AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नगर परिषद निवडणुकीत भाजपाची रेकॉर्डब्रेक कामगिरी; किती जागा जिंकल्या? फडणवीसांनी सांगितला आकडा

नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीमध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे. भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असून, पक्षानं रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे, यावर आता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नगर परिषद निवडणुकीत भाजपाची रेकॉर्डब्रेक कामगिरी; किती जागा जिंकल्या? फडणवीसांनी सांगितला आकडा
देवेंद्र फडणवीस Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Dec 21, 2025 | 7:05 PM
Share

नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं आहे . राज्यात महायुतीचे एकूण 213 नगराध्यक्ष विजयी झाले आहेत, तर दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळवता आलेलं नाहीये, महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं आहे, भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दरम्यान या निवडणुकीत झालेल्या विजयानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पार पडली आहे, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत, तसेच विरोधकांवर जोरदार हल्लाबोल देखील केला आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस? 

या निवडणुकीमध्ये भाजपचे 129 नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. तर युतीचे 74 टक्क्यांपेक्षा अधिक नगराध्यक्ष निवडून आले आहेत. भाजपचे नगरसेवक 2017 मध्ये नंबर एक होतो. 1602 नगरसेवक होते. आता 3395  नगरसेवक निवडून आले आहोत. 48 टक्के भाजपचे नगरसेवक निवडून आले आहेत. आम्हाला प्रचंड मोठं जनसमर्थन मिळालं आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या पक्षानेही चांगला परफॉर्मन्स दिला आहे. आम्ही एक प्रकारे विधानसभेचा परफॉर्मन्स याठिकाणी कायम ठेवला आहे . रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात पहिली निवडणूक होती. या निवडणुकीत मोठं यश मिळालं, त्यासाठी त्यांचं मी अभिनंदन करतो, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्या पुढे बोलताना ते म्हणाले की,  मंत्री आणि कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केली. पक्ष आणि संघटनेत चांगला संवाद निर्माण झाला. त्यामुळे अभूतपूर्व विजय मिळाला आहे. 2017 पेक्षाही मोठा विजय मिळाला आहे. गेल्या 20-25 वर्षांमध्ये राज्याच्या इतिहासात इतका मोठा विजय कुणाला मिळाला नसेल. एवढा मोठा विजय आम्हाला मिळाला. मी नागरिकांचे आभार मानतो. या निवडणुकीत मी सकारात्मक प्रचार केला, असंही यावेळी फडणवीस म्हणाले, दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे, विरोधक निवडणुकीत प्रचारासाठी बाहेरच पडले नाहीत, त्यामुळे ते आता म्हणतील आम्ही ही निवडणूक फार गांभीर्यानं घेतली नव्हती असा टोला यावेळी फडणीस यांनी लगावला आहे.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.