AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध संघ निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट होणार, अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख!

औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध संघाची ही निवडणूक 14 संचालक पदांसाठी होत असून यासाठी 346 मतदार आहेत. संघाच्या पॅनलसाठी येत्या 22 जानेवारी रोजी मतदान घेतले जाईल.

औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध संघ निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट होणार, अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख!
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jan 11, 2022 | 11:09 AM
Share

औरंगाबादः देवगिरी महानंद या नावाने मराठवाड्यात प्रसिद्ध असलेल्या औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची आज 11 जानेवारी ही शेवटची तारीख आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील आणि निवडणूकीतील मुख्य लढत कोणा-कोणात होईल, हे चित्र स्पष्ट होईल.

14 संचालक पदांसाठी निवडणूक

औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध संघाची ही निवडणूक 14 संचालक पदांसाठी होत असून यासाठी 346 मतदार आहेत. निवडणुकीसाठी प्रथमच 100 जणांनी अर्ज दाखल केले असून छाननीत 74 अर्ज वैध ठरवण्यात आले होते. कालपर्यंत दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते. 11 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील पडद्याआड हालचालींना वेग आला आहे. काही जण बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्नशील असतानाच यंदा नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मतदान कधी, निकाल कधी?

औरंगाबाद दूध संघासाठी 22 जानेवारी रोजी मतदान घेतले जाईल. तसेच निवडणुकीचा निकाल 23 जानेवारी रोजी जाहीर होईल. दूध संघाची निवडणूक बिनविरोध व्हावी, असे विद्यमान संचालक मंडळाला वाटते. मागील टर्ममध्ये सर्व पक्षाचे प्रतिनिधित्व संचालक मंडळावर होते, यंदाही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केली आहे. मात्र भाजप हा महाविकास आघाडीचा शत्रू आहे. त्यामुळे आघाडी म्हणून आम्ही त्याविरोधात लढलो पाहिजे, आघाडीपैकी कुणी भाजपचा हात धरला तर काँग्रेसला वेगळा विचार करावा लागेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी दिली.

इतर बातम्या-

Seed Production : हवामानातील बदलाचा परिणाम बिजोत्पादनावर, महाबीजकडून ‘या’ पर्यायाचा अवलंब

Happy b’day Rahul Dravid : द्रविडला भारतीय क्रिकेटची The Wall बनवणारे हे 5 रेकॉर्ड्स माहीत आहेत का?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली