या 10 फेब्रुवारी रोजी अनावरण केले जाणार आहे. मात्र त्याआधीच येथे पुतळ्याच्या उद्घाटनावरुन मोठा वाद पेटण्याची शक्यता आहे. पुतळ्याचे उद्घाटन शिवाजी महाराज यांच्या वंशजांच्या हातानेच केले जावे, असा पवित्रा मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे. एमआयएमनेदेखील (MIM) हीच भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे महापालिका या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हाताने करण्याचे नियोजन करत आहे. याच मुद्द्यावरुन आता उद्घाटनाचा वाद पेटण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

उद्घाटन शिवाजी महाराज यांच्या वंशजांच्या हस्तेच व्हावे

काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे औरंगाबाद शहरात आगमन झाले. शहरातील क्रांती चौक येथे शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा स्थापन करण्यात येत असून त्याचे काम सुरु आहे. या पुतळ्याचे येत्या 10 फेब्रुवारी रोजी रितसर उद्घाटन करण्यात येणार आहे. मात्र त्याआधीच उद्घाटनाच्या मुद्द्यावरुन वाद सुरु झालाय. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी छत्रपतींच्या पुतळ्याचे उद्घाटन हे शिवाजी महाराज यांच्या वंशजांच्या हस्तेच व्हावे असा पवित्रा घेतलाय. तर दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चानेदेखील हीच भूमिका घेतली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन करण्यास विरोध दर्शविला आहे.

10 तारखेला पुतळ्याचे उद्घाटन केले तर विरोध करु

तर दुसरीकडे भाजपने वेगळीच भूमिका घेतली आहे. येत्या 10 फेब्रुवारीऐवजी पुतळ्याचे उद्घाटन 19 फेब्रुवारी रोजी केले जावे, असे मत भाजपने मांडले आहे. 19 ऐवजी 10 तारखेला पुतळ्याचे उद्घाटन केले तर आम्ही त्याचा विरोध करु अशी भूमिका भाजपने घेतली आहे. या सर्व धांदलीमध्ये औरंगाबाद पालिका पुतळ्याचे उद्घाटन 10 फेब्रुवारीलाच करण्याचे नियोजन आखत आहे. नियोजनानुसार पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

औरंगाबादेत वाद पेटण्याची शक्यता 

दरम्यान, पुतळ्याच्या उद्घाटनावरुन एमआयएम, मराठा क्रांती मोर्चा तसेच भाजपने वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. तर पालिका आपली चौथी भूमिका घेऊन कामाला लागलेली आहे. याच कारणामुळे शिवाजी महाराज पुतळा उद्घाटनाचा वाद पेटण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या :

शेर ए पंजाब लाला लजपत राय यांची जयंती, जहालमतवादी ते महात्मा गांधींच्या असहकार आंदोलन; लालाजीं स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचं योगदान

मतदान आणि निवडणूक प्रक्रियेची माहिती देणारा क्रेडिट कोर्स, लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात येणार

Pakistan Terrorist Attack : पाकमध्ये मोठा अतिरेकी हल्ला, हल्ल्यात 10 सैनिकांचा मृत्यू, एका अतिरेक्याचा खात्मा

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.