AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अवहेलना सहन करून देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले…’, छगन भुजबळ नेमके काय म्हणाले?

chhagan bhujbal: ईव्हीएमवर घोळाचा आरोपाला भुजबळ यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, लोकसभेला ईव्हीएम बरोबर होते. आता त्याच्यात गडबड आहे. आपल्या पराभवाचे खापर दुसऱ्यावर फोडण्याचा हा प्रकार आहे. ईव्हीएम निर्जीव वस्तू आहे, त्याच्यावर खापर फोडणे सोपे आहे.

'अवहेलना सहन करून देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले...', छगन भुजबळ नेमके काय म्हणाले?
chhagan bhujbal
| Updated on: Nov 28, 2024 | 11:13 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राज्यातील सरकार स्थापनेबाबत महत्वाचा दावा केला आहे. राज्यात महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत. ज्या वेळेस 3 पक्षांची युती असते तेव्हा सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो. त्या निर्णयासाठी काही वेळेस महिना, महिना देखील लागला आहे. त्या मनाने हा वेळ काहीच नाही. येत्या दोन-चार दिवसांत शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे. त्यासंदर्भातील फॉर्म्युला आज निश्चित होणार आहे. भाजपचे 132 आमदार निवडून आले आहेत, त्यामुळे त्यांचे मंत्री जास्त असणार हे स्वाभाविक आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.

फडणवीस यांचे भरभरुन कौतूक

भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे. त्यात आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. यापूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बाहेरुन काम करणार असल्याचे सांगितले. परंतु पक्षाने आदेश दिला आणि ते उपमुख्यमंत्री झाले. त्यावेळी ती एक प्रकारची अवहेलना सहन करून ते उपमुख्यमंत्री झाले. परंतु त्यांनी पूर्णपणे कामाला झोकवून दिले. आता महायुतीला पूर्ण बहुमत मिळून देण्याचे काम त्यांनी केले. सर्व मागासवर्गीय आणि ओबीसी यांच्या अधिकारांवर कुठे गदा येऊ नये यासाठी फडणवीस यांनी सहकार्य केले आहे, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

मोठ्या वर्गाची मते मिळाली नाही

ओबीसींच्या हक्कावर गदा येऊ नये यासाठी मी काम केले. त्यामुळे काही लोक मला प्रचंड टार्गेट करत आहे, असे भुजबळ यांनी सांगितले. ते म्हणाले, निवडणुकीत मनोज जरांगे स्वत: माझ्या मतदार संघात फिरत होते. रात्री 2 वाजेपर्यंत ते बैठका घेत होते. जरांगे यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला. मला एका मोठ्या वर्गाची मते मिळाली नाही.

लाखाचे मताधिक्य हवे होते

ईव्हीएमवर घोळाचा आरोपाला भुजबळ यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, लोकसभेला ईव्हीएम बरोबर होते. आता त्याच्यात गडबड आहे. आपल्या पराभवाचे खापर दुसऱ्यावर फोडण्याचा हा प्रकार आहे. ईव्हीएम निर्जीव वस्तू आहे, त्याच्यावर खापर फोडणे सोपे आहे. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत मला 56 हजारांचे मताधिक्य होते. मग आता माझे मतदान 2 लाखांपर्यंत जायला हवे होते. ईव्हीएममध्ये गडबड असती तर मला एक लाख जास्त मते मिळायला हवी होती. मग माझे मताधिक्य कमी का झाले? असे भुजबळ यांनी सांगितले.

Follow Us
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.