File Closed: बीडमध्ये पाच खुनांचे गूढ कायम, पोलीस अपयशी! वाचा काय असतो अ-समरी अहवाल?

बीडमध्ये मागील दोन ते तीन वर्षांतील दोन गुन्ह्यांत पोलिसांना न्यायालयाकडे अ-समरी अहवाल पाठवून तपासाची फाइल बंद केली आहे तर 3 प्रकरणे अद्याप तपासावर आहेत.

File Closed: बीडमध्ये पाच खुनांचे गूढ कायम, पोलीस अपयशी! वाचा काय असतो अ-समरी अहवाल?
केरळमध्ये पत्नी बदलण्याचे मोठे रॅकेट उद्धवस्त, 7 जणांना अटक
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 3:07 PM

बीडः जिल्ल्यातील पाच खुनांचा तपास करण्यात पोलीसांना अपयश आल्याचा अहवाल नुकताच सादर झाला आहे. या खून प्रकरणात पोलिसांना एकही आरोपी निष्पन्न न झाल्याने तसेच पुरावे न आढळल्याने दोन ते तीन वर्षांपासूनची ही तपास प्रकरणे रखललेली आहेत. यापैकी दोन गुन्ह्यांत पोलिसांना न्यायालयाकडे अ-समरी अहवाल पाठवून तपासाची फाइल बंद केली आहे तर 3 प्रकरणे अद्याप तपासावर आहेत.

पाच खूनांचे गूढ कायम

बीडमध्ये पाच खुनाच्या प्रकरणात आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना अपयश आले आहे. यात पिंपळनेर मधील ताडसोन्ना येथे हर्षवर्धन राजाभाऊ चोले हा तीन वर्षीय मुला अंगणात खेळताना गायब झाला होता. गावातील तलावाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला होता. उत्तरीय तपासणीत त्याचा खून झाल्याचे समोर आले. 28 जुलै 2020 रोजी झालेल्या या खून प्रकरणी आता काही जणांची नार्को टेस्ट केली जाणार आहे. अंमळनेरमधील दिलीप विठ्ठल साबळे यांचाही मृतदेह हॉटेलमागे आढळला होता. मानेवर वार करून त्यांचा खून झाला होता. मात्र हे प्रकरणही अद्याप उलगडलेले नाही.

तपासाची फाइल बंद करण्यात आलेले तीन खून प्रकरण आहेत. यात अंबाजोगाई येथील परळीवेस येथे 4 जून 2019 रोजी झालेल्या खुनात मारेकऱ्याने गळा आवळून हत्या केली होती. यात मारेकरी निष्पन्न न झाल्याने पोलिसांनी तपासाची फाइल बंद केली. अंबाजोगई येथील वाघाळा येथील प्रकाश पंढरीनाथ सावळकर हे अतिमद्यपान व प्रकृती अस्वस्थ्यामुळे रुग्णालयात दाखल होते. स्वाराती रुग्णालयातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांना गळा दाबून संपवल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला होता. मात्र त्याचाही क्लू मिळालेला नाही. वडवणी तालुक्यातील उपळी येथे श्रीकिसन बापूराव पडळकर यांचे पाय बांधून विहिरीत मृतदेह टाकण्यात आला होता. 18 जुलै 2020 रोजी ही घटना उघडकीस आली होती. याप्रकरणीदेखील मारेकरी अद्याप निष्पन्न झालेला नाही, मात्र तपास सुरु आहे.

अ-समरी अहवाल म्हणजे काय?

एखाद्या गुन्ह्याच्या तपासात आरोपी निष्पन्न होत नाहीत. किंवा त्यांच्याविरोधात न्यायालयात खटला चालवण्यासाठी सबळ पुरावा मिळत नाही, असा अहवाल तपास यंत्रणा न्यायालयात देते. या अहवालाला अ-समरी अहवाल असे म्हणतात. पोलिसांचा अ-समरी अहवाल मंजूर करायचा की नाही, याचे सर्वस्वी अधिकार न्यायालयाला असतात.

इतर बातम्या-

लवकरच मुंबईतील आठ मॉल्स रात्री कार पार्किंगला परवानगी देणार, मुंबईकरांची पार्किंगची समस्या कमी होणार

ब्लॅक फ्रायडे सेल म्हणजे काय? भारतात ही प्रथा कधी सुरू झाली

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.