AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनावरुन वाद; एमआयएम, मराठा क्रांती मोर्चाची वेगळी मागणी

पुतळ्याचे उद्घाटन शिवाजी महाराज यांच्या वंशजांच्या हातानेच केले जावे, असा पवित्रा मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे. एमआयएमनेदेखील हीच भूमिका घेतली आहे.

Aurangabad | शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनावरुन वाद; एमआयएम, मराठा क्रांती मोर्चाची वेगळी मागणी
AURANGABAD SHIVAJI MAHARAJ STATUE
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: | Updated on: Jan 28, 2022 | 8:23 AM
Share

औरंगाबाद : संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj Statue) यांच्या अश्वारुढ पुतळ्याची औरंगाबादेत स्थापना करण्यात येत आहेत. हा पुतळा शहरातील क्रांती चौक येथे स्थापन करण्यात आला असून येत्या 10 फेब्रुवारी रोजी अनावरण केले जाणार आहे. मात्र त्याआधीच येथे पुतळ्याच्या उद्घाटनावरुन मोठा वाद पेटण्याची शक्यता आहे. पुतळ्याचे उद्घाटन शिवाजी महाराज यांच्या वंशजांच्या हातानेच केले जावे, असा पवित्रा मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे. एमआयएमनेदेखील (MIM) हीच भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे महापालिका या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हाताने करण्याचे नियोजन करत आहे. याच मुद्द्यावरुन आता उद्घाटनाचा वाद पेटण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

उद्घाटन शिवाजी महाराज यांच्या वंशजांच्या हस्तेच व्हावे

काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे औरंगाबाद शहरात आगमन झाले. शहरातील क्रांती चौक येथे शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा स्थापन करण्यात येत असून त्याचे काम सुरु आहे. या पुतळ्याचे येत्या 10 फेब्रुवारी रोजी रितसर उद्घाटन करण्यात येणार आहे. मात्र त्याआधीच उद्घाटनाच्या मुद्द्यावरुन वाद सुरु झालाय. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी छत्रपतींच्या पुतळ्याचे उद्घाटन हे शिवाजी महाराज यांच्या वंशजांच्या हस्तेच व्हावे असा पवित्रा घेतलाय. तर दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चानेदेखील हीच भूमिका घेतली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन करण्यास विरोध दर्शविला आहे.

10 तारखेला पुतळ्याचे उद्घाटन केले तर विरोध करु

तर दुसरीकडे भाजपने वेगळीच भूमिका घेतली आहे. येत्या 10 फेब्रुवारीऐवजी पुतळ्याचे उद्घाटन 19 फेब्रुवारी रोजी केले जावे, असे मत भाजपने मांडले आहे. 19 ऐवजी 10 तारखेला पुतळ्याचे उद्घाटन केले तर आम्ही त्याचा विरोध करु अशी भूमिका भाजपने घेतली आहे. या सर्व धांदलीमध्ये औरंगाबाद पालिका पुतळ्याचे उद्घाटन 10 फेब्रुवारीलाच करण्याचे नियोजन आखत आहे. नियोजनानुसार पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

औरंगाबादेत वाद पेटण्याची शक्यता 

दरम्यान, पुतळ्याच्या उद्घाटनावरुन एमआयएम, मराठा क्रांती मोर्चा तसेच भाजपने वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. तर पालिका आपली चौथी भूमिका घेऊन कामाला लागलेली आहे. याच कारणामुळे शिवाजी महाराज पुतळा उद्घाटनाचा वाद पेटण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या :

शेर ए पंजाब लाला लजपत राय यांची जयंती, जहालमतवादी ते महात्मा गांधींच्या असहकार आंदोलन; लालाजीं स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचं योगदान

मतदान आणि निवडणूक प्रक्रियेची माहिती देणारा क्रेडिट कोर्स, लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात येणार

Pakistan Terrorist Attack : पाकमध्ये मोठा अतिरेकी हल्ला, हल्ल्यात 10 सैनिकांचा मृत्यू, एका अतिरेक्याचा खात्मा

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली