AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धनंजय मुंडे यांनी षडयंत्र सुरु केले’, मनोज जरांगे यांचे गंभीर आरोप

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणी न्याय मिळावा या मागणीसाठी पैठण येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले, मुंडे या हत्येच्या प्रकरणातील आरोपींना मदत करत असल्याचा आरोप जरांगेंनी केला.

'धनंजय मुंडे यांनी षडयंत्र सुरु केले', मनोज जरांगे यांचे गंभीर आरोप
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jan 09, 2025 | 4:37 PM
Share

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करुन त्या प्रकरणाचा सखोल छडा लावावा, या मागणीसाठी पैठण येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि मुलगी वैभवी देशमुख सहभागी झाले. या मोर्चात मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव घेत त्यांच्यावर प्रचंड घणाघात केला. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. “या धनंजय मुंडेने जे प्रयोग सुरु केले आहेत, या धनंजय मुंडेने जे षडयंत्र सुरु केले आहेत, तो जे लोकांना आता सांगतोय की, मोर्चे काढा, आंदोलने करा. हे सर्व धनंजय मुंडे यांचं काम आहे. दुसरं कोणाचं नाही”, असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला.

“धनंजय मुंडे तुमच्या लक्षात येत नाहीय, तुम्ही जास्त खोलात जात आहात. तुम्ही अशी फूट जर पाडली, संतोष भैय्याच्या पाठिशी उभं न राहता आरोपींच्या पाठिशी उभं राहण्याचं काम तुमच्या लाभार्थी टोळीकडून सुरु केलं, यानंतर तुमच्या घरातलं कुणी मेलं तर असेच मोर्चे काढायचे का? हा महाराष्ट्र धनंजय मुंडे नेमकं कोणत्या बाजूला घेऊन चालला आहे? आपण मंत्री पदावर आहात. संविधानाची शपथ घेतली आहे. राज्याचा प्रमुख व्यक्ती म्हणून आपण काम करत आहात. तुमच्या लाभार्थ्या गुंड टोळीला तुम्ही राज्यात आंदोलने करायला लावता आणि आरोपींना साथ द्यायला लावता ही धनंजय मुंडेंची झालेली दिशा चांगली नाही”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

‘धनंजय मुंडे हा या गोष्टी त्या गुंड टोळीच्या जीवावरती…’

“जर राज्यात काही घडलं, कोणताही माणूस मेला किंवा मारला, तर आरोपीला साथ द्यायची तर सर्वात आधी जाती-धर्माची लोकं समोर येतील. या राज्यातलं आणि देशातलं पहिलं उदाहरण आहे की, धनंजय मुंडे हा या गोष्टी त्या गुंड टोळीच्या जीवावरती घडवून आणायला लागलाय. मी त्यादिवशी परभणीला काय बोललो? धनंजय देशमुखांना त्या धनंजय मुंडेंच्या लोकांनी धमकी दिली. या राज्यातील लोकं म्हणत आहेत की, संतोष देशमुखांच्या वेळेस त्याचवेळी अॅट्रॉसिटी दाखल झाला असता तर संतोष देशमुख यांचा खून झाला नसता”, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली.

‘जीवात जीव असेपर्यंत हा समाज तुमच्या पाठिशी’

“संतोष भैय्याच्या लेकीने आपल्याला हाक दिली, त्या लेकीची शेवटची इच्छा आहे की, माझ्या वडिलांना न्याय मिळायला हवा. न्याय मिळवून देण्यासाठी एकाही बांधवाने मागे हटायचं नाही. आता त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली. मुख्यमंत्र्यांनी वचन दिलं की, एकाही आरोपीला सोडणार नाही. जेवढी साखळी आहे ती सगळी साखळी पकडली जाईल या शब्दाला मुख्यमंत्र्यांनी खरं करावं. यातला आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येमधील एकही आरोपी सुटला तर सरकारची गाठ आमच्यासोबत आहे. धनंजय भैय्या, जीवात जीव असेपर्यंत हा समाज तुमच्या पाठिशी राहील. संतोष भैय्याला न्याय मिळेपर्यंत एकही माणूस मागे हटणार नाही”, असं मनोज जरांगे म्हणाले.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा