AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकही खोकेवाला निवडून येता कामा नये; संजय राऊत यांची विदर्भातील जनतेला हाक

शिवसेनेसाठी १०० दिवस काय, जन्मठेपही भोगायला तयार आहे, असंही ते म्हणाले.

एकही खोकेवाला निवडून येता कामा नये; संजय राऊत यांची विदर्भातील जनतेला हाक
संजय राऊतImage Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Nov 26, 2022 | 6:31 PM
Share

बुलडाणा – चिखली येथे शिवसेनेच्या ठाकरे गटानं सभा घेतली. या सभेत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, या पेटलेल्या मशाली गद्दारांचे खोके बेचिराख केल्याशिवाय राहणार नाही. बुलडाणा ही जिजाऊंची भूमी आहे. गद्दारांची भूमी उखळून फेकण्यासाठी या मशाली आल्यातं. एक फूल दोन, दोन हात. एक खासदार व दोन आमदार गेलेतं, अशी टीका त्यांनी केली. ४० आमदार हे गुवाहाटीला गेलेत. त्यामुळं महाराष्ट्रातील देवता संपलीत का, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. अरे, हा महाराष्ट्र संतांचा आहे. बाजूला शेगाव आहे. ज्ञानेश्वरांकडून रेड्यांना बोलायला लावले. आणि मुख्यमंत्री ४० रेड्यांना घेऊन गुवाहाटीला गेले. एकही खोकेवाला निवडून आला नाही पाहिजे, असं आवाहन संजय राऊत यांनी जनतेला केलं.

शिवसेनेसाठी १०० दिवस काय, जन्मठेपही भोगायला तयार आहे, असंही ते म्हणाले. एक संजय राऊत कुर्बान झाला तर काय अनेक संजय राऊत तयार आहेत. हे लाखो शिवसैनिक मोडून काढता येणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी दिला.

आजच्या दिवशी आपली घटना तयार झाली. पण, राज्य कायद्यानं चालत नाही. हे बेकायदेशीर सरकार आपल्या बोडक्यावर बसवले आहे. ते लवकरच जाणार, असं भाकित संजय राऊत यांनी केलं. जेलमध्ये जाताना सांगत होतो, शेवटपर्यंत हा भगवा माझ्या अंगावर राहील.

शिवसेनेचे २५ खासदार आणि किमान ११५ आमदार निवडून द्यायला हवेत. शिवसेनेचा स्वबळावर मुख्यमंत्री निर्माण करून या रेड्यांचा राजकीय बळी घेतला पाहिजे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

शिवसेना आता आधीपेक्षा जोमानं कामाला लागली आहे. बुलडाण्यात आलेले खोक्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची बदनामी केली. ४० रेडे परत येतील. तेव्हा त्यांना जाब विचारला पाहिजे. ही घोडदौड आता थांबता कामा नये. अरे तुम्ही ४० फोडले असाल. पण, ४० लाख शिवसेनेबरोबर आहेत. शिवसेनेसाठी लढणारी ही फौज कुणाला विकत घेता येणार नाही, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.