AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत का? भुजबळांनी मनातलं बोलून दाखवलं

अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत का? यावर आता मंत्री भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. यावर बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत का? भुजबळांनी मनातलं बोलून दाखवलं
Image Credit source: TV9
| Updated on: Jun 22, 2025 | 5:14 PM
Share

राज्यात सध्या अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू आहे, अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत का? यावर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली होती, त्यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आम्हालाही सगळ्यांना वाटतं, का वाटू नये? आपल्या पक्षाचा जो कोणी नेता असेल तो जास्तीत जास्त मोठ्या पदावर गेला पाहिजे, अशी अपेक्षा असते, त्यात काय वाईट आहे? सगळ्याच पक्षातील नेत्यांची आपल्या नेतृत्वाबद्दल तशी इच्छा असते असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते लासलगावमध्ये बोलत होते.

दरम्यान एका कार्यक्रमामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आपल्या राजकीय निवृत्तीचे संकेत दिले, त्यावर देखील छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भास्कर जाधव हे आमचे मित्र आहे,  शिवसेनेत असल्यापासूनचे आमचे ते मित्र आहेत. त्यांनी राजकारणातलं काम थांबवावं असं त्यांचं वय नाही, मित्र म्हणून तर मी हेच सांगेल. राजकारणात चढ-उतार होत असतात. सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत,   राजकारण एकदम सोडून देणे असं तुम्ही जाहीर करणं हे काही मनाला पटत नाही. मी एवढेच सांगेल राजकारणातून निवृत्त होऊ नका. राजकारणामध्ये तुमच्या -माझ्यासारख्या लोकांना सामाजिक कामं करायची आहेत, त्यांना घरी बसणं सुद्धा शक्य नाही,  अडचणी येतात आणि सुटतात सुद्धा असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान त्यांनी यावेळी बोलताना अमेरिकेनं इराणवर केलेल्या एअरस्ट्राईकवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असं काही घडणार नाही, असं म्हटलं होतं.  हे युद्ध जेवढ्या लवकर थांबेल तेवढं चांगलं होईल, युद्धात कोणाचाही फायदा होत नाही.  युद्धात जे देश सहभागी असतात त्यांचा तर फायदा होतच नाही, मात्र त्या दोन देशांवर इतर गोष्टींसाठी जे देश अवलंबून असतात त्यांना देखील त्रास होतो असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत