AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभा निवडणुकीतील चौकारानंतर आता अजितदादांचा थेट षटकार, राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी बातमी समोर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीला मोठं यश मिळालं आहे, पक्षानं राज्यात 41 जागा जिंकल्या आहेत. तर दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाला राज्यात केवळ दहाच जागा मिळाल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीतील चौकारानंतर आता अजितदादांचा थेट षटकार, राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी बातमी समोर
Image Credit source: ANI
| Updated on: Nov 28, 2024 | 5:28 PM
Share

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. तब्बल 230 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपनं 132 जागांवर विजय मिळवला, तर शिवसेना शिंदे गटानं 57 जागांवर विजय मिळवला. दरम्यान राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर ही पहिलीच विधानसभेची निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीमध्ये सर्वांचं लक्ष लागलं होतं, ते म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे. लोकसभेत राष्ट्रवादी अजित पवार गटाला फारसं यश मिळालं नव्हंत, मात्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटानं तब्बल 41 जागांवर विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाला केवळ दहा जागांवर समाधान मानावं लागलं. या निवडणुकीनंतर आता अजित पवार हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांची आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद पार पडली.

या पत्रकार परिषदेपूर्वी दिल्लीतील प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अजित पवार यांच्याकडून दिल्ली विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत देण्यात आले आहेत. लवकरात लवकर आपला पक्ष राष्ट्रीय बनेल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान त्यापूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील दिल्ली विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवायची आहे. दिल्लीत आपला नक्की विजय होईल, राष्ट्रीय पक्षाचा गेलेला दर्जा आपण पुन्हा राष्ट्रवादीला मिळून देऊ असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. ते कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. त्यामुळे आता राष्ट्रवादी अजित पवार गट दिल्ली विधानसभेची निवडणूक लाढण्याची शक्यता आहे.

अजित पवारांचा ईव्हीएमवरून विरोधकांना खोचक टोला

दरम्यान यावेळी बोलताना अजित पवार यांनी ईव्हीएमवरून विरोधकांना खोचक टोला लगावला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळालं तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं आणि आता विधानसभा निवडणुकीनंतर त्याच्यामध्ये घोटाळा झाला असं विरोधक म्हणतात असा टोला यावेळी अजित पवार यांनी लगावला आहे.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?