AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar:अजितदादांच्या विमानात बॉम्ब? खासदार बजरंग सोनवणे यांच्या मनात शंका काय? काय केली मोठी मागणी?

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांचा विमान अपघातात मृत्यूने समाजमन हळहळले. राज्याला मोठा धक्का बसला. राजकारणातील दादा व्यक्तिमत्वाची अचानक एक्झिट अनेकांच्या काळजाला चटका लावून गेली. हा विमान अपघात होता की, घातपात यावरही मोठा वाद सुरू आहे. त्यातच खासदार बजरंग सोनवणे यांनी मोठी शंका उपस्थित केली आहे.

Ajit Pawar:अजितदादांच्या विमानात बॉम्ब? खासदार बजरंग सोनवणे यांच्या मनात शंका काय? काय केली मोठी मागणी?
अजित पवार, विमान दुर्घटना, बजरंग सोनवणेImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 06, 2026 | 2:47 PM
Share

MP Bajrang Sonawane: लोकप्रिय नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांची ही अचानक एक्झिट अनेकांच्या काळजाला चटका लावून गेली. अजितदादा आपल्यातून गेले यावर अजूनही अनेकांचा विश्वास नाही. अनेकजण या धक्क्यातून सावरले नाहीत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेतेच नाही तर इतर पक्षातील त्यांच्या सहकाऱ्यांना सुद्धा या धक्क्यातून सावरणे अवघड जात आहे. त्यातच दादांच्या विमानाचा अपघात झाला की हा घातपात होता यावरही राज्यात मोठा खल सुरू आहे. मोठा वाद सुरू आहे. त्यातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मोठी शंका उपस्थित केली आहे.

अजितदादांच्या विमानात बॉम्ब?

बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर मनमोकळं केलं. त्याचवेळी अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजे अशी मोठी मागणी सोनवणे यांनी केली. दादांची अपघाताच्या दिवसाची सकाळपासूनची दिनचर्या, प्रक्रिया समोर आली पाहिजे. विमान घटनेचा क्रम पाहता, कोणी म्हणतं की स्फोट झाला. सकाळी 8:46 चं जे फुटेज दिसत आहे. ते मी पण बघितले. त्या फुटेजमध्ये काय दिसतंय. विमान धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच स्फोट झाला. मला जेवढं कळतं, ठीक आहे विमान तिरपं झालं, क्रॉस झालं. पण जमिनीला टच होण्यापूर्वीच विमानात स्फोट झाला. कारण स्फोट झाल्यानंतर विमानाच्या इंजिनाकडील समोरचा भागातील लोक बाहेर फेकल्या गेले. त्यानंतर विमान जमीनाला लागलं आणि स्फोट झाला. दुसरा स्फोट झाला. त्यामुळे ही घटना काय असू शकते यावर संशय येणार नाही का? असा सवाल त्यांनी केला.

कदाचित दादांच्या विमानात बॉम्ब होता? की इंजिनाचा स्फोट झाला, असा सवाल बजरंग सोनवणे यांनी विचारला आहे. मी काही एकदम निगेटीव्ह माणूस नाही. पण जे समोर दिसतंय, प्रथमदर्शनी जे दिसतंय त्यावरून मी हे बोलतोय. दादांच्या विमानात बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजे. या संपूर्ण घटनेचा तपास सार्वजनिक करा अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे.

9 तारखेनंतर बोलणार- रोहित पवार

तर आमदार रोहित पवार यांनी या सर्व प्रकरणी 9 तारखेनंतर बोलणार असल्याचे स्पष्ट केले. आमच्यापर्यंत जी काही माहिती आली आहे. अजून काही माहिती आम्ही मागवत आहोत. एखादी घटना घडल्यावर खरंच काय झालं हे लोकांसमोर येणं फार महत्त्वाचं आहे. काही अनुत्तरीत प्रश्न आहे याविषयी संबंधित ज्या काही संस्था आहे, त्यांना आम्ही नक्कीच माहिती विचारू असे रोहित पवार म्हणाले.

Follow Us
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा.
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती....
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती.....
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी.
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती.
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती.
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.